शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानंतर मानवंदना देण्याच्या फाईलवर पाच तास सहीच होत नव्हती; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 17:07 IST

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे काही दिवसांपूर्वी पुण्यात दुःखद निधन झाले. मृत्यूनंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु त्यांना मानवंदना देण्याच्या फाईलवर पाच तास सहीच होत नव्हती, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे काही दिवसांपूर्वी पुण्यात दुःखद निधन झाले. मृत्यूनंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु त्यांना मानवंदना देण्याच्या फाईलवर पाच तास सहीच होत नव्हती, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. महाविकासआघाडी सरकारला दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. या दोन वर्षाच्या कालावधीतील सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या वतीने पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कामावर परत कधी येतील याची गॅरंटी नाही. आणि महाराष्ट्राला पर्यायी मुख्यमंत्री देखील नाही. अशा प्रकारे राज्य चालत नाही. राज्य चालवण्याचेही काही नियम आहेत. तुम्ही दहा महिने विधानसभेचे अध्यक्ष निवडणार नाही, एकोणीस दिवसांपासून मुख्यमंत्री कामावर नाही, मग सह्या कोणी करायच्या? बाबासाहेब पुरंदरे यांच्या मृत्युनंतर त्यांना मानवंदना देण्याच्या फाइलवर पाच तास सहीच होत नव्हती, कारण महाराष्ट्राला पर्यायी मुख्यमंत्री नाही. 

''उद्धव ठाकरे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. विद्यार्थीदशेपासून आम्ही मित्र आहोत. आजारी माणसाला लवकरात लवकर आराम पडावा अशी प्रार्थना करण्याची भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे मी अंबाबाईला आणि कसब्याच्या गणपतीला त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करतो. पण तोपर्यंत काय?  सरकार असं चालतं का? व्हर्चुअल बैठकीला देखील मुख्यमंत्र्याचा व्हिडिओ बंद असतो का? अधिवेशन नागपूरला नाही तर मुंबईला का? पाच दिवसांच अधिवेशन का? दोन दिवसांपासून अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांवर नाही, आमदारांनी काय चपात्या लाटायच्या का? असे प्रश्न देखील चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले.''

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलpune airportपुणे विमानतळBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी