शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"तुमचं अपयश वारंवार लोकांसमोर आणू नका"; वाल्मीक कराड शरण आल्यानंतर आंबेडकरांनी पोलिसांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 08:54 IST

वाल्मीक कराडच्या अटकेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना दबावाला बळी न पडण्याचे आवाहन केलं आहे.

Walmik Karad: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला वाल्मीक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. गेले २२ दिवस फरार असलेला वाल्मीक कराड मंगळवारी सीआयडीसमोर शरण आला. त्यानंतर त्याला केज न्यायालयाने कोठडी सुनावली. यानंतर आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या असून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही याप्रकरणाबाबत भाष्य केलं आहे. वाल्मीक कराड कुठे होता हे पोलीस खात्याला माहीत नव्हतं याचं आश्चर्य वाटतं. वाल्मीक कराड प्रकरणात सरकारवर दबाव आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याला बळी पडू नये असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून वाल्मीक कराड फरार होता. पोलिसांसह सीआडीचे पथक बरेच दिवस त्याचा शोध घेत होते. मात्र त्याचा कोणताही पत्ता लागत नव्हता. त्यानंतर अचानक दोन दिवसांपासून वाल्मीक कराड शरण येणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर  सोमवारी रात्री अक्कलकोट स्वामींचे दर्शन घेऊन वाल्मीक कराड सकाळी पुण्यात दाखल झाला व दुपारी सव्वाबारा वाजता सीआयडी मुख्यालयात शरण आहे. तीन तास चौकशी केनंतर सीआयडीचे पथक वाल्मीक कराडला घेऊन केजकडे रवाना झाले.

केज न्यायालयाने वाल्मीक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वाल्मिक कराडला बीड शहर पोलीस ठाण्यात नेण्यात येत आहे. या सगळ्या प्रकारावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी दबावाला बळी पडू नये असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. पुण्यात कोरेगाव भीमा येथील शौर्य दिनाच्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते.

"पोलीस खात्याला वाल्मिक कराड कुठे लपलेला आहे हे माहिती नाही याचे मला आश्चर्य वाटत आहे. तपास यंत्रणांनी आपले अपयश वारंवार लोकांसमोर आणू नये. सरकामध्ये यासंदर्भात दबाव आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करावी एवढीच त्यांना विनंती आहे. मुख्यमंत्र्यांनी दबावाला बळी पडू नये एवढीच माझी विनंती आहे," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

"कोण काय म्हणतो ते महत्त्वाचे नाही. जिथे पुरावा आहे तिथे आम्ही कोणालाही सोडणार नाही. आम्ही पुरावे गोळा करतच आहोत, आणखी कोणाकडे असतील तर तेही द्यावेत. संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत असलेल्यांना शिक्षा झाली पाहिजे हे महत्त्वाचे आहे," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस