शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

आपण खरंच स्वतंत्र आहोत का ? प्रतिभा राय यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 03:49 IST

आपण खरंच स्वतंत्र आहोत का? प्रत्येक मनुष्य हा धर्म, जात, भाषा यांची विशिष्ट ओळख घेऊन जन्माला येतो. यामध्येच मनुष्याची विभागणी झालेली आहे. या धर्म, जातीच्या भिंती तोडण्याचे काम हे साहित्य करते. लेखनाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करणे ही लेखकांची जबाबदारी आहे.

पुणे - आपण खरंच स्वतंत्र आहोत का? प्रत्येक मनुष्य हा धर्म, जात, भाषा यांची विशिष्ट ओळख घेऊन जन्माला येतो. यामध्येच मनुष्याची विभागणी झालेली आहे. या धर्म, जातीच्या भिंती तोडण्याचे काम हे साहित्य करते. लेखनाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करणे ही लेखकांची जबाबदारी आहे. त्यासाठी भीती बाळगण्याची गरज नाही. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ अशी गर्जना करीत समाजात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली होती. त्यामुळे लेखकांवर कुणीही बंधनं घालू शकत नाही, अशा शब्दांत ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध उडिया लेखिका डॉ. प्रतिभा राय यांनी देशातील असहिष्णुतेवर टीका केली.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११२व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रंथ आणि ग्रंथकार पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या वेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, चंद्रकांत शेवाळे, परिषदेचे विश्वस्त डॉ. शिवाजीराव कदम, माजी आमदार उल्हास पवार उपस्थित होते.सुरुवातीलाच ‘‘महाराष्ट्राच्या भूमीला वंदन करीत आहे, या मातीत जन्माला आलेल्या शूरवीर, ज्ञानी, गुणीजन व्यक्तींना सादर प्रणाम करते. मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे,’’ अशा मराठी बोलातून प्रतिभा राय यांनी पुणेकरांची मने जिंकली. त्या म्हणाल्या, ‘‘लेखकाच्या लेखणीमध्ये देवाला आव्हान देण्याबरोबरच हे काय चालले आहे? असा जाब विचारून शत्रुत्व स्वीकारण्याइतकी ताकद आहे. भयमुक्त भारत होणार नाही तोपर्यंत ही पृथ्वी भयमुक्त होणार नाही. देशात धर्म, जात, असमानता यातून उद्भवणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर लेखकांनी प्रहार करायला हवा.’’या वेळी ग्रंथ आणि ग्रंथकार पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ माधव गाडगीळ, मकुंद दातार, प्रतिभा रानडे या पारितोषिक विजेत्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.राज्यघटना तिजोरीत बंद४रावसाहेब कसबे म्हणाले, भारतात सध्या भयमुक्त वातावरण आहे, असे म्हणता येणार नाही. लोक म्हणतात, राज्यघटना सुरक्षित आहे पण वस्तुस्थिती पाहिली तर घटना देशाच्या तिजोरीत बंद करून ठेवल्याचे चित्र आहे. हिंदू आणि मुस्लिम वाद या विषयापुढे तरुणांचा रोजगार, ज्येष्ठांना मिळणारी पेन्शन, स्त्रियांचे हक्क असे विषय तुरळक होत चालले आहेत. गायीभोवती देशाचे राजकारण फिरत आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे, अशा वेळेला साहित्यिकाने केवळ साहित्यविश्वात रमून उपयोग नाही. जगातल्या सगळ्या क्रांतींचा पाया साहित्यिकांनी रचला आहे.पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन४मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे, याकडे प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविकात लक्ष वेधले. येत्या कालखंडात अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केला नाही तर मराठी जनता पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर जाऊन आंदोलन करेल. 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या