शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

शहरातून ५ हजारांच्या आसपास नागरिक अयोध्येला घेऊन जाणार; पुण्यात मनसेची नावनोंदणी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 18:38 IST

शहर कार्यालयात मनसेने नावनोंदणी अभियान सुरु केले आहे

पुणे : पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून मनसैनिक अयोध्येसाठी सज्ज झाले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी राज ठाकरेंसोबत अयोध्येला यावे असे आवाहन मनसैनिकांकडून करण्यात येत आहे, त्यातच उत्तर प्रदेशमधील खासदार ब्रिजभूषण यांनी राज ठाकरे येऊ देणार नाही असे सांगितले आहे. त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी तरच त्यांचे अयोध्येत स्वागत केले जाईल. असंही ते म्हणाले होते. परंतु मनसेने या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष न देता अयोध्या दौऱ्याच्या जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. 

आज राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातही मनसेची अयोध्येला जाण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. शहर कार्यालयात मनसेने नावनोंदणी अभियान सुरु केले आहे. पुणे शहरातून ५ हजारच्या आसपास नागरिक अयोध्येला घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे. अशी माहिती शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

बाबर म्हणाले, अयोध्येसाठी आम्ही पुणे शहरातून नावनोंदणी सुरु केली आहे. त्यासाठी ''चला अयोध्या राज साहेबांसोबत'' असा फॉर्म तयार करण्यात आला आहे. आज दिवसभरात ४५० ते ५०० फॉर्म भरले गेले आहेत. कार्यकर्त्यांबरोबरच सामान्य नागरिकही अयोध्येला येण्यास उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. आमचा पुणे शहरातून जवळपास ५ हजार नागरिक अयोध्येला घेऊन जाण्याचा मानस आहे. 

नावनोंदणी अभियानात उत्तर भारतीयांचाही समावेश  नावनोंदणी सुरु असताना उत्तर भारतीय नागरिकांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ब्रिजभूषण यांचा विरोध वेगळा आहे. आम्ही उत्तर भारतीय २५ वर्षांपासून इथे महाराष्ट्रात राहत आहोत. महाराष्ट्रात राहून आम्ही पुढे गेलोय. मग उत्तर प्रदेश मध्ये सुखी झालो. त्यांना त्याच्याबद्दल काही माहित नाही. ते तिकडं बोलतात त्याचा त्रास आम्हाला इथं होतोय. आम्ही सगळे राज साहेबांसोबत अयोध्येला जाणार आहे. जवळपास २ ते ३ हजारचा ग्रुप महाराष्ट्रातून अयोध्येला जाणार आहे. राज साहेब करतात ते योग्य आहे. ब्रिजभूषणला साहेब काय बोलतात हे कळत नाही, त्यांना मराठी कळत नाही. त्याला काही माहित नाही. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात संघर्ष झाल्यास आम्ही राज साहेबांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.  

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेAyodhyaअयोध्याPoliticsराजकारण