शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

जुळून आल्या रेशीमगाठी! घरात झाल्या सप्तपदी अन् घुमले मंगलाष्टकांचे स्वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 21:55 IST

कोरोनामुळे घरातच मुहूर्त साधत केले कन्यादान 

ठळक मुद्देसमाजाला एक वेगळा आदर्श घालून देत जमावबंदीची पायमल्ली करणाऱ्या महाभागांना सणसणीत चपराक

 बेलाजी पात्रे -

वाकड : संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनाचे सर्वच स्तरावर दुरगामी परिणाम झाले आहेत. या महाभीषण संकटामुळे छोट्या  मोठ्या उद्योग धंद्यांसह सगळ्यांनाच अडचणीत आणले . त्याचसोबत समाजातले अनेक मंगलकार्ये, धार्मिक सोहळे यांच्यावर देखील संक्रांत कोसळली..मात्र या गंभीर परिस्थिती देखील समाजभान जपण्याची जबाबदारी काहीजण उचलतात आणि समाजात एक आदर्श  निर्माण करतात. त्याच पार्श्वभूमीवर घडलेली घटना म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक भान ठेवत नेरेतील (मुळशी) पित्याने कुठलाही गाजावाजा न करता आपल्या लाडक्या एकुलत्या एक कन्येचे राहत्या घरातुनच कन्यादान करत विवाह सोहळा पार पाडला. या कौतुकास्पद कृतीतून या कुटुंबांनी समाजाला एक वेगळा आदर्श घालून देत जमावबंदीची पायमल्ली करणाऱ्या महाभागांना सणसणीत चपराक लगावली आहे.  प्रेरणा शिक्षण संस्थेच्या तुकाई माध्यमिक विद्यालयात सेवक असलेल्या अनिल जाधव यांची कन्या मेनका उर्फ अस्मिता हिचे कुसगाव (मावळ) येथील राजाराम केदारी यांचे यांचे चिरंजीव अनिकेत यांच्याशी रेशीमगाठी जुळली. त्यानुसार ८ डिसेंबर २०१९ रोजी साखरपुडा संपन्न झाला आणि याच बैठकीत १५ एप्रिल ही लग्नाची तारीख देखील पक्की झाल्याने जाधव आणि केदारी या दोनही घरी आनंदाचे वातावरण होते. जस-जशी लग्न घटिका समीप येत होती तसे घरात मांडव वारे वाहू लागले, लग्नाची लगबग सुरू झाली मात्र पुढे मार्च महिना आला आणि सर्व आनंदावर विरजण पडले. जनता कर्फ्यु व लॉक डाऊनमुळे सर्व लग्न सोहळ्यावर निर्बंध आले, संपूर्ण नियोजन ढासळले. लग्न पुढे ढकलण्याच्या घालमिलीत दोनही कुटुंब असताना अखेर वधू पिता अनिल जाधव यांनी पुढाकार घेत परस्थितीचे गांभिर्य सर्वांच्या लक्षात आणून देत कुठलाही थाट माट न करता घरातील सदस्यांसमवेत घरीच मुलीचे हात पिवळे करून देण्याचा पर्याय ठेवला. या निर्णयाचे वर अनिकेत व त्यांच्या कुटीबीयांनी तसेच वधू मेनका यांनी स्वागत केले त्यामुळे केवळ घराच्या सदस्यांच्या साक्षीने अगदी साध्या पद्धतीने सकाळच्या मुहूर्तावर विवाह सोहळा संपन्न झाला. मात्र, यावेळी देखील सोशल डिस्टन्सचे नियम सर्व पाळण्यात आले.  सामाजिक जबाबदारीचे व सुरक्षिततेचे भान ठेवून वऱ्हाडी , बँडबजा, जेवणावळीच्या पंक्ती, मिरवणूक, सनई- चौघडांच्या विरहित घरातूनच मंगलाष्टकांचे स्वर घुमले. हा अजब व सामाजिक संदेश देणारा लग्न सोहळा पार पडल्याने पंचक्रोशीतुन जाधव आणि केदारी कुटुंबियांच्या सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडwakadवाकडmarriageलग्नCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस