शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

जनावरांचा आहार सकस, प्रमाणित असावा - श्रीराम पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 03:29 IST

रवंथ करणाऱ्या प्राण्यांना पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ घातल्यास त्रास होतो. पिष्टमय पदार्थांप्रमाणेच कर्बोदके, फायबर हे घटक पदार्थही मर्यादित प्रमाणात आहारात समाविष्ट करावे लागतात.

रवंथ करणाऱ्या प्राण्यांना पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ घातल्यास त्रास होतो. पिष्टमय पदार्थांप्रमाणेच कर्बोदके, फायबर हे घटक पदार्थही मर्यादित प्रमाणात आहारात समाविष्ट करावे लागतात. कोणत्याही घटक पदार्थाचे प्रमाण वाढल्यास जनावरांना अपचनाचा, पोटशूळीचा त्रास होण्याची शक्यता असते. जनावरांना नुसती पेंड खाऊ घातली तरी त्रास होण्याची शक्यता असते. वैरण, हिरवा चारा, पेंड याबाबतचे प्रमाण ठरवण्याची गरज असते. नियमित तपासणी आणि सकस आहार जनावरांसाठी आवश्यक असल्याचे मत पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रीराम पवार यांनी व्यक्त केले.संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालखी सोहळ्यातील ‘हिरा’ हा अश्व आळंदीपासून आजारी होता. उपचार सुरू असताना तो पालखीबरोबर पुण्याकडे निघाला होता. मात्र, पुण्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याला पोटशूळ या आजाराचे निदान झाले. पालखी सोहळ्यातील बैल व घोडे यांची काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पशुसंवर्धन पथकाची स्थापना करण्यात येते. यंदाच्या पथकात खेड व हवेली या दोन तालुक्यातील अधिकाºयांचा समावेश आहे. आळंदी येथे खेडमधील पथकाने या अश्वावर उपचार केले होते. त्याची प्रकृती सुधारल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली होती. पुण्यात भवानी पेठ येथे आल्यानंतर हवेली तालुक्यातील ललिता गावडे यांच्या पथकाने अश्वावर उपचार केला. वर्षभर आराम करणाºया प्राण्यांना दूर अंतर चावण्याची सवय नसते. आळंदी ते पुणे हे अंतरही मोठे आहे. अचानक गर्दीमध्ये चालण्याचीसुद्धा त्यांना सवय नसते. त्यामुळे हे प्राणी घाबरून जातात. तसेच या अश्वाला पोटशूळ (कोलिक) हा पोटाचा आजार होता. चुकीचे पदार्थ पोटात गेल्याने त्याचे पोट फुगलेले दिसत होते. शनिवारी रात्री १२ वाजता या अश्वावर उपचार करण्यात आले होते. रविवारी सकाळी तो उठून उभा राहिला होता. मात्र, काही वेळानंतर तो जमिनीवर कोसळला त्यानंतर मृत्यू झाला. रवंथ करणाºया प्राण्यांना पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ घातल्यास त्रास होतो. पिष्टमय पदार्थांप्रमाणेच कर्बोदके, फायबर हे घटक पदार्थही मर्यादित प्रमाणात आहारात समाविष्ट करावे लागतात. कोणत्याही घटक पदार्थाचे प्रमाण वाढल्यास जनावरांना अपचनाचा, पोटशूळीचा त्रास होण्याची शक्यता असते. जनावरांना नुसती पेंड खाऊ घातली तरी त्रास होण्याची शक्यता असते. वैरण, हिरवा चारा, पेंड याबाबतचे प्रमाण ठरवण्याची गरज असते.घोड्यांमध्ये मंडे मॉर्निंग सिकनेस हा आजार आढळून येतो. खूप आराम केल्यानंतर अचानक जास्त अंतर धावल्यास अगर चालल्यास घोड्यांच्या स्नायूंमध्ये आम्लाचे प्रमाण वाढते. त्यामुळे पोटदुखीची, गॅसेसची शक्यता वाढते. अचानक अशा प्रकारचा त्रास उद्भवल्यास वेदनाशामक औषधे दिली जातात. अशा परिस्थितीत जनावरांना आरामाची, वेळेवर औषधोपचारांची गरज असते. अशा वेळी खाण्यापिण्याचीही काळजी घ्यावी लागते.दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांसाठी बºयाचदा चारा उपलब्ध होत नाही. अशा वेळी कोकणासह भोर, वेल्हा, मुळशी भागात जनावरांचा भाताचा पेंढा खाऊ घातला जातो. या पेंढ्यावर युरिया ट्रीटमेंट केल्यास तर त्यातील प्रोटिनचे प्रमाण वाढल्यास तो आहार अधिक सकस होतो. उसाचे वाढे खाऊ घातल्यास फॉस्फरस कमी होते आणि विषबाधा होऊ शकते. बºयाचदा, विषारी वनस्पतीही जनावरांकडून नकळतपणे खाल्ल्या जातात. त्यामुळेही त्रास होऊ शकतो. जनावरांची, विशेषत: पालखीतील, शर्यतीतील बैल-घोडे यांची नियमित तपासणी करणे गरजेचे असते. घोड्याचे आयुर्मान २५ ते ३० वर्षे, तर बैलाचे आयुर्मान १५ ते २० वर्षे असते. प्राण्यांची देखभाल कशी केली जाते, यावर त्यांची कार्यक्षमता अवलंबून असते. पशुपालकांमध्ये जागरुकता वाढत असल्याने आणि अद्ययावत उपचार, तपासणी उपलब्ध असल्याने जनावरांची आगाऊ काळजी घेता येते.घोडे पालखीला मार्गस्थ होण्याच्या चार दिवस आधीपासून त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. वारीमध्ये डॉक्टरांचे पथक नेमले जाते. एका पथकामध्ये चार-पाच डॉक्टरांचा समावेश असतो. मुक्कामाच्या ठिकाणी तसेच ज्या कार्यक्षेत्रातून पालखी जाणार आहे, तेथील पशुवैद्यकीय दवाखान्यांना सतर्क केले जाते.

टॅग्स :cowगायnewsबातम्या