तोडफोडीनंतर शहरामध्ये दहशतमुक्त वातावरण
By Admin | Updated: June 9, 2014 23:26 IST2014-06-09T23:26:32+5:302014-06-09T23:26:32+5:30
छत्रपती शिवाजीमहाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर तोडफोडीनंतर तणाव निर्माण झाला होता; परंतु पोलीस सर्वत्र शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले आहेत.

तोडफोडीनंतर शहरामध्ये दहशतमुक्त वातावरण
>पुणो : फेसबुकवर छत्रपती शिवाजीमहाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर तोडफोडीनंतर तणाव निर्माण झाला होता; परंतु पोलीस सर्वत्र शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले आहेत. शहरामध्ये दहशतमुक्त वातावरण असून आपण दहशतीखाली असल्याची तक्रार अद्यापर्पयत पोलिसांकडे कोणीही केली नसल्याचा दावा सह पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी केला आहे.
मोहसीन शेखच्या खुनामध्ये धनंजय देसाईचा संबंध असल्याबाबत ठोस पुरावे मिळालेले नसून, त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती कुमार यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील दत्तवाडी आणि पिंपरी-चिंचवड परिसरात तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने 23 पेक्षा अधिक पीएमपी बसची तोडफोड केली. या घटनांमध्ये एकूण 13 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 23 जणांना अटक करण्यात आली आहे. शांतता राखण्यासाठी 15क् जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. फेसबुक पोस्टचे पडसाद उमटल्यानंतर बंदोबस्तात वाढ करण्यात आली. हडपसर, भोसरी तसेच दत्तवाडी, पिंपरी भागात राज्य राखीव दलाच्या 3 कंपन्या, होमगार्ड व स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
फेसबुकवरील प्रोफाईल डिलीट करणो शक्य आहे; मात्र तो मेसेज व्हॉट्सअॅपवर घेतला व वैयक्तिक पातळीवर फॉरवर्ड करण्यात आला, तर त्यावर नियंत्रण आणणो शक्य नसल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले. आक्षेपार्ह मजकूर आपल्यार्पयत आला तर तो डिलीट करणो आवश्यक आहे; परंतु हे मेसेज तसेच पुढे पाठविल्यामुळे वातावरण बिघडते. फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकणा:याला चेहरा नाही. राष्ट्रपुरुषांची बदनामी करून समाजात विद्वेष माजवण्याचा त्यांचा उद्देश त्यामुळे सफल होतो. त्याला नागरिकांनी अटकाव केला पाहिजे, असेही कुमार म्हणाले. (प्रतिनिधी)
शिवाजीमहाराजांबद्दल फेसबुकवर जी पोस्ट टाकण्यात आली होती, तिच्या यूआरएलवरून अद्यापर्पयत कोणतीही माहिती मिळालेली नाही. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, हा यूआरएल सौदी अरेबिया वगैरे देशात असल्याच्या बातम्या येत असल्या तरी त्यामध्ये तथ्य नाही. पोलीस आरोपीचा शोध घेत असून, शांतता प्रस्थापित करणो आणि सामाजिक सौहार्द राखणो ही पहिली जबाबदारी आहे.
- संजय कुमार, सह पोलीस आयुक्त