अनलॉकनंतर भाजीपाला २० टक्क्यांनी महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST2021-06-22T04:08:45+5:302021-06-22T04:08:45+5:30

(स्टार डमी ८३१) पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुणे शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन लावावा लागला होता. अनलॉक झाल्यानंतर बाजार ...

After unlock, vegetables became 20 per cent more expensive | अनलॉकनंतर भाजीपाला २० टक्क्यांनी महागला

अनलॉकनंतर भाजीपाला २० टक्क्यांनी महागला

(स्टार डमी ८३१)

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुणे शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन लावावा लागला होता. अनलॉक झाल्यानंतर बाजार सुरू झाला. मात्र, पावसाळा सुरू झाल्याने भाजीपाल्याची आवक कमी झाली. त्यामुळे मागणी जास्त आणि आवक कमी यामुळे विविध भाजीपाल्याच्या दरात २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

कांदा, टोमॅटो, बटाटे, भेंडी, मिरची, कारले, शेवगा, वांगे, मेथी, शेपू आणि पालक यांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. गृहिणी आता आहारात भाजीपाल्याऐवजी कडधान्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

------

पुन्हा वरणावर जोर...

१) कोरोनामुळे वर्षभरापासून आधीच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊन आणि पावसामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे जेवणात वरण करावे लागत आहे.

- संगीता कांबळे, गृहिणी

----

भाजीपाल्याचे दर वाढल्याने सध्या आम्ही आहारात पालेभाज्या करतच नाही. आर्थिकदृष्ट्या आमचे गणित बिघडून जाते. त्यामुळे कडधान्य ह्यावरच सध्या आमचा आहार आहे.

- मनीषा भोसुरे, गृहिणी

------

म्हणून वाढले दर...

१) गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने भावात वाढ झाली आहे.

- सुहास भुजबळ, व्यापार

----

२) पावसामुळे पुणे आणि परिसरातून भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. इतर जिल्ह्यातून भाजीपाला मागवावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने दरातही वाढ झाली आहे.

- लक्ष्मण टुले, व्यापारी

-------

शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा

१) पावसामुळे भाजीपाला शेतातच खराब झाला आहे. तोडीला आलेली सगळी मेथी सडली आहे. त्यामुळे ३ महिन्यांत केलेली मेहनतही निघाली नाही.

- प्रताप कदम, शेतकरी

----

२) आम्ही शेतात, पालक, शेपू आणि कोथिंबीर केली होती. ती आता काढायला आली होती. मात्र, सततच्या पावसामुळे शेतात गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे तिनही पिके सडून गेली आहेत.

- शंकर हारगुडे, शेतकरी

-------

* भाजीपाल्याचे दर (प्रति किलो)

भाजीपाला १३ जून २१ जून

कांदा १५ २०

टोमॅटो १० १५

बटाटे १५ २०

भेंडी २५ ३०

मिरची २५ ३०

कारले ३० ३५

शेवगा ४० ५०

वांगे ३० ४०

पालक १० १५

Web Title: After unlock, vegetables became 20 per cent more expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.