शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

'तुम्हीच पाहा, कसा कारभार करतायत ते...'; रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरुन अजित पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 16:30 IST

अजित पवारांची राज्य सरकारवर बोचरी टीका...

बारामती (पुणे): सरकार स्थापन करुन महिना पूर्ण होत आला आहे. तरीही मंत्रीमंडळ स्थापनेला मुहुर्त मिळत नाही. लोकांचे अनेक प्रश्न रखडले आहेत. आता जनतेनेच पाहावे राज्यात कशा प्रकारे कारभार सुरु आहे आणि याला कोण जबाबदार आहे, असा टोला विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.

विरोधी पक्षनेते शुक्रवारी (दि. ५) बारामती दौऱ्यावर होते. यावेळी विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात त्यांचा जनता दरबार पार पडला. नागरीकांच्या तक्रारी, समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना पवार यांनी सूचना दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली.

यावेळी विधान सभा विरोधी पक्षनेते पवार म्हणाले, पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली आहे, त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. गावातील रस्ते, पुलांची दुरावस्था झाली आहे. तातडीने त्यांना मदतीची गरज आहे.

याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपाल महोदयांना भेटून राज्यमंत्री मंडळ अस्तित्वात येणे गरजेचे आहे. पावसाळी अधिवेशन जुलैमध्येच होते. ऑगस्ट महिना उजाडला तरी पावसाळी अधिवेशन घेण्यात आलेले नाही. त्यांना ग्रीन सिग्नल मिळेना, त्यांच्यात एकवाक्यता होईना. मंत्रीमंडळ स्थापनेसाठी कोणाला घाबरताय, हे काही समजायला तयार नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला.

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस