शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

Maharashtra election 2019 :सगळ्या शहरांमध्ये बजबजपुरी झाली ; राज ठाकरेंनी पुन्हा छेडला परप्रांतियांचा मुद्दा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 20:42 IST

महाराष्ट्रातल्या शहरांना आकार-उकार राहिलेला नाही. सगळ्या शहरांमध्ये बजबजपुरी झाली आहे. बाहेरच्या राज्यातून लोक येत आहेत. आज देशात सर्वाधिक कर महाराष्ट्र भरत आहे आणि  बाहेरचे लोकही पोसत आहे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतियांचा मुद्दा पुन्हा एकदा छेडला.

पुणे : महाराष्ट्रातल्या शहरांना आकार-उकार राहिलेला नाही. सगळ्या शहरांमध्ये बजबजपुरी झाली आहे. बाहेरच्या राज्यातून लोक येत आहेत. आज देशात सर्वाधिक कर महाराष्ट्र भरत आहे आणि  बाहेरचे लोकही पोसत आहे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतियांचा मुद्दा पुन्हा एकदा छेडला. पुण्यातील कोथरूड येथील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की , आपण घरातून उतरल्यावर चांगल्या ठिकाणी राहतो असे वाटायला हवे. सध्या मात्र सर्व शहरांमध्ये बजबजपुरी आहे. ग्रामीण भागातला तरुण शहरात येत असेल तर तो त्याचा हक्क आहे, कारण तो महाराष्ट्राचा नागरिक आहे. मात्र बाहेरच्या राज्यातून लोक येत आहेत. याशिवाय पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोर घुसखोरी करत आहेत. आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. या लोकांवर नियंत्रण ठेवण्याची राज्य सरकारची इच्छा नाही. 

यावेळी ते म्हणाले की, आज महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेले इंटरनॅशनल बोर्ड छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे काढून टाकत आहेत. आज आमचा हा महापुरुष नसता तर आपण कुठे असतो. जर शिवछत्रपती, संभाजी महाराज, पेशव्यांचा इतिहास सांगितला नाही तर पुढील पिढीला काय देणार आहोत. भारताच्या इतिहासात कोणत्याही राज्याला नाही असा इतिहास महाराष्ट्राला आहे. या इतिहासाचं सरकार काय करत आहे तर किल्ल्यांवर लग्न, समारंभांना परवानगी देत आहेत. असे निर्णय म्हणजे सत्ता डोक्यात गेल्याचे लक्षण आहे.  

यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे : 

- मनमोहन सिंग मोठे अर्थतज्ज्ञ, विद्वान आहेत. ते म्हणाले तेव्हा काळजात धस्स झालं. त्यांनी सांगितले की मंदीचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रावर होईल. त्याची सुरुवात झाली आहे. 

- २०१७साली नोटबंदीनंतर नरेंद्र मोदी यांनी पन्नास दिवस द्या असे सांगितले होते. आता २०१९ सुरु आहे मात्र तरीही मंदी आहे. 

- पुण्याचे खासदार  ट्रॅफिकमध्ये अडकले तेव्हा बाणेरचा रस्ता रिकामा करायला निघाले, मग आम्ही अडकलो तर काय करायचं ?

-आज पुण्यासारख्या शहरात वाहनांचा सर्वाधिक धोका आहे. इथले रस्ते अपुरे आहेत. रस्त्यावर गाड्या पार्क होतात कारण मोकळे भूखंड बिल्डरांच्या घशात घातले जातात. 

-विरोधासाठी विरोध करण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका नाही. नरेंद्र मोदींच्या भूमिका चुकल्या त्यावर प्रहार केले आणि ३७० साठी अभिनंदन करणारा मीच होतो. मात्र महाराष्ट्राच्या निवडणुकीत ते ३७० सोडून महाराष्ट्राचे तरुण, तरुणी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी  कधी बोलणार?

-सत्त्ताधाऱ्यांची सभांसाठी आणि मेट्रोसाठी रात्रीतून झाडे छाटण्याची हिंमत कशी होते यामागचे कारण सत्ता डोक्यात जाते.

- आमचे उमेदवार स्थानिक आहेत, सत्तेची हवा डोक्यात न जाणारे आहेत. आणि ती गेलीच  तर टाचणी लावायला मी आहेच. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019