शहरं
Join us  
Trending Stories
1
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
2
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
3
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
4
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
5
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
6
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
7
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
8
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
9
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
10
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
11
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 
12
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
13
'धुरंधर' सिनेमाचं डोंबिवलीत होतंय शूट, माणकोली पूलावरुन संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल
14
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
15
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
16
Tarot Card: आगामी काळ प्रगतीचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
18
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
19
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
20
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह

अवैध वाळूउपशाविरोधात हवा एल्गार

By admin | Updated: December 22, 2015 01:31 IST

वाळूव्यवसायातील वर्चस्वाच्या वादातून भिगवण येथे घडलेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित वाळूमाफिया संजय

वाळूव्यवसायातील वर्चस्वाच्या वादातून भिगवण येथे घडलेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित वाळूमाफिया संजय तनपुरे व त्याच्या तीन साथीदारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली शासन यंत्रणेकडून सुरू झाल्या आहेत. अवैध व बेसुमार वाळू उपशामुळे शासनाचा महसूल बुडतो. याहीपेक्षा त्यामुळे पर्यावरणाचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. निसर्गचक्र कोलमडत आहे. याचा विचार होऊन वाळूच्या अमर्याद उपशाविरुद्ध सर्वसामान्यांनी एकत्र आले पाहिजे.शासनाने अशा एक-दोघांवर कारवाई करण्याऐवजी, समस्यांच्या मुळाशी जाऊन ती समस्या खणून काढली पाहिजे. मुख्यत्वे महसूल विभागाला आणखी अधिकार देऊन, त्यांच्या संरक्षणासाठी ही उपाययोजना केली पाहिजे. इंदापूर तालुक्याचा विचार करता, भीमा व नीरा अशा दोन नद्यांमध्ये हा तालुका वसलेला आहे. या नद्यांचे काठ व संगमाकडील भागात गेल्या अनेक वर्षांपासून बेसुमार वाळूउपसा झाला आहे. सोलापूर, पुणे, नगर भागातील वाळूमाफिया बिनधास्तपणे वाळूचोरी करत आहेत. सोलापूर जिल्हयातील मोहोळ ते पुणे शहरापर्यंत सुमारे दोनशे किलोमीटर अंतरात त्यांची संघटित साखळी निर्माण झाली. मोबाईल, इंटरनेट, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या यंत्रणांच्या माध्यमातून ते एकमेकांच्या व पोलीस खाते, महसूल खात्यातील अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असतात. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे क्रमांक बहुतेक बनावट असतात, तर कधी चलाखी करून पुढे वेगळा व मागे वेगळा क्रमांक टाकलेला असतो. त्यातच पोलीस यंत्रणेची ‘कार्ड सिस्टीम’ वाळूचोरांचा कायद्याच्या कचाट्यापासून वाचवण्याचे काम करत असते. इंटरनेटवर आधारित संपर्क माध्यमांमुळे महसूल विभाग, पोलीस यंत्रणा मिळून कारवाई करणार असेल, तर ते काही क्षणांतच वाळूमाफियांना समजते. ते तातडीने सुरक्षित ठिकाणी जातात अथवा ज्या रस्त्यावर भरारी पथके आहेत, त्या रस्त्याकडे फिरकतच नाहीत. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या मागे पुढे शस्त्रधारी वाळूमाफियांच्या आलिशान चारचाकी गाड्या असतात. डॉन, भाई असल्याची हवा डोक्यात भरलेले हे ‘भाई’ सोबत शस्त्र, गाठीला पैसा, राजकीय वरदहस्त असल्याने काहीही करावयास मागेपुढे बघत नाहीत. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या भरारी पथकामध्ये असणारांकडे बरीचशी कागदपत्रे, शिक्के अन्य जास्तीत जास्त दोनेक पोलीस कर्मचारी असतात. ही मंडळी तशी जिवावर उदार होऊनच काम करत असतात. वरिष्ठांनी मानेवर दिलेल्या उद्दिष्टाच जोखड त्यांना कर्तव्य पार पाडायला भाग पाडत असते. जर कुणा एकाची भाईगिरी मेंदू सोडून वागली तर या कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.