शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

महामानवांच्या विचारांवर आपण चालत आहोत का? - विद्या बाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 02:00 IST

हल्लीच्या काळात उत्सवांचे उदात्तीकरण आणि धांगडधिंगात रूपांतर झाले आहे, ते अत्यंत दु:खदायक आहे. ज्या लोकांच्या नावाने उत्सव साजरे करतो त्यांच्या फोटो, पुतळ्यासमोर ज्या बीभत्स पद्धतीने नाचतो हे योग्य आहे का, याचादेखील विचार होणे गरजेचे आहे.

पुणे - हल्लीच्या काळात उत्सवांचे उदात्तीकरण आणि धांगडधिंगात रूपांतर झाले आहे, ते अत्यंत दु:खदायक आहे. ज्या लोकांच्या नावाने उत्सव साजरे करतो त्यांच्या फोटो, पुतळ्यासमोर ज्या बीभत्स पद्धतीने नाचतो हे योग्य आहे का, याचादेखील विचार होणे गरजेचे आहे. महामानवांनी आपणांस जो संदेश, विचार दिला आहे, त्या विचारपथावर आपण चालत आहोत का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केले.महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या १२२व्या जयंतीनिमित्त ‘जागर रमार्इंच्या विचारांचा देशाच्या हिताचा’ या अभियनाअंतर्गत रमाई महोत्सवात विद्या बाळ यांना महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीतर्फे ज्येष्ठ कवयित्री प्रतिभाताई शाहू-मोडक यांच्या हस्ते ‘रमाईरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. राज्याचे कारागृह व सुधारसेवाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव, अभय छाजेड, कुणाल राजगुरू, सुजाता शेट्टी, लता राजगुरू, अ‍ॅड. जयदेव गायकवाड, दादा सोनवणे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोठे होतेच. त्यांचे जगभर विचारवंत म्हणून नाव होते. परंतु हे होत असताना ज्या रमाईने प्रचंड कष्ट उपसले, बाबासाहेबांच्या खडतर प्रवासात त्यांना साथ दिली त्या महामाता रमामार्इंचे योगदान मात्र दुर्लक्षित राहिले असल्याची खंतही बाळ यांनी व्यक्त केली. अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले.बाळ म्हणाल्या, बाबासाहेबांनी जाती निर्मूलनाचा विचार मांडला पंरतु आजदेखील ती जात नष्ट झालेली नाही. जातींचे निर्मूलन ही काळाची गरज आहे. ज्यांनी समतेचा विचार मांडला, रुजवला आणि समतेचा विचार आचारणात आणला अशा सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मरणार्थ सावित्री-ज्योतिबा समता उत्सव साजरा करतो. मात्र त्या महामानवांनी आपणांस जो संदेश, विचार दिला आहे, त्या विचारपथावर आपण चालत आहोत का, हा प्रश्न प्रत्येकाने विचारणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :Vidya Balविद्या बाळPuneपुणे