शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

महामानवांच्या विचारांवर आपण चालत आहोत का? - विद्या बाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 02:00 IST

हल्लीच्या काळात उत्सवांचे उदात्तीकरण आणि धांगडधिंगात रूपांतर झाले आहे, ते अत्यंत दु:खदायक आहे. ज्या लोकांच्या नावाने उत्सव साजरे करतो त्यांच्या फोटो, पुतळ्यासमोर ज्या बीभत्स पद्धतीने नाचतो हे योग्य आहे का, याचादेखील विचार होणे गरजेचे आहे.

पुणे - हल्लीच्या काळात उत्सवांचे उदात्तीकरण आणि धांगडधिंगात रूपांतर झाले आहे, ते अत्यंत दु:खदायक आहे. ज्या लोकांच्या नावाने उत्सव साजरे करतो त्यांच्या फोटो, पुतळ्यासमोर ज्या बीभत्स पद्धतीने नाचतो हे योग्य आहे का, याचादेखील विचार होणे गरजेचे आहे. महामानवांनी आपणांस जो संदेश, विचार दिला आहे, त्या विचारपथावर आपण चालत आहोत का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केले.महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या १२२व्या जयंतीनिमित्त ‘जागर रमार्इंच्या विचारांचा देशाच्या हिताचा’ या अभियनाअंतर्गत रमाई महोत्सवात विद्या बाळ यांना महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीतर्फे ज्येष्ठ कवयित्री प्रतिभाताई शाहू-मोडक यांच्या हस्ते ‘रमाईरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. राज्याचे कारागृह व सुधारसेवाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव, अभय छाजेड, कुणाल राजगुरू, सुजाता शेट्टी, लता राजगुरू, अ‍ॅड. जयदेव गायकवाड, दादा सोनवणे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोठे होतेच. त्यांचे जगभर विचारवंत म्हणून नाव होते. परंतु हे होत असताना ज्या रमाईने प्रचंड कष्ट उपसले, बाबासाहेबांच्या खडतर प्रवासात त्यांना साथ दिली त्या महामाता रमामार्इंचे योगदान मात्र दुर्लक्षित राहिले असल्याची खंतही बाळ यांनी व्यक्त केली. अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले.बाळ म्हणाल्या, बाबासाहेबांनी जाती निर्मूलनाचा विचार मांडला पंरतु आजदेखील ती जात नष्ट झालेली नाही. जातींचे निर्मूलन ही काळाची गरज आहे. ज्यांनी समतेचा विचार मांडला, रुजवला आणि समतेचा विचार आचारणात आणला अशा सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मरणार्थ सावित्री-ज्योतिबा समता उत्सव साजरा करतो. मात्र त्या महामानवांनी आपणांस जो संदेश, विचार दिला आहे, त्या विचारपथावर आपण चालत आहोत का, हा प्रश्न प्रत्येकाने विचारणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :Vidya Balविद्या बाळPuneपुणे