शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

मोबदला कमी दाखविण्यासाठी इंदापुरात अधिकाऱ्यांनी पिकाची नोंदच बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 16:09 IST

कमी मोबदला देण्यासाठी चक्क एका शेतकरी महिलेच्या सातबारा उताऱ्यावरील डाळिंबाच्या पिकाची नोंदच कषि अधिकाऱ्यांकडून बदलण्यात आली आहे. डाळिंबाच्या ऐवजी उसाची नोंद केल्याने या महिलेला कमी मोबदला मिळाला.

ठळक मुद्देकृषि अधिकाऱ्यांकडून बदलण्यात आली सातबारा उताऱ्यावरील डाळिंबाच्या पिकाची नोंदगुन्हा दाखल करण्याची धमकी मिळत असल्याने न्याय कोणाकडे मागायचा? : पुष्पा निंबाळकर

लासुर्णे : शेतकऱ्यांना मोदबला देताना शासकीय अधिकारी नेहमी हात आखडता घेतात. याचा उत्तम नमुना इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथे समोर आला आहे. कमी मोबदला देण्यासाठी चक्क एका शेतकरी महिलेच्या सातबारा उताऱ्यावरील डाळिंबाच्या पिकाची नोंदच कृषि अधिकाऱ्यांकडून बदलण्यात आली आहे. डाळिंबाच्या ऐवजी उसाची नोंद केल्याने या महिलेला कमी मोबदला मिळाला. याचा जाब विचारताच महिलेवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी महावितरणचे अधिकारी देत आहेत. पुष्पा बबन निंबाळकर यांची लासुर्णे येथील गट क्रमांक ७२३ येथील शेतामधून महापारेषणची भिगवण-वालचंदनगर २२० केव्हीची वीजवाहिणी गेली आहे. त्यांच्या शेतामध्ये महावितरणने मनोरे उभे केले आहेत. या गटामध्ये निंबाळकर यांनी ८० गुंठ्यांमध्ये डाळिंबाची फळबाग लावलेली आहे. याच शेतामधून वीज वाहिनी गेल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत जाब विचारताच गुन्हा दाखल करण्याची धमकी मिळत असल्याने न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न निंबाळकर यांना पडला आहे. शासनाच्या निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून मनोरे आणि वीज वाहिन्या गेल्या असतील, किंवा मनोरे उभे करायचे असतील त्या बाधित शेतकऱ्यांना मोबदला देणे बंधनकारक आहे. शासनाचा नियम असतानाही महापारेषणचे अधिकारी व ठेकेदार निंबाळकरांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांना मदत करण्याऐवजी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. निंबाळकर यांच्या शेतामध्ये साधारणपणे सात महिन्यांपूर्वी हा मनोरा उभा करण्यात आला होता. त्यावेळी मोबदला देण्यासंदर्भात कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला होता. या पंचनाम्यावेळी डाळींबाच्या पिकाचा मोबदला मिळावा अशी विनंती निंबाळकरांनी केली होती. त्यावेळी त्यांचा सातबारा उतारा घेऊन पंचनाम्यात डाळिंबाच्या पिकाची नोंद करण्यात आली होती. परंतु, डाळिंबाच्या पिकाचा मोबदला जास्त द्यावा लागेल म्हणून अधिकाऱ्यांनी डाळिंब पिकाची नोंद खोडून त्याठिकाणी उस पिकाची नोंद केली. ही नोंद झाल्यावर त्यांना ऊसाच्या पिकाचा मोबदला दिला गेला. तेव्हापासून त्या उर्वरीत मोबदल्यासाठी झगडत आहेत. ही खाडाखोड करणाऱ्या तसेच चुकीच्या नोंदी करणाऱ्या कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह महापारेषणचे अधिकारी, ठेकेदार यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी निंबाळकर यांनी मुख्यमंत्री व उजार्मंत्र्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

निंबाळकर यांच्या शेतातील पिकाच्या मोबदल्याचा विषय मी याठिकाणी रुजू होण्यापुर्वीचा आहे. याविषयाची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. बाधित शेतक-याच्या पिकाचा पंचनामा कृषिविभागाने केला होता. प्रकरणाचा अभ्यास करुन मार्ग काढला जाईल. कोणत्याही बाधित शेतक-यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. - सोमनाथ अलीमोरे, उपकार्यकारी अभियंता

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरीIndapurइंदापूर