शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Amarnath Yatra Cloudburst| अमरनाथ दुर्घटनेत पुण्यातील दोन नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 19:37 IST

अमरनाथ यात्रेला गेलेले हजारो लोक अडकले आहेत...

पुणे : अमरनाथ यात्रेदरम्यान शुक्रवारी झालेल्या ढगफुटीत १५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात पुण्यातील एका महिलेचा समावेश आहे. तर या घटनेच्या धक्क्यामुळे आणखी एका पुुरुषाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. 

वडगाव बु. येथील सुनिता भोसले यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. त्या आळंदीतील माऊली ट्रॅव्हल कंपनीकडून अमरनाथ यांत्रेला गेल्या होत्या. ढगफुटीच्या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत ५५ यात्रेकरू होते. त्यांचे पार्थिव जम्मूपर्यंत हेलिकॉप्टरने आणण्यात आले आहे. तर आळंदीतीलच गुरुकृपा यात्रा कंपनीकडून २०० जण या यात्रेसाठी गेले होते. त्यातील पिंपरी येथील प्रदीप नाथा खराडे यांचा बेसकम्पवर आल्यानंतर पहाटे चार वाजता हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या गटातील इतर सर्व जण सुरक्षित असून रविवारनंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे, असेही देशमुख यांनी सांगितले. 

तर याबाबत दोन्ही कंपन्यांशी संपर्क झाला आहे. या घटनेत कुणीही बेपत्ता नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सर्व यात्रेकरू सुखरूप असून ते लवकरच पुण्यात परतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी सांगितले.

अमरनाथ ढगफुटीतील मृतांमध्ये पुण्यातील एका महिलेचा समावेशअमरनाथ यात्रेदरम्यान शुक्रवारी झालेल्या ढगफुटीत १५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात पुण्यातील एका महिलेचा समावेश आहे. तर या घटनेच्या धक्क्यामुळे आणखी एका पुुरुषाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

या घटनेत वडगाव बु. (धायरी) येथील सुनिता महेश भोसले यांचा मृत्यू झाला आहे. त्या आळंदीतील माऊली यात्रा कंपनीकडून अमरनाथ यात्रेला गेल्या होत्या. त्यांच्यासोबत ५० यात्रेकरू होते. त्यांची यात्रा पुण्यातून २६ जूनला सुरू झाली होती. याबाबत माऊली यात्रा कंपनीचे संचालक गजानन सोनुने म्हणाले, “भाविकांना शुक्रवारी दर्शन झाल्यानंतर सैन्यदलाने सर्वांना खाली जाण्यासाठी काढले. त्यावेळी पाऊस सुरू झाला होता. यातील काही लोक पायी, डोली व घोड्यावर बसून खाली येऊ लागले. मात्र, भोसले, त्यांचे पती महेश व नणंद त्यांच्यासोबत होत्या. ते सर्वजण एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबले होते.

त्यावेळी पाऊस सुरू झाल्यानंतर डोंगरावरून आलेला भलामोठा दगड सुनिता यांच्या डोक्यात पडला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या वेळी तेथे हजर असलेल्या सैन्याच्या जवानांनी तातडीने त्यांचे पती, नणंद व मृतदेहाला हेलिकॉप्टरने जम्मूला हलवले. तसेच पुण्याच्या पुढील प्रवासासाठी ते सैन्यदलाच्या संपर्कात आहेत. मी व अन्य एकजण अजुनही खाली उतरत आहोत. आमच्या गटातील उर्वरित ४७ जण सुखरूप असून रविवारानंतर आम्ही पुण्याकडे परतणार आहोत.”

सोनुने यांच्या गटामध्ये मरकळ ता. खेड येथील चंद्रकांत भुसे त्यांच्या पत्नीसह आहेत. “शुक्रवारी दर्शन झाल्यावर आम्ही पती पत्नीने पायी उतरण्यास सुरुवात केली. पायी उतरल्याने लवकर बेसकॅम्पवर पोचता येते म्हणून आम्ही हा मार्ग स्वीकारला. मात्र, काही जणांनी डोली व घोड्यांचा आधार घेतला. मृत सुनिता भोसले त्यांचे पती असे सुमारे ३५ लोक मागे राहिले होते. आम्ही रस्त्यात असताना दुपारी चार वाजता पाऊस सुरू झाल्याने सैन्याच्या जवानांनी आम्हाला थांबण्यास सांगितले. तोवर आम्ही मूळ गुहेपासून ५ ते ६ किलोमीटर अंतर पार केले होते. त्यावेळी मंदिराजवळ ढगफुटी झाल्याचे समजले. त्यावेळी कंपनीचे संचालक गजानन सोनुने यांच्याशी संपर्क साधण्याचा संपर्क केला. पण नेटवर्क नसल्याने संपर्क होत नव्हता. मागे काय झाले हे कळत नव्हते. त्यामुळे आमची चिंता वाढली.

पाऊस थांबल्यावर पुन्हा चालण्यास सुरुवात केली. त्यानंतर आमच्या फोनची बॅटरी संपली होती. रात्री साडेबारा वाजता आम्ही बालतान येथे पोचले. सततच्या चालण्यामुळे थकलेलो होतो. तोंडाला कोरड पडली होती. हवेत ऑक्सिजनची असल्याने धाप लागत होती. बालतानला पोचल्यानंतर बॅटरी चार्ज केली. तेव्हा घटना घडल्याचे सगळीकडे कळले होते. त्यामुळे सर्वांनी फोनवर चौकशी सुरू केली. सुखरुप असल्याचे सांगितल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर आम्ही सोनुने यांच्या संपर्क साधला. त्यांनी या घटनेबाबत सविस्तर सांगितले. तसेच उर्वरित सर्व जण सुखरुप असल्याचे सांगितले.”

आळंदीतीलच गुरुकृपा यात्रा कंपनीकडून २०० जण या यात्रेसाठी गेले होते. त्यातील पिंपरी येथील प्रदीप नाथा खराडे यांचा बेसकम्पवर आल्यानंतर पहाटे चार वाजता हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या गटातील इतर सर्व जण सुरक्षित असून रविवारनंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे, असेही राजेश देशमुख यांनी सांगितले.

तर याबाबत दोन्ही कंपन्यांशी संपर्क झाला आहे. या घटनेत कुणीही बेपत्ता नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सर्व यात्रेकरू सुखरूप असून ते लवकरच पुण्यात परतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAlandiआळंदीAmarnath Yatraअमरनाथ यात्रा