शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अवैध वाळूउपशाविरोधात हवा एल्गार

By admin | Updated: December 22, 2015 01:31 IST

वाळूव्यवसायातील वर्चस्वाच्या वादातून भिगवण येथे घडलेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित वाळूमाफिया संजय

वाळूव्यवसायातील वर्चस्वाच्या वादातून भिगवण येथे घडलेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित वाळूमाफिया संजय तनपुरे व त्याच्या तीन साथीदारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली शासन यंत्रणेकडून सुरू झाल्या आहेत. अवैध व बेसुमार वाळू उपशामुळे शासनाचा महसूल बुडतो. याहीपेक्षा त्यामुळे पर्यावरणाचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. निसर्गचक्र कोलमडत आहे. याचा विचार होऊन वाळूच्या अमर्याद उपशाविरुद्ध सर्वसामान्यांनी एकत्र आले पाहिजे.शासनाने अशा एक-दोघांवर कारवाई करण्याऐवजी, समस्यांच्या मुळाशी जाऊन ती समस्या खणून काढली पाहिजे. मुख्यत्वे महसूल विभागाला आणखी अधिकार देऊन, त्यांच्या संरक्षणासाठी ही उपाययोजना केली पाहिजे. इंदापूर तालुक्याचा विचार करता, भीमा व नीरा अशा दोन नद्यांमध्ये हा तालुका वसलेला आहे. या नद्यांचे काठ व संगमाकडील भागात गेल्या अनेक वर्षांपासून बेसुमार वाळूउपसा झाला आहे. सोलापूर, पुणे, नगर भागातील वाळूमाफिया बिनधास्तपणे वाळूचोरी करत आहेत. सोलापूर जिल्हयातील मोहोळ ते पुणे शहरापर्यंत सुमारे दोनशे किलोमीटर अंतरात त्यांची संघटित साखळी निर्माण झाली. मोबाईल, इंटरनेट, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या यंत्रणांच्या माध्यमातून ते एकमेकांच्या व पोलीस खाते, महसूल खात्यातील अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असतात. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे क्रमांक बहुतेक बनावट असतात, तर कधी चलाखी करून पुढे वेगळा व मागे वेगळा क्रमांक टाकलेला असतो. त्यातच पोलीस यंत्रणेची ‘कार्ड सिस्टीम’ वाळूचोरांचा कायद्याच्या कचाट्यापासून वाचवण्याचे काम करत असते. इंटरनेटवर आधारित संपर्क माध्यमांमुळे महसूल विभाग, पोलीस यंत्रणा मिळून कारवाई करणार असेल, तर ते काही क्षणांतच वाळूमाफियांना समजते. ते तातडीने सुरक्षित ठिकाणी जातात अथवा ज्या रस्त्यावर भरारी पथके आहेत, त्या रस्त्याकडे फिरकतच नाहीत. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या मागे पुढे शस्त्रधारी वाळूमाफियांच्या आलिशान चारचाकी गाड्या असतात. डॉन, भाई असल्याची हवा डोक्यात भरलेले हे ‘भाई’ सोबत शस्त्र, गाठीला पैसा, राजकीय वरदहस्त असल्याने काहीही करावयास मागेपुढे बघत नाहीत. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या भरारी पथकामध्ये असणारांकडे बरीचशी कागदपत्रे, शिक्के अन्य जास्तीत जास्त दोनेक पोलीस कर्मचारी असतात. ही मंडळी तशी जिवावर उदार होऊनच काम करत असतात. वरिष्ठांनी मानेवर दिलेल्या उद्दिष्टाच जोखड त्यांना कर्तव्य पार पाडायला भाग पाडत असते. जर कुणा एकाची भाईगिरी मेंदू सोडून वागली तर या कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.