शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Amarnath Yatra Cloudburst| अमरनाथ दुर्घटनेत पुण्यातील दोन नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 19:37 IST

अमरनाथ यात्रेला गेलेले हजारो लोक अडकले आहेत...

पुणे : अमरनाथ यात्रेदरम्यान शुक्रवारी झालेल्या ढगफुटीत १५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात पुण्यातील एका महिलेचा समावेश आहे. तर या घटनेच्या धक्क्यामुळे आणखी एका पुुरुषाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. 

वडगाव बु. येथील सुनिता भोसले यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. त्या आळंदीतील माऊली ट्रॅव्हल कंपनीकडून अमरनाथ यांत्रेला गेल्या होत्या. ढगफुटीच्या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत ५५ यात्रेकरू होते. त्यांचे पार्थिव जम्मूपर्यंत हेलिकॉप्टरने आणण्यात आले आहे. तर आळंदीतीलच गुरुकृपा यात्रा कंपनीकडून २०० जण या यात्रेसाठी गेले होते. त्यातील पिंपरी येथील प्रदीप नाथा खराडे यांचा बेसकम्पवर आल्यानंतर पहाटे चार वाजता हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या गटातील इतर सर्व जण सुरक्षित असून रविवारनंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे, असेही देशमुख यांनी सांगितले. 

तर याबाबत दोन्ही कंपन्यांशी संपर्क झाला आहे. या घटनेत कुणीही बेपत्ता नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सर्व यात्रेकरू सुखरूप असून ते लवकरच पुण्यात परतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी सांगितले.

अमरनाथ ढगफुटीतील मृतांमध्ये पुण्यातील एका महिलेचा समावेशअमरनाथ यात्रेदरम्यान शुक्रवारी झालेल्या ढगफुटीत १५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात पुण्यातील एका महिलेचा समावेश आहे. तर या घटनेच्या धक्क्यामुळे आणखी एका पुुरुषाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

या घटनेत वडगाव बु. (धायरी) येथील सुनिता महेश भोसले यांचा मृत्यू झाला आहे. त्या आळंदीतील माऊली यात्रा कंपनीकडून अमरनाथ यात्रेला गेल्या होत्या. त्यांच्यासोबत ५० यात्रेकरू होते. त्यांची यात्रा पुण्यातून २६ जूनला सुरू झाली होती. याबाबत माऊली यात्रा कंपनीचे संचालक गजानन सोनुने म्हणाले, “भाविकांना शुक्रवारी दर्शन झाल्यानंतर सैन्यदलाने सर्वांना खाली जाण्यासाठी काढले. त्यावेळी पाऊस सुरू झाला होता. यातील काही लोक पायी, डोली व घोड्यावर बसून खाली येऊ लागले. मात्र, भोसले, त्यांचे पती महेश व नणंद त्यांच्यासोबत होत्या. ते सर्वजण एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबले होते.

त्यावेळी पाऊस सुरू झाल्यानंतर डोंगरावरून आलेला भलामोठा दगड सुनिता यांच्या डोक्यात पडला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या वेळी तेथे हजर असलेल्या सैन्याच्या जवानांनी तातडीने त्यांचे पती, नणंद व मृतदेहाला हेलिकॉप्टरने जम्मूला हलवले. तसेच पुण्याच्या पुढील प्रवासासाठी ते सैन्यदलाच्या संपर्कात आहेत. मी व अन्य एकजण अजुनही खाली उतरत आहोत. आमच्या गटातील उर्वरित ४७ जण सुखरूप असून रविवारानंतर आम्ही पुण्याकडे परतणार आहोत.”

सोनुने यांच्या गटामध्ये मरकळ ता. खेड येथील चंद्रकांत भुसे त्यांच्या पत्नीसह आहेत. “शुक्रवारी दर्शन झाल्यावर आम्ही पती पत्नीने पायी उतरण्यास सुरुवात केली. पायी उतरल्याने लवकर बेसकॅम्पवर पोचता येते म्हणून आम्ही हा मार्ग स्वीकारला. मात्र, काही जणांनी डोली व घोड्यांचा आधार घेतला. मृत सुनिता भोसले त्यांचे पती असे सुमारे ३५ लोक मागे राहिले होते. आम्ही रस्त्यात असताना दुपारी चार वाजता पाऊस सुरू झाल्याने सैन्याच्या जवानांनी आम्हाला थांबण्यास सांगितले. तोवर आम्ही मूळ गुहेपासून ५ ते ६ किलोमीटर अंतर पार केले होते. त्यावेळी मंदिराजवळ ढगफुटी झाल्याचे समजले. त्यावेळी कंपनीचे संचालक गजानन सोनुने यांच्याशी संपर्क साधण्याचा संपर्क केला. पण नेटवर्क नसल्याने संपर्क होत नव्हता. मागे काय झाले हे कळत नव्हते. त्यामुळे आमची चिंता वाढली.

पाऊस थांबल्यावर पुन्हा चालण्यास सुरुवात केली. त्यानंतर आमच्या फोनची बॅटरी संपली होती. रात्री साडेबारा वाजता आम्ही बालतान येथे पोचले. सततच्या चालण्यामुळे थकलेलो होतो. तोंडाला कोरड पडली होती. हवेत ऑक्सिजनची असल्याने धाप लागत होती. बालतानला पोचल्यानंतर बॅटरी चार्ज केली. तेव्हा घटना घडल्याचे सगळीकडे कळले होते. त्यामुळे सर्वांनी फोनवर चौकशी सुरू केली. सुखरुप असल्याचे सांगितल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर आम्ही सोनुने यांच्या संपर्क साधला. त्यांनी या घटनेबाबत सविस्तर सांगितले. तसेच उर्वरित सर्व जण सुखरुप असल्याचे सांगितले.”

आळंदीतीलच गुरुकृपा यात्रा कंपनीकडून २०० जण या यात्रेसाठी गेले होते. त्यातील पिंपरी येथील प्रदीप नाथा खराडे यांचा बेसकम्पवर आल्यानंतर पहाटे चार वाजता हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या गटातील इतर सर्व जण सुरक्षित असून रविवारनंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे, असेही राजेश देशमुख यांनी सांगितले.

तर याबाबत दोन्ही कंपन्यांशी संपर्क झाला आहे. या घटनेत कुणीही बेपत्ता नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सर्व यात्रेकरू सुखरूप असून ते लवकरच पुण्यात परतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAlandiआळंदीAmarnath Yatraअमरनाथ यात्रा