शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

शहरातून ५ हजारांच्या आसपास नागरिक अयोध्येला घेऊन जाणार; पुण्यात मनसेची नावनोंदणी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 18:38 IST

शहर कार्यालयात मनसेने नावनोंदणी अभियान सुरु केले आहे

पुणे : पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून मनसैनिक अयोध्येसाठी सज्ज झाले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी राज ठाकरेंसोबत अयोध्येला यावे असे आवाहन मनसैनिकांकडून करण्यात येत आहे, त्यातच उत्तर प्रदेशमधील खासदार ब्रिजभूषण यांनी राज ठाकरे येऊ देणार नाही असे सांगितले आहे. त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी तरच त्यांचे अयोध्येत स्वागत केले जाईल. असंही ते म्हणाले होते. परंतु मनसेने या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष न देता अयोध्या दौऱ्याच्या जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. 

आज राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातही मनसेची अयोध्येला जाण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. शहर कार्यालयात मनसेने नावनोंदणी अभियान सुरु केले आहे. पुणे शहरातून ५ हजारच्या आसपास नागरिक अयोध्येला घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे. अशी माहिती शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

बाबर म्हणाले, अयोध्येसाठी आम्ही पुणे शहरातून नावनोंदणी सुरु केली आहे. त्यासाठी ''चला अयोध्या राज साहेबांसोबत'' असा फॉर्म तयार करण्यात आला आहे. आज दिवसभरात ४५० ते ५०० फॉर्म भरले गेले आहेत. कार्यकर्त्यांबरोबरच सामान्य नागरिकही अयोध्येला येण्यास उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. आमचा पुणे शहरातून जवळपास ५ हजार नागरिक अयोध्येला घेऊन जाण्याचा मानस आहे. 

नावनोंदणी अभियानात उत्तर भारतीयांचाही समावेश  नावनोंदणी सुरु असताना उत्तर भारतीय नागरिकांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ब्रिजभूषण यांचा विरोध वेगळा आहे. आम्ही उत्तर भारतीय २५ वर्षांपासून इथे महाराष्ट्रात राहत आहोत. महाराष्ट्रात राहून आम्ही पुढे गेलोय. मग उत्तर प्रदेश मध्ये सुखी झालो. त्यांना त्याच्याबद्दल काही माहित नाही. ते तिकडं बोलतात त्याचा त्रास आम्हाला इथं होतोय. आम्ही सगळे राज साहेबांसोबत अयोध्येला जाणार आहे. जवळपास २ ते ३ हजारचा ग्रुप महाराष्ट्रातून अयोध्येला जाणार आहे. राज साहेब करतात ते योग्य आहे. ब्रिजभूषणला साहेब काय बोलतात हे कळत नाही, त्यांना मराठी कळत नाही. त्याला काही माहित नाही. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात संघर्ष झाल्यास आम्ही राज साहेबांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.  

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेAyodhyaअयोध्याPoliticsराजकारण