शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

बियाणे, खते विक्री कायद्यातील सुधारणा खंडणी वसुलीसाठीच; रघुनाथ पाटील यांचा आरोप

By नितीन चौधरी | Updated: November 20, 2023 15:32 IST

सुधारित कायदा आल्यास ७० हजार दुकानदार अडचणीत...

पुणे : “राज्य सरकार बियाणे आणि खते विक्रीसंबंधीच्या कायद्यात सुधारणा करणार आहे. या कायद्यात सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांना कारवाईच्या कक्षेतून बाजूला ठेवून बनावट, नकली बियाणे, खते विक्रीप्रकरणी केवळ विक्रेत्यांनाच दोषी धरून त्यांच्यावर सराईत गुंडांसारखी कारवाई प्रस्तावित केली आहे. विक्रेते, उत्पादक कंपन्यांकडून खंडणी वसुलीसाठीच हा कायदा आणला जात आहे,” असा आरोप शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केला.

ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपेट, राधाकृष्ण गडदे, पांडुरंग रायते उपस्थित होते. ते म्हणाले, “हा कायदा येत्या अधिवेशनात पारित झाल्यास राज्यातील ७० हजार कृषी बियाणे, खते विक्रेते अडचणीत येणार आहेत. त्यांनी बियाणे, खते विक्री बंद केली तर शेतकरी अडचणीत येईल. या दुकानदारांनी त्यांचा व्यवसाय बंद केल्यास शेतकरी अडचणीत येतील. तसेच या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यास संबंधितांना जामीन मिळणार नाही. यामुळे दुकानदार व्यवसाय करणार नाहीत. या प्रस्तावित कायद्याच्या भीतीपोटी अनेक कंपन्यांनी राज्यात व्यवसाय करणार नसल्याचे पत्र संघटनेला दिले आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर कृषी विभागाकडूनच चौकशी केली जाणार आहे. वास्तविक अशा प्रकरणांमध्ये कृषी विभागालाही जबाबदार धरण्याची तरतूद पूर्वीच्या कायद्यात होती. मात्र, नव्या कायद्यानुसार कृषी विभाग चौकशी करणार असल्यास त्यांना रान मोकळे होऊन त्यातून खंडणी वसुलीचे प्रकार होण्याची शक्यता जास्त आहे.”

या कायद्याला विरोध म्हणून राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेते ५ डिसेंबरपासून बेमुदत आंदोलन करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आणखीनच हाल होतील. म्हणून हे सरकारच बदलावे लागेल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड