शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

बियाणे, खते विक्री कायद्यातील सुधारणा खंडणी वसुलीसाठीच; रघुनाथ पाटील यांचा आरोप

By नितीन चौधरी | Updated: November 20, 2023 15:32 IST

सुधारित कायदा आल्यास ७० हजार दुकानदार अडचणीत...

पुणे : “राज्य सरकार बियाणे आणि खते विक्रीसंबंधीच्या कायद्यात सुधारणा करणार आहे. या कायद्यात सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांना कारवाईच्या कक्षेतून बाजूला ठेवून बनावट, नकली बियाणे, खते विक्रीप्रकरणी केवळ विक्रेत्यांनाच दोषी धरून त्यांच्यावर सराईत गुंडांसारखी कारवाई प्रस्तावित केली आहे. विक्रेते, उत्पादक कंपन्यांकडून खंडणी वसुलीसाठीच हा कायदा आणला जात आहे,” असा आरोप शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केला.

ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपेट, राधाकृष्ण गडदे, पांडुरंग रायते उपस्थित होते. ते म्हणाले, “हा कायदा येत्या अधिवेशनात पारित झाल्यास राज्यातील ७० हजार कृषी बियाणे, खते विक्रेते अडचणीत येणार आहेत. त्यांनी बियाणे, खते विक्री बंद केली तर शेतकरी अडचणीत येईल. या दुकानदारांनी त्यांचा व्यवसाय बंद केल्यास शेतकरी अडचणीत येतील. तसेच या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यास संबंधितांना जामीन मिळणार नाही. यामुळे दुकानदार व्यवसाय करणार नाहीत. या प्रस्तावित कायद्याच्या भीतीपोटी अनेक कंपन्यांनी राज्यात व्यवसाय करणार नसल्याचे पत्र संघटनेला दिले आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर कृषी विभागाकडूनच चौकशी केली जाणार आहे. वास्तविक अशा प्रकरणांमध्ये कृषी विभागालाही जबाबदार धरण्याची तरतूद पूर्वीच्या कायद्यात होती. मात्र, नव्या कायद्यानुसार कृषी विभाग चौकशी करणार असल्यास त्यांना रान मोकळे होऊन त्यातून खंडणी वसुलीचे प्रकार होण्याची शक्यता जास्त आहे.”

या कायद्याला विरोध म्हणून राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेते ५ डिसेंबरपासून बेमुदत आंदोलन करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आणखीनच हाल होतील. म्हणून हे सरकारच बदलावे लागेल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड