शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा सोबतच्या' युती ' चा फेरविचार व्हावा : अस्वस्थ आठवले गट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 11:31 IST

रामदास आठवले यांनी भाजपाबरोबर युती केली. त्याचवेळी राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या...

ठळक मुद्दे मतांच्या तुलनेत सत्तेत वाटा नाही 

पुणे: समाजाला सत्तेत वाटा मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टीबरोबर युती केली. पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांना केंद्रात राज्यमंत्रिपद देऊन भाजपाने स्वस्थ बसवले. मात्र, अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सत्तेत वाटा दिला नाही अशी खंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. राज्यातील दलित मतांचा कोटा रिपाईच्या माध्यमातून वापरून घेतला, याप्रकारची भावना या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली असून त्यातूनच भाजपा बरोबरच्या युतीच्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फेरविचार करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. रामदास आठवले यांनी मागील वेळी भाजपाबरोबर युती केली. त्याचवेळी राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. पुरोगामी विचारांचा, डॉ. आंबेडकर यांना मानणारा रिपाई उजव्या विचारांच्या, देवदेवतांवर, राममंदीरावर विश्वास ठेवणाऱ्या भाजपा बरोबर नांदणार कसा असा प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला होता. मात्र आठवले यांनी कोणाचेही न ऐकता युती जाहीर केली. इतकेच नव्हे तर काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाच्या मागणीप्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या म्हणजे कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास भाग पाडले. पुणे महापालिका हे त्याचेच उत्तम उदाहरण आहे. रिपाई (आठवले गट) चे ५ उमेदवार महापालिकेत निवडून आले, मात्र ते सर्व भाजपाच्या कमळ या चिन्हावरचे आहेत. त्यामुळेच महापालिकेत पक्षाचा स्वतंत्र गट तयार करताना त्यांच्यापुढे अनेक अडचणी उभ्या राहिल्या.आठवले यांच्या आदेशानुसार बहुसंख्य ठिकाणी रिपाईच्या कार्यकर्त्यांनी भाजपासोबत काम केले आहे. या युतीत भाजपाने आठवले यांनी केंद्रात समाजकल्याण विभागाचे राज्यमंत्री पद दिले आहे. मात्र ते वगळता कुठेही विधानपरिषद किंवा विधानसभेला जागा दिलेल्या नाहीत. सत्तेचे कोणतेही अन्य पद केंद्रात किंवा राज्यातही दिलेले नाही. पुणे महापालिकेतही केवळ उपमहापौर पद देऊन सत्तेत अन्य कोणताही वाटा दिलेला नाही. पक्षासाठी साधे कार्यालय मागतानाही रिपाई कार्यकर्त्यांच्या नाकीनऊ आले आहेत. नव्या इमारतीतही रिपाईला स्वतंत्र कार्यालय देण्यास भाजपा तयार नाही, त्यामुळेच उपमहापौर अजूनही जुन्या इमारतीमध्येच ठाण मांडून बसले आहेत.रिपाईच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात आता राज्यस्तरावर याबाबत उघड चर्चा होऊ लागली आहे. सत्तेतून समाजाला काही देता येईल, काही योजना राबवता येतील, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक उन्नती साधता येईल अशा हेतूने भाजपाबरोबर जायचा निर्णय आठवले यांनी घेतला होता. हेच सांगून त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या तो गळी उतरवला होता. त्यामुळेच भाजपाला राज्यातील सत्ता मिळाली. सर्व दलित मते एकगठ्ठा भाजपाच्या झोळीत पडली. भाजपाच्या एकूण मतांच्या संख्येत या मतांचा वाटा किमान २० टक्के आहे. त्या तुलनेत रिपाईला सत्तेत काहीच वाटा मिळालेला नाही असे रिपाई कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या युतीचा फेरविचार करावा अशी मागणी रिपाईच्या कार्यकर्त्यात जोर धरत आहे. पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना घेऊन त्यासाठी काही पदाधिकारी लवकरच आठवले यांची भेट घेऊन त्यांना याबाबत सांगणार असल्याचे समजते. ----------------------------------------------आठवले यांचा निर्णय मान्य असेलपक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे हे खरे आहे. कारण केंद्रात, राज्यात व महापालिकांमध्ये सत्ता असूनही भाजपाने कधीही रिपाई कार्यकर्त्यांना कधीही सत्तेतील वाटा दिला नाही. सभांमध्ये खुर्ची देण्यावरूनही काही ठिकाणी मतभेद झाले आहेत. त्यात्या वेळी आठवले यांच्याकडे तक्रारीही करण्यात आल्या. आताही नाराज पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना भेटून त्यांच्याकडे अडचणी मांडू शकतात. आठवले जो काही निर्णय देतील तो सर्वांना मान्य असेल.बाळासाहेब जानराव, राज्य सरचिटणीस, रिपाई (आठवले गट) 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणRamdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपा