शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निर्बंधांच्या वेळेबाबत शब्द फिरवला; पुणेकरांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 10:55 IST

पुणे : महापालिकेने जाहीर केलेल्या नियमावलीत पुण्यात सायंकाळी सहापर्यंतच दुकाने उघडी राहणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात सर्वत्र जीवनावश्यक वस्तूंच्या ...

पुणे : महापालिकेने जाहीर केलेल्या नियमावलीत पुण्यात सायंकाळी सहापर्यंतच दुकाने उघडी राहणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात सर्वत्र जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ आठ वाजेपर्यंत असताना पुण्यात सहा वाजेपर्यंतच का केली? असा सवाल कला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीत राज्याप्रमाणेच पुण्यातही नियम असतील, असे म्हटले होते. त्यांनी आपला शब्द फिरवल्याची टीका होत आहे.

खासदार गिरीश बापट म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधामध्ये राज्यात ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी आहे. मात्र, पुणे शहरात मात्र ही मर्यादा सायंकाळी ६ वाजेपर्यंत केली गेली आहे़ हा निर्णय अयोग्य असून, राज्याप्रमाणेच पुण्यातही रात्री आठपर्यंतची मर्यादा असावी़

कोरोना आढावा बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मध्यंतरी संपूर्ण राज्यात एकच निर्णय लागू राहिल, असे सांगितले होते़ मात्र तसे न होता पुण्याला पूर्वीप्रमाणेच निर्बंध लावण्यात आले आहेत़ सायंकाळी सहा वाजता आस्थापना, कंपन्या बंद झाल्यावर तेथील कामगारांना घरी जाण्यासाठी तास दीड तास तरी वेळ लागतो. त्यातच पुण्यातील बससेवाही बंद आहे़ त्यामुळे या निर्णयाबाबत पुनर्विचार होणे आवश्यक असल्याचेही खासदार बापट यांनी सांगितले.

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध जाहीर करतानाच, स्थानिक प्रशासनाने त्या त्या ठिकाणची परिस्थितीनुसार त्यात बदल करावा असेही स्पष्ट केलेले आहे. पुणे शहरातील कोरोनाबाधितांची वाढ ही इतर शहरांच्या तुलनेत अधिक असल्याने, पुणे महापालिकेने यापूर्वीच शहरातील दुकाने सायंकाळी सहा वाजता बंद करून संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने जाहीर केलेली नियमावली योग्य असल्याचे मत शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी व्यक्त केले.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुण्याची नियमावली राज्याची नियमावली लागू होण्यापूर्वीच जाहीर करण्यात आली असून, ती अंमलबात आणली जात आहे़ निर्बंध पाळणे हे महत्त्वाचे असून सायंकाळी सहा की रात्री आठ हा विषय महत्त्वाचा नाही.कोरोना रूग्णसंख्या वाढत असून, आज रूग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आपण कोरोना संसर्ग रोखणे हे जरूरी आहे, असे मत काँग्रेस महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकार