शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पालखी आणि फुलांच्या रथातून झाले मानाच्या गणपतींचे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 20:45 IST

भव्य मिरवणुका काढत पुण्यातील मानाचे पाचही गणपती मंडळांमध्ये विराजमान झाले.

पुणे: गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरयाच्या जयघोषात चांदीची पालखी आणि आकर्षक फुलांच्या रथातून मानांच्या पाचही गणपतींचे आगमन झाले. ढोल पथकांच्या निनादात सकाळी आठ वाजल्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. नववारी साड्या नेसलेल्या महिला, फेटे, सलवार कुर्ता असा पारंपरिक वेशभूषा प्रदान करणारे पुरुष, लहान मुले मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल ताशा पथकांमध्येही तरुणी-तरुणींचा उत्साह दिसून येत होता. मानाचा पहिला कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक सकाळी ८ वाजता सुरू झाली. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचा विजय असो, अशा जयघोषात कार्यकर्त्यांनी मिरवणुकीला सुरुवात केली. पालखीबरोबर अब्दागिरी घेऊन जाणारे मावळे आणि छत्री घेऊन जाणारा सेवक होता. या मिरवणुकीत श्रीराम आणि संघर्ष ढोल ताशा पथकांनी निरनिराळ्या तालावर ढोल ताशा निनादाचे सादरीकरण केले. 

मानाचा दुसरा तांबडी जाेगेश्वरी गणपतीची मिरवणूक पारंपरिक चांदीच्या पालखीतून काढण्यात आली. सकाळी १०.३० वाजता शंख निनादाने मिरवणुकीस प्रारंभ झाला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुणेरी पगडी घातल्या होत्या. शिवमुद्रा, ताल ढोल-ताशा पथक, गंधर्वराज बॅण्ड मिरवणुकीत सहभाग झाले होते. दुपारी १ वाजता उत्सवमंडपात श्रींची प्राणप्रतिष्ठा इंद्रायणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बाल आणि धारिवाल समूहाच्या अध्यक्ष जान्हवी धारिवाल यांच्या हस्ते करण्यात आली. 

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाची मिरवणूक रंगबेरंगी फुलांच्या रथातून काढण्यात आली. मिरवणुकीत नादब्रम्ह, गर्जना, समर्थ प्रतिष्ठान, गुरुजी प्रतिष्ठान या पथकांसह यावर्षी प्रथमच येरवडा कारागृहातील कैद्यांचे पथक मिरवणुकीत सहभागी झाले. तीस कैदी बांधवांच्या पथकात २८ ढोलवादक आणि २ ताशा वादक होते. गणेशोत्सवाच्या २५ दिवस अगोदर या कैद्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती. इतिहासात प्रथम असे कैद्यांनी मानाच्या गणपतीसमोर ढोल ताशा वादन केले आहे. उद्योगपती विशाल व श्‍वेता चोरडिया यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ रथामधील गणरायाची उंच मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरली. मिरवणुकीत वाद्यवृंद, भद्राय आणि श्री रविशंकर शाळेचे ढोल-ताशा पथक यांच्या वाद्यांनी पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले. बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून ४५  मिनिटांनी श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीच्या मिरवणुकीत श्रीराम आणि शिवमुद्रा या पथक सहभागी झाले होते. पारंपरिक लाकडी पालखीतून बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली.  दुपारी १२ वाजून ३० वाजता "केसरी'चे विश्‍वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेश महोत्सव