शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

उदयनराजे भोसलेंनी खासदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे : अमोल मिटकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 14:27 IST

सध्याच्या परिस्थितीत शिंदेगट आणि भाजप या दोन्ही गटातील काही आमदारांत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे....

दौंड (पुणे) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील तीन तर भाजपचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा विश्वास आमदार अमोल मिटकरी यांनी दौंड येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्या दिवशी शिंदे- फडणवीस यांचे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही, असेही मिटकरी यांनी स्पष्ट केले.

सध्याच्या परिस्थितीत शिंदेगट आणि भाजप या दोन्ही गटातील काही आमदारांत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. शिंदे गटातील काही आमदारांना विश्वास आहे की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडून येऊ शकतो, त्यानुसार शिंदे गटाचे तीन आमदार येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले असतील . त्या पाठोपाठ भाजपचे काही आमदार या दोन्ही गटातील आमदारांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली असून लवकरच हा राजकीय भूकंप होणार असल्याचे मिटकरी यांनी स्पष्ट केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपच्या काही वाचाळविरांनी राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्याचा सपाटा लावला आहे, तेव्हा महाराष्ट्रात वाचाळविचारांविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. परिणामी, खुद्द भाजप आणि शिंदे गटाच्या काही मंत्री आणि आमदारांनीदेखील राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्या वाचाळांबाबत संताप व्यक्त केलेला आहे. कर्नाटक सरकार मराठी माणसांवर अन्याय करीत आहे. मात्र, शिंदे आणि फडणवीस सरकार या प्रश्नावर गप्प आहे, ही महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी बाब आहे, असंही मिटकरी म्हणाले.

राज्यपाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतील आहे. परिणामी, राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना राज्यपालांपुढे नमते घ्यावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. मुळातच राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून काम करण्याची इच्छा नाही. दरम्यान, काहीतरी वादग्रस्त विधान केले तर आपली महाराष्ट्रातून हकालपट्टी होईल, म्हणून राज्यपालांनी वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्य करीत असल्याचे शेवटी मिटकरी म्हणाले.

उदयनराजे यांनी राजीनामा द्यावा

शिवरायांचे वारसदार आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधानांना राज्यपालांच्या तक्रारीचे पत्र पाठवले. वास्तविक पाहता शिवरायांचा वेळोवेळी होत असलेला अपमान पाहता उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. मात्र, त्यांनी भाजपपुढे नमते घेतल्याची वस्तुस्थिती असल्याचे शेवटी अमोल मिटकरी म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAmol Mitkariअमोल मिटकरीUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेMaharashtraमहाराष्ट्रchandrakant patilचंद्रकांत पाटील