शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कलाकार, जादूगार ते तहसीलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:10 IST

कलाकार ,जादूगार ते तहसीलदार नृत्यदिग्दर्शक ... जादूगार अन् काही वर्षांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देऊन तहसीलदार असा वेगळा ...

कलाकार ,जादूगार ते तहसीलदार

नृत्यदिग्दर्शक ... जादूगार अन् काही वर्षांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देऊन तहसीलदार असा वेगळा आणि काहीसा खडतर प्रवास करून यश संपादन केले. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला. शासकीय सेवेत रुजू होऊन आता समाजासाठी काम करता येईल असे अविनाश शेंबेटवाड या तरुणाला वाटले. परंतु, तहसीलदार म्हणून निवड होऊन तब्बल दहा महिन्यांचा कालावधी गेला, तरीही तो नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळेच स्पर्धापरीक्षा म्हणजे हमखास नोकरी, काही वर्षं प्रयत्न केले तर यश मिळेल, दुसऱ्याला सरकारी नोकरी मिळते, मग मला का नाही? केवळ असा वरवरचा विचार करून चालणार नाही. तर, प्रत्येकाने स्वत:चा प्लॅन ‘बी’ तयार ठेवला पाहिजे असे अविनाश पोटतिडकीने सांगतो.

नृत्य-अभिनयाची आवड असल्याने परफॉर्मिंग आर्ट क्षेत्रात करिअर करावे या उद्देशाने अविनाशने पुण्यात येऊन एफटीआयआयमध्ये प्रवेश घेण्याचे ठरवले. एफटीआयआयच्या प्रवेश पूर्व परीक्षेचा अभ्यास सुरू केला. परंतु, कॉलेज-गॅदरिंगचे डान्स बसवणे, नाटकाचा सेट उभा करणे या आवडीच्या कामातून उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार नव्हता. त्यामुळे मित्रांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे त्याने स्पर्धापरीक्षांच्या तयारीला सुरुवात केली. अभ्यासात सातत्य ठेवले तर आपण यश मिळवू शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला. दोन वर्षे अभ्यास केल्यानंतर, राज्यसेवा परीक्षेतून तहसीलदार म्हणून त्याची निवड झाली. परंतु ,मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे अद्याप शासनाकडून नियुक्ती मिळाली नाही. त्याच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना दर वर्षी अशा अनेक अडचनींना तोंड द्यावे लागत आहे. सध्या स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आलेल्या अनुभवावर तो शॉर्टफिल्म तयार करत आहे. तहसीलदार म्हणून निवड होऊनही नियुक्ती मिळाली नाही. त्यामुळे काही वर्षांपूर्वी शिकलेली जादूची कला सध्या क्लोजप मॅजिनिशियन म्हणून सादर करून उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवतो. जादू नेमकी कशी केली जाते, याबाबत अंधश्रध्दा निर्मूलन समितीबरोबर काम करून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो. स्पर्धापरीक्षेत अपयश येऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाकडे ‘प्लॅन बी ’ तयारच असला पाहिजे. अन्यथा, मिळालेल्या अपयशातून सावरणे कठीण जाते. त्यामुळे अभ्यास करताना शिक्षण सुरू ठेवून नेट-सेटसारख्या परीक्षा किंवा एखादा रोजगार, व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आत्मसात केले पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून होणाऱ्या निवड प्रक्रियेबाबत अविनाश सांगतो, एमपीएससीने परीक्षा घेण्याचे वेळापत्रक कधीच पाळले नाही. त्यामुळे स्पर्धापरीक्षा म्हणजे मृगजळाच्या मागे धावणे असाच काहीसा प्रकार आहे. तसेच आपल्या नातेवाईकातील किंवा गावातील मुला-मुलीने स्पर्धा परीक्षेतून एखादे पद मिळवले. त्यामुळे त्याच्याभोवती निर्माण झालेले प्रसिध्दीचे वलय पाहून पुण्यात स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु, स्पर्धा परीक्षा म्हणजे टाईमपास नाही. घरच्यांचा दबावा आहे म्हणून निवडला स्पर्धापरीक्षांचा मार्ग. सर्वच या परीक्षांचा अभ्यास करतात आपणही करावा, हा वरवरचा विचार करून या क्षेत्राकडे येऊ नका, तर आपल्या अंतर्मनाला काय वाटते. परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये आपण स्वत:ला सिध्द करू शकतो. अभ्यासात झोकून देण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करण्याची आपली तयारी आहे का? याचा विचार प्रत्येकाने करावा. तसेच या परीक्षांसाठी आयुष्यातील किती वर्षे द्यायची, याची सीमा प्रत्येकाने निश्चित करावी. स्वत:ची आणि स्वत:बरोबर आपल्या कुटुंबाची फरफट करून घेऊ नये. परंतु, यशस्वी होण्याची जिद्द ,त्याग, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही, हे ही तितकेच खरे असेही अविनाश सांगतो. शब्दांकन : राहुल शिंदे (वरिष्ठ बातमीदार, लोकमत, पुणे) --------------------