शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

यामुळे यंदाच्या उन्हाळ्याची चिंताच मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उन्हाळा तोंडावर आला की महापालिकेला पाणीपुरवठ्याची चिंता पडते. पाणीकपातीचे नियोजन करावे लागते. यंदा ही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : उन्हाळा तोंडावर आला की महापालिकेला पाणीपुरवठ्याची चिंता पडते. पाणीकपातीचे नियोजन करावे लागते. यंदा ही चिंताच मिटली आहे. कारण, खडकवासला धरण साखळीत २०.०२ टीएमसी पाठीसाठा असून गेल्या वर्षीपेक्षा दोन टीएमसी पाणी जास्त आहे. त्यातच यंदा भामा आसखेड योजनेचे पाणी मिळणार असल्याने पूर्व भागाला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्याची पुणेकरांची चिंता मिटली आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या सर्व धरणांची पाण्याची साठवण क्षमता ३१ टीएमसी आहे. उपयुक्त पाणीसाठा २९.५० टीएमसी आहे. शहरासाठी सुमारे साडेअकरा टीएमसी पाणीसाठा मंजूर आहे. मात्र, पालिकेकडून प्रत्यक्षात १६ ते १७ टीएमसी पाणी घेतले जाते. डिसेंबरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे धरणसाखळीत अद्यापही २०.०२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध साठ्यातील शहराला ६ ते ७ टीएमसी पाणी पुरणार आहे.

शहराच्या विविध भागात आजही कमीदाबाने पाणी येणे, पाणीच न येणे, टँकरने पाणीपुरवठा सुरू असणे अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाजीनगरसारख्या मध्यवस्तीतील पाणीप्रश्नही अद्याप मार्गी लागलेला नाही. उन्हाळ्यात धरणातील पाणीसाठा कमी होतो. विशेषत: एप्रिल आणि मे महिन्यात शहरातील पाण्यात कपात केली जाते. यंदा धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणीपुरवठा सुरळीत सुरु राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

चौकट

उन्हाळ्यात कपात नाही

“खडकवासला धरणसाखळीत गेल्या वर्षीपेक्षा दोन टीएमसी अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. भामा आसखेड योजनेचे पाणी पूर्व भागाला मिळत असल्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कपात करावी लागणार नाही. पाणीपुरवठा सुरळीत राहील.”

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग

चौकट

धरणामधील पाणीसाठा

खडकवासला - ०.९८ टीएमसी

पानशेत - ९.४० टीएमसी

वरसगाव - ९.१४ टीएमसी

टेमघर - ०.५१ टीएमसी