पालखी आगमनापूर्वी जागा ताब्यात द्यावी

By Admin | Updated: June 21, 2016 00:28 IST2016-06-21T00:28:17+5:302016-06-21T00:28:17+5:30

घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने जागा देण्याचे मान्य केले आहे. ती जागा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी आगमनापूर्वी नगर परिषदेच्या ताब्यात द्यावी

Before the arrival of Palkhi, the land should be given in possession | पालखी आगमनापूर्वी जागा ताब्यात द्यावी

पालखी आगमनापूर्वी जागा ताब्यात द्यावी

इंदापूर : घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने जागा देण्याचे मान्य केले आहे. ती जागा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी आगमनापूर्वी नगर परिषदेच्या ताब्यात द्यावी, अशी आग्रही भूमिका घेऊन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी, प्रस्थान रस्त्याच्या कडेची संरक्षक भिंत बांधण्याचा मागील मासिक बैठकीतील विषय स्थगित ठेवण्यास भाग पाडले.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी नियोजनासंदर्भात आज (दि. २०) नगराध्यक्षा उज्ज्वला राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसमोर एकूण ११ विषय ठेवण्यात आले होते. ते सर्व मंजूर करण्यात आले. शनिवारी (दि. १८) नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मासिक बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये डॉ. आंबेडकरनगर व अण्णा भाऊ साठेनगरला दुभागून इंदापूर-अकलूज रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान करते. या रस्त्याच्या कडेला, ज्योतिबा मंदिराच्या बाजूला नगर परिषदेने कचरा डेपो केला आहे. ती जागा पालखी आगमनापूर्वी नगर परिषदेच्या ताब्यात द्यावी. म्हणजे पालखी आगमनापूर्वी जोतिबाच्या मंदिराजवळील कचरा त्या जागी टाकण्यात येईल, हा आग्रह धरला. हा निर्णय होईपर्यंत संरक्षक भिंत बांधण्याच्या निर्णयास स्थगिती द्यावी, असा निर्णय घेण्यास सर्वसाधारण सभेस भाग पाडले.
पाळणे व मनोरंजनाची साधने आणू इच्छिणाऱ्या व्यावसायिकास कमीत कमी पन्नास हजार रुपये भाडे आकारण्यात यावे. त्यापेक्षा जास्त भाडे देणारास परवानगी दिली जावी, अशी सूचना नगरसेवक अ‍ॅड. गिरीश शहा यांनी मांडली. मनोरंजनाचे साहित्य घेऊन येणाऱ्यांना आडदांड प्रवृत्तीच्या युवकांकडून त्रास दिला जात असल्याचे प्रकार घडतात.
याबाबत नगरपरिषदेने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना नगरसेवक इब्राहिम शेख यांनी मांडली. राऊत यांनी आभार मानले. या बैठकीस अलका ताटे, माया विंचू, सायरा पठाण, वर्षा मखरे, कमल पवार व इतर नगरसेवक उपस्थित होते.

Web Title: Before the arrival of Palkhi, the land should be given in possession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.