शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

आपण खरंच स्वतंत्र आहोत का ? प्रतिभा राय यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 03:49 IST

आपण खरंच स्वतंत्र आहोत का? प्रत्येक मनुष्य हा धर्म, जात, भाषा यांची विशिष्ट ओळख घेऊन जन्माला येतो. यामध्येच मनुष्याची विभागणी झालेली आहे. या धर्म, जातीच्या भिंती तोडण्याचे काम हे साहित्य करते. लेखनाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करणे ही लेखकांची जबाबदारी आहे.

पुणे - आपण खरंच स्वतंत्र आहोत का? प्रत्येक मनुष्य हा धर्म, जात, भाषा यांची विशिष्ट ओळख घेऊन जन्माला येतो. यामध्येच मनुष्याची विभागणी झालेली आहे. या धर्म, जातीच्या भिंती तोडण्याचे काम हे साहित्य करते. लेखनाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करणे ही लेखकांची जबाबदारी आहे. त्यासाठी भीती बाळगण्याची गरज नाही. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ अशी गर्जना करीत समाजात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली होती. त्यामुळे लेखकांवर कुणीही बंधनं घालू शकत नाही, अशा शब्दांत ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध उडिया लेखिका डॉ. प्रतिभा राय यांनी देशातील असहिष्णुतेवर टीका केली.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११२व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रंथ आणि ग्रंथकार पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या वेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, चंद्रकांत शेवाळे, परिषदेचे विश्वस्त डॉ. शिवाजीराव कदम, माजी आमदार उल्हास पवार उपस्थित होते.सुरुवातीलाच ‘‘महाराष्ट्राच्या भूमीला वंदन करीत आहे, या मातीत जन्माला आलेल्या शूरवीर, ज्ञानी, गुणीजन व्यक्तींना सादर प्रणाम करते. मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे,’’ अशा मराठी बोलातून प्रतिभा राय यांनी पुणेकरांची मने जिंकली. त्या म्हणाल्या, ‘‘लेखकाच्या लेखणीमध्ये देवाला आव्हान देण्याबरोबरच हे काय चालले आहे? असा जाब विचारून शत्रुत्व स्वीकारण्याइतकी ताकद आहे. भयमुक्त भारत होणार नाही तोपर्यंत ही पृथ्वी भयमुक्त होणार नाही. देशात धर्म, जात, असमानता यातून उद्भवणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर लेखकांनी प्रहार करायला हवा.’’या वेळी ग्रंथ आणि ग्रंथकार पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ माधव गाडगीळ, मकुंद दातार, प्रतिभा रानडे या पारितोषिक विजेत्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.राज्यघटना तिजोरीत बंद४रावसाहेब कसबे म्हणाले, भारतात सध्या भयमुक्त वातावरण आहे, असे म्हणता येणार नाही. लोक म्हणतात, राज्यघटना सुरक्षित आहे पण वस्तुस्थिती पाहिली तर घटना देशाच्या तिजोरीत बंद करून ठेवल्याचे चित्र आहे. हिंदू आणि मुस्लिम वाद या विषयापुढे तरुणांचा रोजगार, ज्येष्ठांना मिळणारी पेन्शन, स्त्रियांचे हक्क असे विषय तुरळक होत चालले आहेत. गायीभोवती देशाचे राजकारण फिरत आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे, अशा वेळेला साहित्यिकाने केवळ साहित्यविश्वात रमून उपयोग नाही. जगातल्या सगळ्या क्रांतींचा पाया साहित्यिकांनी रचला आहे.पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन४मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे, याकडे प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविकात लक्ष वेधले. येत्या कालखंडात अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केला नाही तर मराठी जनता पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर जाऊन आंदोलन करेल. 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या