शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील कालवा फुटीनंतर पीडितांच्या मनात अद्याप धास्तीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 06:47 IST

जनजीवन हळूहळू पूर्वपदावर : दिवाळीच्या तोंडावर नुकसानीची भरपाई होईल?

पुणे : दिवाळी सणाला महिनाभराचा अवकाश असला तरी मुठा कालवा फुटल्यामुळे झालेले नुकसान तातडीने भरून येणारे नाही. भलेही पालिका व शासनाकडून मदत केली जात होत असली तरीदेखील कमी कालावधीत घरे कशी उभी करायची, हा प्रश्न मुठा कालवा अपघातातील पीडितांसमोर आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून स्वयंसेवी संस्था, प्रशासन यांच्याकडून करण्यात आलेल्या मदतीमुळे पीडितांचे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या सगळ््यात होणारे शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान, त्यांच्या अडचणीवर मार्ग काढण्याचे आव्हान उभे पीडितांसमोर आहे.

‘‘त्या’’ घटनेला चार दिवस उलटून गेल्यानंतरही त्या परिसरातील नागरिकांच्या मनात ती घटना घर करून आहे. दुसरीकडे मुठा कालव्यातील पीडितांना आधार देण्यासाठी आता पालिकेच्या कर्मचारी झटून कामे करताना दिसत आहेत. त्यांना हातभार लावण्यासाठी इतर स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, त्यांना मदतीचे आश्वासन पालिका व सरकारच्यावतीने देण्यात आले आहे. मात्र त्याची कार्यवाही तितक्याच जलदगतीने व्हावी, अशी मागणी पीडितांनी केली आहे. अनेकदा शासन मदत जाहीर करते. परंतु तांत्रिक अडचणींमुळे ती मदत लांंबल्याने पदरी निराशा येते. असा अनुभव काही पीडितांनी व्यक्त केला. रविवारी दुपारी सूर्योदय कपडा बँकेच्यावतीने कपड्यांचे वाटप करण्यात आले.

तसेच लायन्स क्लब गांधी जयंतीच्यानिमित्ताने या भागात सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करणार आहे. सगळा संसार त्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर वाहून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांच्याकडे दोनवेळचे अन्न शिजवण्यासाठी भांडीदेखील नाहीत. याकरिता सेव्ह द एनव्हायर्न्मेंट ग्रुपच्यावतीने गरजू पीडितांना भांडी देण्यात येणार आहेत. यात गॅस, स्टोव्हपासून इतर गरजू वस्तू असल्याचे हेमंत धामनुसे यांनी सांगितले. पालिकेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य दिले जाणार असून इतर शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याचे काय हा प्रश्न यावेळी पीडितांनी उपस्थित केला. याविषयी मुनी शेख यांनी सांगितले, माझी मुलगी गरवारे महाविद्यालयात कला शाखेच्या दुसऱ्या वर्गाला शिकते. दोन दिवसांपूर्वी तिचा पेपर होता. मात्र या घटनेनंतर सगळे चित्र बदलले.

घरात जेवढं काही होतं तेवढं सगळं वाहून गेल्याने तिला पेपर देता आले नाहीत. छोटी मुलगी एसएनडीटी महाविद्यालयात ११ वीच्या वर्गातआहे. मुलींच्या शिक्षणाविषयी पुढील काही दिवस त्रासदायक ठरणार असून त्याला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही. लवकरात लवकर परिस्थिती सुधारल्यास त्यांना नियमितपणे महाविद्यालयात जाता येईल. माझ्या दोन्ही मुली गेल्या चार दिवसांपासून शाळेत गेलेल्या नाहीत. त्यांना शाळेत पाठवायचे तर शाळेचे कपडे नाहीत, पाटी, पुस्तक, दप्तरे या सर्व वस्तू पाहिजेत. हे सगळंच वाहून गेल्याने काय करायचे, हा प्रश्न आमच्यासमोर असल्याची भावना पीडित पूजा खंडागळे यांनी दिली.इथं कसं थांबायचं, कसं राहायचं सगळीकडे नुसता वास सुटलाय...४चार दिवस लोटल्यानंतरदेखील अद्याप दांडेकर पुलाजवळील वसाहतीत कालव्याच्या पाण्याचा, त्याबरोबर वाहून आलेल्या घाणीचा, त्यामुळे परिसरात तयार झालेल्या कचºयाची दुर्गंधी पसरली आहे. त्या सर्व भागातील घरांना ओलसरपणा आला असून त्याच्या वासाने तेथील नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे तातडीने परिसराची स्वच्छता करण्याची मागणी प्रशासनाकडे केली असून अनेकांनी‘‘इथं कसं थांबायचं, कसं राहायचं, सगळीकडे नुसता वास सुटलाय’’ या शब्दांत आपली व्यथा मांडली. 

टॅग्स :Puneपुणेkalwaकळवा