शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

आंबिलओढा पूरग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 12:45 IST

गेल्या महिन्यात २५ सप्टेंबरला रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबिलओढ्याला पूर आला. त्यामुळे काठच्या वसाहती आणि अपार्टमेंटमध्ये पाणी घुसले...

ठळक मुद्देमदतनिधी देण्याची मागणी : धोकादायक घरातून नागरिकांचे पुनर्वसन करा 

पुणे : सप्टेंबर महिन्यात आंबिलओढ्याला आलेल्या पुरात घराचे आणि संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झालेल्यांना तातडीने २० हजारांची मदत द्यावी, तीन महिन्यांचा शिधा द्यावा, घराची आणि पाण्याच्या नळांची डागडुजी करून द्यावी, या मागण्यांसाठी दांडेकर पूल वसाहत परिसरातील पूरग्रस्तांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. गेल्या महिन्यात २५ सप्टेंबरला रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबिलओढ्याला पूर आला. त्यामुळे काठच्या वसाहती आणि अपार्टमेंटमध्ये पाणी घुसले. त्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पर्वती पायथ्यापासून खालील भागातील अंदाजे तीनशे ते साडेतीनशे घरांचे नुकसान झाले असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या पुरामुळे घरांची पडझड झाली, काही घरांच्या भिंतीला तडे गेले. घरातील जीवनावश्यक साहित्य आणि शालेय वस्तूंचे नुकसान झाले. सायकल, मोटारसायकल, रिक्षा, हातगाडी, टपरी, किराणा दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत द्यावी, या मागणीसाठी आंबिलओढा परिसर पूरग्रस्त संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. डॉ. निखिल एडके, रवी पुर्णे, हनुमंत फडके, आलम शेख, वंदना मोरे, लता आईवळे, मुक्ता माने यांच्यासह अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते. डॉ. एडके म्हणाले, की पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून वीस हजार रुपयांची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे  तीन दिवसांत ५ हजार रुपयांची तातडीची मदत देण्याचे आश्वासन  देण्यात आले. ओढ्याला लागून असलेली अनेक घरे धोकादायक झाली आहेत. या घरांची दुरुस्ती होईपर्यंत त्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन केले पाहिजे. घरांची डागडुजी, नळदुरुस्ती आणि विद्युत मीटरची दुरुस्ती सरकारने करून दिली पाहिजे. परिसरात डेंग्यूचे ९ रुग्ण आढळले आहेत. त्यावरही तातडीने उपाययोजना कराव्यात.  

टॅग्स :PuneपुणेfloodपूरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका