शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

कलाकार, जादूगार ते तहसीलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:10 IST

कलाकार ,जादूगार ते तहसीलदार नृत्यदिग्दर्शक ... जादूगार अन् काही वर्षांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देऊन तहसीलदार असा वेगळा ...

कलाकार ,जादूगार ते तहसीलदार

नृत्यदिग्दर्शक ... जादूगार अन् काही वर्षांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देऊन तहसीलदार असा वेगळा आणि काहीसा खडतर प्रवास करून यश संपादन केले. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला. शासकीय सेवेत रुजू होऊन आता समाजासाठी काम करता येईल असे अविनाश शेंबेटवाड या तरुणाला वाटले. परंतु, तहसीलदार म्हणून निवड होऊन तब्बल दहा महिन्यांचा कालावधी गेला, तरीही तो नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळेच स्पर्धापरीक्षा म्हणजे हमखास नोकरी, काही वर्षं प्रयत्न केले तर यश मिळेल, दुसऱ्याला सरकारी नोकरी मिळते, मग मला का नाही? केवळ असा वरवरचा विचार करून चालणार नाही. तर, प्रत्येकाने स्वत:चा प्लॅन ‘बी’ तयार ठेवला पाहिजे असे अविनाश पोटतिडकीने सांगतो.

नृत्य-अभिनयाची आवड असल्याने परफॉर्मिंग आर्ट क्षेत्रात करिअर करावे या उद्देशाने अविनाशने पुण्यात येऊन एफटीआयआयमध्ये प्रवेश घेण्याचे ठरवले. एफटीआयआयच्या प्रवेश पूर्व परीक्षेचा अभ्यास सुरू केला. परंतु, कॉलेज-गॅदरिंगचे डान्स बसवणे, नाटकाचा सेट उभा करणे या आवडीच्या कामातून उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार नव्हता. त्यामुळे मित्रांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे त्याने स्पर्धापरीक्षांच्या तयारीला सुरुवात केली. अभ्यासात सातत्य ठेवले तर आपण यश मिळवू शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला. दोन वर्षे अभ्यास केल्यानंतर, राज्यसेवा परीक्षेतून तहसीलदार म्हणून त्याची निवड झाली. परंतु ,मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे अद्याप शासनाकडून नियुक्ती मिळाली नाही. त्याच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना दर वर्षी अशा अनेक अडचनींना तोंड द्यावे लागत आहे. सध्या स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आलेल्या अनुभवावर तो शॉर्टफिल्म तयार करत आहे. तहसीलदार म्हणून निवड होऊनही नियुक्ती मिळाली नाही. त्यामुळे काही वर्षांपूर्वी शिकलेली जादूची कला सध्या क्लोजप मॅजिनिशियन म्हणून सादर करून उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवतो. जादू नेमकी कशी केली जाते, याबाबत अंधश्रध्दा निर्मूलन समितीबरोबर काम करून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो. स्पर्धापरीक्षेत अपयश येऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाकडे ‘प्लॅन बी ’ तयारच असला पाहिजे. अन्यथा, मिळालेल्या अपयशातून सावरणे कठीण जाते. त्यामुळे अभ्यास करताना शिक्षण सुरू ठेवून नेट-सेटसारख्या परीक्षा किंवा एखादा रोजगार, व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आत्मसात केले पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून होणाऱ्या निवड प्रक्रियेबाबत अविनाश सांगतो, एमपीएससीने परीक्षा घेण्याचे वेळापत्रक कधीच पाळले नाही. त्यामुळे स्पर्धापरीक्षा म्हणजे मृगजळाच्या मागे धावणे असाच काहीसा प्रकार आहे. तसेच आपल्या नातेवाईकातील किंवा गावातील मुला-मुलीने स्पर्धा परीक्षेतून एखादे पद मिळवले. त्यामुळे त्याच्याभोवती निर्माण झालेले प्रसिध्दीचे वलय पाहून पुण्यात स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु, स्पर्धा परीक्षा म्हणजे टाईमपास नाही. घरच्यांचा दबावा आहे म्हणून निवडला स्पर्धापरीक्षांचा मार्ग. सर्वच या परीक्षांचा अभ्यास करतात आपणही करावा, हा वरवरचा विचार करून या क्षेत्राकडे येऊ नका, तर आपल्या अंतर्मनाला काय वाटते. परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये आपण स्वत:ला सिध्द करू शकतो. अभ्यासात झोकून देण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करण्याची आपली तयारी आहे का? याचा विचार प्रत्येकाने करावा. तसेच या परीक्षांसाठी आयुष्यातील किती वर्षे द्यायची, याची सीमा प्रत्येकाने निश्चित करावी. स्वत:ची आणि स्वत:बरोबर आपल्या कुटुंबाची फरफट करून घेऊ नये. परंतु, यशस्वी होण्याची जिद्द ,त्याग, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही, हे ही तितकेच खरे असेही अविनाश सांगतो. शब्दांकन : राहुल शिंदे (वरिष्ठ बातमीदार, लोकमत, पुणे) --------------------