शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

"तुमचं अपयश वारंवार लोकांसमोर आणू नका"; वाल्मीक कराड शरण आल्यानंतर आंबेडकरांनी पोलिसांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 08:54 IST

वाल्मीक कराडच्या अटकेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना दबावाला बळी न पडण्याचे आवाहन केलं आहे.

Walmik Karad: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला वाल्मीक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. गेले २२ दिवस फरार असलेला वाल्मीक कराड मंगळवारी सीआयडीसमोर शरण आला. त्यानंतर त्याला केज न्यायालयाने कोठडी सुनावली. यानंतर आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या असून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही याप्रकरणाबाबत भाष्य केलं आहे. वाल्मीक कराड कुठे होता हे पोलीस खात्याला माहीत नव्हतं याचं आश्चर्य वाटतं. वाल्मीक कराड प्रकरणात सरकारवर दबाव आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याला बळी पडू नये असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून वाल्मीक कराड फरार होता. पोलिसांसह सीआडीचे पथक बरेच दिवस त्याचा शोध घेत होते. मात्र त्याचा कोणताही पत्ता लागत नव्हता. त्यानंतर अचानक दोन दिवसांपासून वाल्मीक कराड शरण येणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर  सोमवारी रात्री अक्कलकोट स्वामींचे दर्शन घेऊन वाल्मीक कराड सकाळी पुण्यात दाखल झाला व दुपारी सव्वाबारा वाजता सीआयडी मुख्यालयात शरण आहे. तीन तास चौकशी केनंतर सीआयडीचे पथक वाल्मीक कराडला घेऊन केजकडे रवाना झाले.

केज न्यायालयाने वाल्मीक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वाल्मिक कराडला बीड शहर पोलीस ठाण्यात नेण्यात येत आहे. या सगळ्या प्रकारावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी दबावाला बळी पडू नये असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. पुण्यात कोरेगाव भीमा येथील शौर्य दिनाच्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते.

"पोलीस खात्याला वाल्मिक कराड कुठे लपलेला आहे हे माहिती नाही याचे मला आश्चर्य वाटत आहे. तपास यंत्रणांनी आपले अपयश वारंवार लोकांसमोर आणू नये. सरकामध्ये यासंदर्भात दबाव आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करावी एवढीच त्यांना विनंती आहे. मुख्यमंत्र्यांनी दबावाला बळी पडू नये एवढीच माझी विनंती आहे," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

"कोण काय म्हणतो ते महत्त्वाचे नाही. जिथे पुरावा आहे तिथे आम्ही कोणालाही सोडणार नाही. आम्ही पुरावे गोळा करतच आहोत, आणखी कोणाकडे असतील तर तेही द्यावेत. संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत असलेल्यांना शिक्षा झाली पाहिजे हे महत्त्वाचे आहे," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस