शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

आम्रपाली चव्हाण यांची जागतिक शांततेसाठी भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 23:39 IST

नऊ वर्षांपूर्वी ( १३ फेब्रुवारी २०१० ) रोजी पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात अनेकांचे बळी गेले.

कामशेत : नऊ वर्षांपूर्वी ( १३ फेब्रुवारी २०१० ) रोजी पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात अनेकांचे बळी गेले. तर या बॉम्बस्फोटातून बचावलेल्या व गंभीररीत्या जखमी झालेल्या एका युवतीने प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या शरीरावरील वेदनांवर विजय मिळवला. आपल्याला भेटलेले ह्या नवीन जीवनाचे सार्थक करण्यासाठी जगाला शांततेचा संदेश देण्याचा मानस केला. आणि फ्लाय फोर पिस म्हणत जगाला शांततेचा संदेश देत कामशेत शहराजवळील डोंगरावरून बुधवार ( दि. १३ ) पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून अवकाशात उतुंग भरारी घेतली.१३ फेब्रुवारी २०१० रोजी पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात बचावलेली आम्रपाली चव्हाण ही युवती जखमी झाली होती. ( आम्रपालीला ६० टक्के अपंगत्व आले होते व ती ५४ टक्के भाजली होती. ) या बॉम्बस्फोटात झालेल्या आघातावर ती सुमारे ६० दिवस आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत होती. यावेळी आम्रपाली वर सुमारे सात मोठ्या शस्त्रक्रिया आणि तीनशे विनाशस्त्रक्रिया व उपचार झाले आहेत. यातून सावरत ती पुन्हा जगण्यास सज्ज झाली. आपल्याला मिळालेले बोनस आयुष्य जगताना जगाला शांततेचा संदेश देण्याचा उद्देश मनाशी बाळगून अम्रापालीने जीवनाची नवीन सुरुवात केली.आपण अपंग असून सुद्धा पॅराग्लायडिंग या साहसी प्रकारातून आकाशात उंच भरारी घेत तिने जगाला शांततेचा संदेश दिला आहे.यावेळी तिला ऑरेंज लाईफ ऍडव्हेंचर चे विजय सोनी, सुभाष शेवाळे, सनी कोळेकर, विकास आंद्रे, सौरव आंद्रे, अविनाश जाधव आदींनी प्रशिक्षण दिले. अम्रापालीच्या गगन भरारीची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड घेणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. तर पुढील मोहिमेत तिने माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा संकल्प केला आहे. तर तिचे साहस व जिद्द पाहून प्रोत्साहित झालेल्या ध्रुव सायखेडकर या १३ वर्षाच्या मुलानेही यावेळी साहसी पॅराग्लायडिंग करून तिच्या कार्यात सहभाग घेतला. पॅराग्लायडिंग करणारा ध्रुव सायखेडकर हा सर्वात तरुण मुलगा ठरला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ध्रुव फौंडेशन च्या वतीने करण्यात आले होते. कामशेत जवळील पिंपळोली गावाच्या हद्दीत झालेल्या कार्यक्रमात सुचारिता कनकरत्नम, यशवंत मानखेडकर, सुबोध सायखेडकर, रुपाली सायखेडकर, पिंपळोली गावच्या सरपंच रेश्मा संदीप बोंबले, पोलीस पाटील दिपाली मानकु बोंबले, ताजे गावाचे पोलीस पाटील गंगाराम केदारी, कामशेत पोलीस ठाण्याचे राम कानगुडे, दत्ता शिंदे आदींसह ग्रामस्थ व लहान मुले, मोठ्या संख्येने उपस्थित होते.-------------मी उंच भरारी घेतली आहे, कारण मला आतंकवाद्यांना दाखवून द्यायचं आहे कि आम्ही भारतीय कोणालाही घाबरत नाही. आतंकवादीनी बॉम्बस्फोट करून काय मिळवले, आम्ही भारतीय जगाला शांततेचा संदेश देण्यासाठी आलो आहोत.- आम्रपाली चव्हाण