शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

आळंदीत इंद्रायणीला जलपर्णीचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 02:16 IST

आळंदी येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढलेली असल्याने पाणी दूषित झाले आहे.

आळंदी : येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढलेली असल्याने पाणी दूषित झाले आहे. जलपर्णीच्या आच्छादनामुळे जलचरांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. ही जलपर्णी काढून कायमस्वरूपी उपायजोना करण्याची मागणी होत आहे.नदीतील पाण्याला हिरवट रंग आणि दुर्गंधीयुक्त वासाने नदीचे पाणी आता वापरास अयोग्य झाले आहे. इंद्रायणी नदीत प्रचंड जलपर्णी फोफावली असून, ती आता फुलावर आली आहे. दिवसेंदिवस तिची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. इंद्रायणीला लागलेले जलपर्णीचे हे ग्रहण कधी सुटणार? असा प्रश्न येथे येणारे भाविक विचारत आहेत.या संदर्भात आळंदी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सागर भोसले म्हणाले, की नदीतील जलपर्णी पाण्याबाहेर काढण्यात येणार आहे. तसेच, आता नदीत पाणी सोडले असल्याने पाण्याची पातळीदेखील वाढेल. पाण्याचा प्रवाह वाहता राहणार असल्याने रंग आणि वास असलेले पाणी पुढे प्रवाहात वाहून जाईल. यामुळे आळंदीतील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्नदेखील सुटणार आहे. येत्या ४ दिवसांत आळंदीतील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे भोसले यांनी सांगितले.पाणीपुरवठा केंद्राच्या पाणी साठवण बंधाऱ्यात जलपर्णी राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. नदीपात्रात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून जलपर्णी वाहत येऊन आळंदी पाणीपुरवठा केंद्राच्या बंधाºयात येऊ नये, यासाठी प्लॅस्टिक ड्रम वायर रोपच्या साह्याने जलपर्णी थोपविण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे पाणीपुरवठा केंद्रातील पाण्यावर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यावर ताण येणार नाही, असे भोसले यांनी सांगितले. यासाठी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर, पाणीपुरवठा विभागप्रमुख दत्तात्रय सोनटक्के यांचे मार्गदर्शन झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषणAlandiआळंदीindrayaniइंद्रायणी