शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

मोबदला कमी दाखविण्यासाठी इंदापुरात अधिकाऱ्यांनी पिकाची नोंदच बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 16:09 IST

कमी मोबदला देण्यासाठी चक्क एका शेतकरी महिलेच्या सातबारा उताऱ्यावरील डाळिंबाच्या पिकाची नोंदच कषि अधिकाऱ्यांकडून बदलण्यात आली आहे. डाळिंबाच्या ऐवजी उसाची नोंद केल्याने या महिलेला कमी मोबदला मिळाला.

ठळक मुद्देकृषि अधिकाऱ्यांकडून बदलण्यात आली सातबारा उताऱ्यावरील डाळिंबाच्या पिकाची नोंदगुन्हा दाखल करण्याची धमकी मिळत असल्याने न्याय कोणाकडे मागायचा? : पुष्पा निंबाळकर

लासुर्णे : शेतकऱ्यांना मोदबला देताना शासकीय अधिकारी नेहमी हात आखडता घेतात. याचा उत्तम नमुना इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथे समोर आला आहे. कमी मोबदला देण्यासाठी चक्क एका शेतकरी महिलेच्या सातबारा उताऱ्यावरील डाळिंबाच्या पिकाची नोंदच कृषि अधिकाऱ्यांकडून बदलण्यात आली आहे. डाळिंबाच्या ऐवजी उसाची नोंद केल्याने या महिलेला कमी मोबदला मिळाला. याचा जाब विचारताच महिलेवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी महावितरणचे अधिकारी देत आहेत. पुष्पा बबन निंबाळकर यांची लासुर्णे येथील गट क्रमांक ७२३ येथील शेतामधून महापारेषणची भिगवण-वालचंदनगर २२० केव्हीची वीजवाहिणी गेली आहे. त्यांच्या शेतामध्ये महावितरणने मनोरे उभे केले आहेत. या गटामध्ये निंबाळकर यांनी ८० गुंठ्यांमध्ये डाळिंबाची फळबाग लावलेली आहे. याच शेतामधून वीज वाहिनी गेल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत जाब विचारताच गुन्हा दाखल करण्याची धमकी मिळत असल्याने न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न निंबाळकर यांना पडला आहे. शासनाच्या निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून मनोरे आणि वीज वाहिन्या गेल्या असतील, किंवा मनोरे उभे करायचे असतील त्या बाधित शेतकऱ्यांना मोबदला देणे बंधनकारक आहे. शासनाचा नियम असतानाही महापारेषणचे अधिकारी व ठेकेदार निंबाळकरांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांना मदत करण्याऐवजी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. निंबाळकर यांच्या शेतामध्ये साधारणपणे सात महिन्यांपूर्वी हा मनोरा उभा करण्यात आला होता. त्यावेळी मोबदला देण्यासंदर्भात कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला होता. या पंचनाम्यावेळी डाळींबाच्या पिकाचा मोबदला मिळावा अशी विनंती निंबाळकरांनी केली होती. त्यावेळी त्यांचा सातबारा उतारा घेऊन पंचनाम्यात डाळिंबाच्या पिकाची नोंद करण्यात आली होती. परंतु, डाळिंबाच्या पिकाचा मोबदला जास्त द्यावा लागेल म्हणून अधिकाऱ्यांनी डाळिंब पिकाची नोंद खोडून त्याठिकाणी उस पिकाची नोंद केली. ही नोंद झाल्यावर त्यांना ऊसाच्या पिकाचा मोबदला दिला गेला. तेव्हापासून त्या उर्वरीत मोबदल्यासाठी झगडत आहेत. ही खाडाखोड करणाऱ्या तसेच चुकीच्या नोंदी करणाऱ्या कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह महापारेषणचे अधिकारी, ठेकेदार यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी निंबाळकर यांनी मुख्यमंत्री व उजार्मंत्र्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

निंबाळकर यांच्या शेतातील पिकाच्या मोबदल्याचा विषय मी याठिकाणी रुजू होण्यापुर्वीचा आहे. याविषयाची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. बाधित शेतक-याच्या पिकाचा पंचनामा कृषिविभागाने केला होता. प्रकरणाचा अभ्यास करुन मार्ग काढला जाईल. कोणत्याही बाधित शेतक-यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. - सोमनाथ अलीमोरे, उपकार्यकारी अभियंता

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरीIndapurइंदापूर