शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

हवाई रिक्षा ठरेल स्मार्ट पर्याय, सिंगापूरमध्ये होतेय वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 02:41 IST

कल्याणमध्ये चर्चेला उधाण : सिंगापूरमध्ये होतेय वाहतूक

कल्याण : शहरातील वाहतूककोंडीवर मात करण्याबरोबरच स्मार्ट प्रवासासाठी कल्याणमध्ये हवाई रिक्षा सुरू करण्याची घोषणा मंगळवारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. भारतात ही संकल्पना दुर्मीळ असली, तरी परदेशांत हवाई रिक्षा म्हणजेच पॉड टॅक्सी, पॉड रिक्षांद्वारे वाहतूक केली जात आहे.

केडीएमसीच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांमधील सिटी पार्कचे भूमिपूजन मंगळवारी ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी हवाई रिक्षाची घोषणा केली. पॉड रिक्षा सध्या सिंगापूरमध्ये धावत आहेत. ही रिक्षा चालकविरहित असून चार ते सहाआसनी असते. एखाद्या स्काय ट्रॉलीप्रमाणे ती चालते. उन्नत (एलिव्हेटेड) मार्गाला समांतर अथवा त्याच्या खालून तारेला लटकलेल्या अवस्थेत ही रिक्षा पुढे जाते. उन्नत मार्गावर तिचे थांबे असतात. रिक्षात संगणकीय प्रणाली असून, त्यावर स्थानकांची यादी येते. यादीवरील इच्छित स्थळाचे बटण दाबल्यावर तेथे रिक्षा थांबते. दिल्ली ते गुडगावदरम्यान ही रिक्षासेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच धर्तीवर ठाण्यात प्रयोग होणार आहे. ठाण्यात दोन मार्गांवर ही रिक्षा धावणार होती. आता पाच मार्ग निश्चित केले असून त्याच्या हालचाली सुरू आहे.केडीएमसीने १४०० कोटींचा स्मार्ट सिटी प्रकल्प हाती घेतला आहे. २५ प्रमुख प्रकल्प स्मार्ट सिटीअंतर्गत होणार आहेत. त्यातील सिटी पार्कच्या कामाचे भूमिपूजन झाले. रेल्वेस्थानक परिसराचा विकास व कल्याण, डोंबिवली खाडी परिसराचा विकास, यावर प्रथम भर दिला गेला आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते १८ डिसेंबरला झाले आहे. कल्याणमध्ये पश्चिमेला दुर्गाडी ते कृषी उत्पन्न बाजार समिती हा मार्ग मेट्रोचा आहे. या मार्गाच्या खालोखाल अथवा समांतर हवाई रिक्षा सुरू केली जाऊ शकते. भिवंडी-कल्याण-शीळ हा उन्नतमार्गही विकसित करणे प्रस्तावित आहे. कल्याण ते शीळ मार्गाचे सहापदरीकरण, उन्नतमार्ग आणि उन्नतमार्गाच्या खालोखाल अथवा समांतर हवाई रिक्षा सुरू करण्याची शक्यता आहे.संकल्पनेबाबत अनभिज्ञतावाहतूककोंडीवर हवाई रिक्षा उपाय होऊ शकतो. त्यामुळे ठाकरे यांची घोषणा स्वप्नवत नसून प्रत्यक्षात येऊ शकते. परंतु, त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. दरम्यान, हवाई रिक्षाच्या संकल्पनेविषयी परिवहन अधिकारी व रिक्षा-चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

टॅग्स :Mumbaiमुंबईkalyanकल्याणthaneठाणे