शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

"तुमचं अपयश वारंवार लोकांसमोर आणू नका"; वाल्मीक कराड शरण आल्यानंतर आंबेडकरांनी पोलिसांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 08:54 IST

वाल्मीक कराडच्या अटकेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना दबावाला बळी न पडण्याचे आवाहन केलं आहे.

Walmik Karad: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला वाल्मीक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. गेले २२ दिवस फरार असलेला वाल्मीक कराड मंगळवारी सीआयडीसमोर शरण आला. त्यानंतर त्याला केज न्यायालयाने कोठडी सुनावली. यानंतर आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या असून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही याप्रकरणाबाबत भाष्य केलं आहे. वाल्मीक कराड कुठे होता हे पोलीस खात्याला माहीत नव्हतं याचं आश्चर्य वाटतं. वाल्मीक कराड प्रकरणात सरकारवर दबाव आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याला बळी पडू नये असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून वाल्मीक कराड फरार होता. पोलिसांसह सीआडीचे पथक बरेच दिवस त्याचा शोध घेत होते. मात्र त्याचा कोणताही पत्ता लागत नव्हता. त्यानंतर अचानक दोन दिवसांपासून वाल्मीक कराड शरण येणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर  सोमवारी रात्री अक्कलकोट स्वामींचे दर्शन घेऊन वाल्मीक कराड सकाळी पुण्यात दाखल झाला व दुपारी सव्वाबारा वाजता सीआयडी मुख्यालयात शरण आहे. तीन तास चौकशी केनंतर सीआयडीचे पथक वाल्मीक कराडला घेऊन केजकडे रवाना झाले.

केज न्यायालयाने वाल्मीक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वाल्मिक कराडला बीड शहर पोलीस ठाण्यात नेण्यात येत आहे. या सगळ्या प्रकारावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी दबावाला बळी पडू नये असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. पुण्यात कोरेगाव भीमा येथील शौर्य दिनाच्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते.

"पोलीस खात्याला वाल्मिक कराड कुठे लपलेला आहे हे माहिती नाही याचे मला आश्चर्य वाटत आहे. तपास यंत्रणांनी आपले अपयश वारंवार लोकांसमोर आणू नये. सरकामध्ये यासंदर्भात दबाव आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करावी एवढीच त्यांना विनंती आहे. मुख्यमंत्र्यांनी दबावाला बळी पडू नये एवढीच माझी विनंती आहे," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

"कोण काय म्हणतो ते महत्त्वाचे नाही. जिथे पुरावा आहे तिथे आम्ही कोणालाही सोडणार नाही. आम्ही पुरावे गोळा करतच आहोत, आणखी कोणाकडे असतील तर तेही द्यावेत. संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत असलेल्यांना शिक्षा झाली पाहिजे हे महत्त्वाचे आहे," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस