शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Amarnath Yatra Cloudburst| अमरनाथ दुर्घटनेत पुण्यातील दोन नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 19:37 IST

अमरनाथ यात्रेला गेलेले हजारो लोक अडकले आहेत...

पुणे : अमरनाथ यात्रेदरम्यान शुक्रवारी झालेल्या ढगफुटीत १५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात पुण्यातील एका महिलेचा समावेश आहे. तर या घटनेच्या धक्क्यामुळे आणखी एका पुुरुषाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. 

वडगाव बु. येथील सुनिता भोसले यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. त्या आळंदीतील माऊली ट्रॅव्हल कंपनीकडून अमरनाथ यांत्रेला गेल्या होत्या. ढगफुटीच्या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत ५५ यात्रेकरू होते. त्यांचे पार्थिव जम्मूपर्यंत हेलिकॉप्टरने आणण्यात आले आहे. तर आळंदीतीलच गुरुकृपा यात्रा कंपनीकडून २०० जण या यात्रेसाठी गेले होते. त्यातील पिंपरी येथील प्रदीप नाथा खराडे यांचा बेसकम्पवर आल्यानंतर पहाटे चार वाजता हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या गटातील इतर सर्व जण सुरक्षित असून रविवारनंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे, असेही देशमुख यांनी सांगितले. 

तर याबाबत दोन्ही कंपन्यांशी संपर्क झाला आहे. या घटनेत कुणीही बेपत्ता नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सर्व यात्रेकरू सुखरूप असून ते लवकरच पुण्यात परतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी सांगितले.

अमरनाथ ढगफुटीतील मृतांमध्ये पुण्यातील एका महिलेचा समावेशअमरनाथ यात्रेदरम्यान शुक्रवारी झालेल्या ढगफुटीत १५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात पुण्यातील एका महिलेचा समावेश आहे. तर या घटनेच्या धक्क्यामुळे आणखी एका पुुरुषाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

या घटनेत वडगाव बु. (धायरी) येथील सुनिता महेश भोसले यांचा मृत्यू झाला आहे. त्या आळंदीतील माऊली यात्रा कंपनीकडून अमरनाथ यात्रेला गेल्या होत्या. त्यांच्यासोबत ५० यात्रेकरू होते. त्यांची यात्रा पुण्यातून २६ जूनला सुरू झाली होती. याबाबत माऊली यात्रा कंपनीचे संचालक गजानन सोनुने म्हणाले, “भाविकांना शुक्रवारी दर्शन झाल्यानंतर सैन्यदलाने सर्वांना खाली जाण्यासाठी काढले. त्यावेळी पाऊस सुरू झाला होता. यातील काही लोक पायी, डोली व घोड्यावर बसून खाली येऊ लागले. मात्र, भोसले, त्यांचे पती महेश व नणंद त्यांच्यासोबत होत्या. ते सर्वजण एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबले होते.

त्यावेळी पाऊस सुरू झाल्यानंतर डोंगरावरून आलेला भलामोठा दगड सुनिता यांच्या डोक्यात पडला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या वेळी तेथे हजर असलेल्या सैन्याच्या जवानांनी तातडीने त्यांचे पती, नणंद व मृतदेहाला हेलिकॉप्टरने जम्मूला हलवले. तसेच पुण्याच्या पुढील प्रवासासाठी ते सैन्यदलाच्या संपर्कात आहेत. मी व अन्य एकजण अजुनही खाली उतरत आहोत. आमच्या गटातील उर्वरित ४७ जण सुखरूप असून रविवारानंतर आम्ही पुण्याकडे परतणार आहोत.”

सोनुने यांच्या गटामध्ये मरकळ ता. खेड येथील चंद्रकांत भुसे त्यांच्या पत्नीसह आहेत. “शुक्रवारी दर्शन झाल्यावर आम्ही पती पत्नीने पायी उतरण्यास सुरुवात केली. पायी उतरल्याने लवकर बेसकॅम्पवर पोचता येते म्हणून आम्ही हा मार्ग स्वीकारला. मात्र, काही जणांनी डोली व घोड्यांचा आधार घेतला. मृत सुनिता भोसले त्यांचे पती असे सुमारे ३५ लोक मागे राहिले होते. आम्ही रस्त्यात असताना दुपारी चार वाजता पाऊस सुरू झाल्याने सैन्याच्या जवानांनी आम्हाला थांबण्यास सांगितले. तोवर आम्ही मूळ गुहेपासून ५ ते ६ किलोमीटर अंतर पार केले होते. त्यावेळी मंदिराजवळ ढगफुटी झाल्याचे समजले. त्यावेळी कंपनीचे संचालक गजानन सोनुने यांच्याशी संपर्क साधण्याचा संपर्क केला. पण नेटवर्क नसल्याने संपर्क होत नव्हता. मागे काय झाले हे कळत नव्हते. त्यामुळे आमची चिंता वाढली.

पाऊस थांबल्यावर पुन्हा चालण्यास सुरुवात केली. त्यानंतर आमच्या फोनची बॅटरी संपली होती. रात्री साडेबारा वाजता आम्ही बालतान येथे पोचले. सततच्या चालण्यामुळे थकलेलो होतो. तोंडाला कोरड पडली होती. हवेत ऑक्सिजनची असल्याने धाप लागत होती. बालतानला पोचल्यानंतर बॅटरी चार्ज केली. तेव्हा घटना घडल्याचे सगळीकडे कळले होते. त्यामुळे सर्वांनी फोनवर चौकशी सुरू केली. सुखरुप असल्याचे सांगितल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर आम्ही सोनुने यांच्या संपर्क साधला. त्यांनी या घटनेबाबत सविस्तर सांगितले. तसेच उर्वरित सर्व जण सुखरुप असल्याचे सांगितले.”

आळंदीतीलच गुरुकृपा यात्रा कंपनीकडून २०० जण या यात्रेसाठी गेले होते. त्यातील पिंपरी येथील प्रदीप नाथा खराडे यांचा बेसकम्पवर आल्यानंतर पहाटे चार वाजता हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या गटातील इतर सर्व जण सुरक्षित असून रविवारनंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे, असेही राजेश देशमुख यांनी सांगितले.

तर याबाबत दोन्ही कंपन्यांशी संपर्क झाला आहे. या घटनेत कुणीही बेपत्ता नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सर्व यात्रेकरू सुखरूप असून ते लवकरच पुण्यात परतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAlandiआळंदीAmarnath Yatraअमरनाथ यात्रा