शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरी परिसरातील पिंगोरी येथे भीषण आगीत सुमारे ३०० एकरांवरील वनसंपदा नष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 19:11 IST

पिंगोरी गावात मोठ्या प्रमाणात खासगी संरक्षित वन जमीन आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहे.

ठळक मुद्दे९ तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्याला वनविभागाला यश  शासकीय वनीकरण वाचवण्यासाठी वनविभागाने केले जीवाचे रान  

जेजुरी (नीरा) : पिंगोरी येथील खाजगी वनजमिनीला लागलेल्या आगीत तीनशे एकरावरील वनजमिनीतील वनसंपदा जाळून नष्ट झाली. वनविभागाच्या सलग ९ तासांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि ही आग नियंत्रणात आली. त्यामुळे मोठी अनर्थ टळला. मात्र, तरीही या आगीत ३०० एकरामधील वनसंपदा नष्ट झाली आहे. जेजुरी कडेपठारच्या पायथ्याला पिंगोरीच्या हद्दीत रविवारी (दि.१४) अज्ञात इसमाने खासगी डोंगरास आग लावली. यावेळी वनविभागाचे अधिकारी सर्व्हेसाठी आले होते. त्यांना कडेपठारच्या बाजूला मोठा धूर दिसल्याने पोलीस पाटील राहुल शिंदे, अधिकारी व ग्रामस्थ त्याठीकाणी गेले असता येथील डोंगराला मोठी आग लागल्याचे दिसले. यावेळी कोणताही विलंब न करता प्रथम आग विझवण्यास सुरवात केली. मात्र, आगीचे स्वरुप भीषण असल्याने यंत्र व आणखी कर्मचाऱ्यांची कुमक मागविण्यात आली. ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचारी अशा सर्वांच्या जवळपास ९ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली गेली. या कामात त्यांना पिंगोरी येथील बाबा शिंदे, अमोल शिंदे, बाळासाहेब शिंदे, सागर यादव, तुषार शिंदे व जवळ राहणारे नागरिक यांनी मदत केली.

.......................

 पिंगोरी गावात मोठ्या प्रमाणात खासगी संरक्षित वन जमीन आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहे. त्याच बरोबर शासकीय वनजमीन देखील मोठ्या प्रमाणात आहे. शासनाच्यावतीने यामध्ये मोठ्या प्रमाणात वनीकरण करण्यात आले आहे. पण अशा प्रकारच्या आगीमुळे या जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शासकीय पातळीवरून वन वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असले तरी लोकांकडून डोंगरांना आग लावण्याच्या अनेक घटना घडताना दिसतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होत आहे...............   शासकीय वनीकरण वाचवण्यासाठी वनविभागाने केले जीवाचे रान          आगीमध्ये जेजुरी मधील शासकीय वनीकरण केलेल्या जमिनीस मोठा धोका निर्माण झाला होता. जेजुरीच्या बाजूने शासनाने नुकतेच मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. ही आग तिथे गेली असती तर लाखो रुपये खर्चून करण्यात आलेले वनीकरण नष्ट झाले असते. मात्र, वनपाल वाय.जे.पाचरणे व वनरक्षक बाळासाहेब गोलांडे, कर्मचारी बाळू चव्हाण, महादेव थोरवे यांनी मोठे प्रयत्न करत या वनीकरणात जाणारी आग थोपवून धरली. त्यामुळे मोठे नुकसान टळले.        वाय.जे.पाचरणे ( वनरक्षक,पुरंदर )

.........           शासनस्तरावर वन वाढवण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. मात्र, काही लोकांच्या चुकांमुळे त्याची खुप मोठी किंमत मोजावी लागते आहे. काही लोक बांधावरच गवत काढण्याऐवजी ते पेटवतात आणि त्यामधून असे वनवे लागतात. लोकांनीही आता सामाजिक भान ठेवायला हवे. अन्यथा कितीही प्रयत्न केले तरी वनसंपदा वाढणार नाही. याची मोठी किंमत पुढे जावुन मोजावी लागेल. यापुढे असे वणवे लागण्यास कारणीभूत असणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल...............डोंगराला आग लावू नका असे याभागातील लोकांना वारंवार बजावले आहे. वन संपदा व तीचे महत्व काय आहे? याबाबत गावातील तरुण लोकांमध्ये जागृतही करीत आहे. मात्र तरीही लोक याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. यापुढे लोकांनी काळजी घ्यायला हवी. राहुल शिंदे (पोलीस पाटील, पिंगोरी ) 

टॅग्स :Jejuriजेजुरीforest departmentवनविभागfire brigade puneपुणे अग्निशामक दल