गळतीत वाया जातेय शेतीचे पाणी

By Admin | Updated: May 22, 2014 05:40 IST2014-05-22T05:40:43+5:302014-05-22T05:40:43+5:30

देशात सर्वांत जास्त पाणी पुणेकरांना मिळत असतानाच केवळ गळतीमुळे पुणेकरांची तहान कागदोपत्री भागवली जात आहे.

Agricultural water is being wasted due to leakage | गळतीत वाया जातेय शेतीचे पाणी

गळतीत वाया जातेय शेतीचे पाणी

किरण जोशी, पुणे - देशात सर्वांत जास्त पाणी पुणेकरांना मिळत असतानाच केवळ गळतीमुळे पुणेकरांची तहान कागदोपत्री भागवली जात आहे. खडकवासल्यातून प्रतिदिन १ हजार २00 एमएलडी पाणी घेणार्‍या पुण्यात ३0 टक्के पाणी गळती आहे. वास्तविक धरणे शेतीसाठी बांधण्यात आल्याने पिण्यासाठी पाणी पळविणार्‍या महापालिकेमुळे शेतकर्‍यांचे पाणी गळतीत वाया जात आहे. पाणीटंचाईच्या ग्रहणात अडकलेल्या पुण्यात प्रत्यक्षात दररोज प्रतिमाणसी ३१० लिटर पाणी मिळत आहे. देशभरातील शहरांशी तुलना केल्यास पुणेकरांना सर्वात जास्त पाणी वाट्याला येत असल्याने याअर्थाने पुणेकर पाण्याच्या बाबतीत सुखी ठरले आहेत मात्र, वितरण व्यवस्थेत सुमारे ८० टक्के गळती असल्याने पुणेकरांच्या नशिबी पाणीकपात लिहली गेली आहे. पुण्यासाठी दररोज १ हजार २०० एमएलडी पाणी खडकवासला धरणातून उचलले जाते. यातील ७० टक्के पाणी बंद जलवाहिनीतून तर ३० टक्के कॅनॉलमधून येते. मात्र, जलवाहिनीला गळती असल्याने आणि कॅनॉलमधून येणार्‍या पाण्यावरील उपशाला बंधनेच नसल्याने मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. शहरात सार्वजनीक नळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या फुकट्या नळजोडण्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही.

Web Title: Agricultural water is being wasted due to leakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.