शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीत इंद्रायणीला जलपर्णीचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 02:16 IST

आळंदी येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढलेली असल्याने पाणी दूषित झाले आहे.

आळंदी : येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढलेली असल्याने पाणी दूषित झाले आहे. जलपर्णीच्या आच्छादनामुळे जलचरांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. ही जलपर्णी काढून कायमस्वरूपी उपायजोना करण्याची मागणी होत आहे.नदीतील पाण्याला हिरवट रंग आणि दुर्गंधीयुक्त वासाने नदीचे पाणी आता वापरास अयोग्य झाले आहे. इंद्रायणी नदीत प्रचंड जलपर्णी फोफावली असून, ती आता फुलावर आली आहे. दिवसेंदिवस तिची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. इंद्रायणीला लागलेले जलपर्णीचे हे ग्रहण कधी सुटणार? असा प्रश्न येथे येणारे भाविक विचारत आहेत.या संदर्भात आळंदी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सागर भोसले म्हणाले, की नदीतील जलपर्णी पाण्याबाहेर काढण्यात येणार आहे. तसेच, आता नदीत पाणी सोडले असल्याने पाण्याची पातळीदेखील वाढेल. पाण्याचा प्रवाह वाहता राहणार असल्याने रंग आणि वास असलेले पाणी पुढे प्रवाहात वाहून जाईल. यामुळे आळंदीतील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्नदेखील सुटणार आहे. येत्या ४ दिवसांत आळंदीतील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे भोसले यांनी सांगितले.पाणीपुरवठा केंद्राच्या पाणी साठवण बंधाऱ्यात जलपर्णी राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. नदीपात्रात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून जलपर्णी वाहत येऊन आळंदी पाणीपुरवठा केंद्राच्या बंधाºयात येऊ नये, यासाठी प्लॅस्टिक ड्रम वायर रोपच्या साह्याने जलपर्णी थोपविण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे पाणीपुरवठा केंद्रातील पाण्यावर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यावर ताण येणार नाही, असे भोसले यांनी सांगितले. यासाठी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर, पाणीपुरवठा विभागप्रमुख दत्तात्रय सोनटक्के यांचे मार्गदर्शन झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषणAlandiआळंदीindrayaniइंद्रायणी