शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

महामानवांच्या विचारांवर आपण चालत आहोत का? - विद्या बाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 02:00 IST

हल्लीच्या काळात उत्सवांचे उदात्तीकरण आणि धांगडधिंगात रूपांतर झाले आहे, ते अत्यंत दु:खदायक आहे. ज्या लोकांच्या नावाने उत्सव साजरे करतो त्यांच्या फोटो, पुतळ्यासमोर ज्या बीभत्स पद्धतीने नाचतो हे योग्य आहे का, याचादेखील विचार होणे गरजेचे आहे.

पुणे - हल्लीच्या काळात उत्सवांचे उदात्तीकरण आणि धांगडधिंगात रूपांतर झाले आहे, ते अत्यंत दु:खदायक आहे. ज्या लोकांच्या नावाने उत्सव साजरे करतो त्यांच्या फोटो, पुतळ्यासमोर ज्या बीभत्स पद्धतीने नाचतो हे योग्य आहे का, याचादेखील विचार होणे गरजेचे आहे. महामानवांनी आपणांस जो संदेश, विचार दिला आहे, त्या विचारपथावर आपण चालत आहोत का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केले.महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या १२२व्या जयंतीनिमित्त ‘जागर रमार्इंच्या विचारांचा देशाच्या हिताचा’ या अभियनाअंतर्गत रमाई महोत्सवात विद्या बाळ यांना महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीतर्फे ज्येष्ठ कवयित्री प्रतिभाताई शाहू-मोडक यांच्या हस्ते ‘रमाईरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. राज्याचे कारागृह व सुधारसेवाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव, अभय छाजेड, कुणाल राजगुरू, सुजाता शेट्टी, लता राजगुरू, अ‍ॅड. जयदेव गायकवाड, दादा सोनवणे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोठे होतेच. त्यांचे जगभर विचारवंत म्हणून नाव होते. परंतु हे होत असताना ज्या रमाईने प्रचंड कष्ट उपसले, बाबासाहेबांच्या खडतर प्रवासात त्यांना साथ दिली त्या महामाता रमामार्इंचे योगदान मात्र दुर्लक्षित राहिले असल्याची खंतही बाळ यांनी व्यक्त केली. अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले.बाळ म्हणाल्या, बाबासाहेबांनी जाती निर्मूलनाचा विचार मांडला पंरतु आजदेखील ती जात नष्ट झालेली नाही. जातींचे निर्मूलन ही काळाची गरज आहे. ज्यांनी समतेचा विचार मांडला, रुजवला आणि समतेचा विचार आचारणात आणला अशा सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मरणार्थ सावित्री-ज्योतिबा समता उत्सव साजरा करतो. मात्र त्या महामानवांनी आपणांस जो संदेश, विचार दिला आहे, त्या विचारपथावर आपण चालत आहोत का, हा प्रश्न प्रत्येकाने विचारणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :Vidya Balविद्या बाळPuneपुणे