शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जेजुरी परिसरातील पिंगोरी येथे भीषण आगीत सुमारे ३०० एकरांवरील वनसंपदा नष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 19:11 IST

पिंगोरी गावात मोठ्या प्रमाणात खासगी संरक्षित वन जमीन आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहे.

ठळक मुद्दे९ तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्याला वनविभागाला यश  शासकीय वनीकरण वाचवण्यासाठी वनविभागाने केले जीवाचे रान  

जेजुरी (नीरा) : पिंगोरी येथील खाजगी वनजमिनीला लागलेल्या आगीत तीनशे एकरावरील वनजमिनीतील वनसंपदा जाळून नष्ट झाली. वनविभागाच्या सलग ९ तासांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि ही आग नियंत्रणात आली. त्यामुळे मोठी अनर्थ टळला. मात्र, तरीही या आगीत ३०० एकरामधील वनसंपदा नष्ट झाली आहे. जेजुरी कडेपठारच्या पायथ्याला पिंगोरीच्या हद्दीत रविवारी (दि.१४) अज्ञात इसमाने खासगी डोंगरास आग लावली. यावेळी वनविभागाचे अधिकारी सर्व्हेसाठी आले होते. त्यांना कडेपठारच्या बाजूला मोठा धूर दिसल्याने पोलीस पाटील राहुल शिंदे, अधिकारी व ग्रामस्थ त्याठीकाणी गेले असता येथील डोंगराला मोठी आग लागल्याचे दिसले. यावेळी कोणताही विलंब न करता प्रथम आग विझवण्यास सुरवात केली. मात्र, आगीचे स्वरुप भीषण असल्याने यंत्र व आणखी कर्मचाऱ्यांची कुमक मागविण्यात आली. ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचारी अशा सर्वांच्या जवळपास ९ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली गेली. या कामात त्यांना पिंगोरी येथील बाबा शिंदे, अमोल शिंदे, बाळासाहेब शिंदे, सागर यादव, तुषार शिंदे व जवळ राहणारे नागरिक यांनी मदत केली.

.......................

 पिंगोरी गावात मोठ्या प्रमाणात खासगी संरक्षित वन जमीन आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहे. त्याच बरोबर शासकीय वनजमीन देखील मोठ्या प्रमाणात आहे. शासनाच्यावतीने यामध्ये मोठ्या प्रमाणात वनीकरण करण्यात आले आहे. पण अशा प्रकारच्या आगीमुळे या जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शासकीय पातळीवरून वन वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असले तरी लोकांकडून डोंगरांना आग लावण्याच्या अनेक घटना घडताना दिसतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होत आहे...............   शासकीय वनीकरण वाचवण्यासाठी वनविभागाने केले जीवाचे रान          आगीमध्ये जेजुरी मधील शासकीय वनीकरण केलेल्या जमिनीस मोठा धोका निर्माण झाला होता. जेजुरीच्या बाजूने शासनाने नुकतेच मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. ही आग तिथे गेली असती तर लाखो रुपये खर्चून करण्यात आलेले वनीकरण नष्ट झाले असते. मात्र, वनपाल वाय.जे.पाचरणे व वनरक्षक बाळासाहेब गोलांडे, कर्मचारी बाळू चव्हाण, महादेव थोरवे यांनी मोठे प्रयत्न करत या वनीकरणात जाणारी आग थोपवून धरली. त्यामुळे मोठे नुकसान टळले.        वाय.जे.पाचरणे ( वनरक्षक,पुरंदर )

.........           शासनस्तरावर वन वाढवण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. मात्र, काही लोकांच्या चुकांमुळे त्याची खुप मोठी किंमत मोजावी लागते आहे. काही लोक बांधावरच गवत काढण्याऐवजी ते पेटवतात आणि त्यामधून असे वनवे लागतात. लोकांनीही आता सामाजिक भान ठेवायला हवे. अन्यथा कितीही प्रयत्न केले तरी वनसंपदा वाढणार नाही. याची मोठी किंमत पुढे जावुन मोजावी लागेल. यापुढे असे वणवे लागण्यास कारणीभूत असणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल...............डोंगराला आग लावू नका असे याभागातील लोकांना वारंवार बजावले आहे. वन संपदा व तीचे महत्व काय आहे? याबाबत गावातील तरुण लोकांमध्ये जागृतही करीत आहे. मात्र तरीही लोक याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. यापुढे लोकांनी काळजी घ्यायला हवी. राहुल शिंदे (पोलीस पाटील, पिंगोरी ) 

टॅग्स :Jejuriजेजुरीforest departmentवनविभागfire brigade puneपुणे अग्निशामक दल