शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

सासवडला २०० वर्षांनंतर रंगले बगाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 02:53 IST

सासवड येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ, श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांच्या चैत्री उत्सवाला रविवार पासून सुरवात झाली. गेल्या २०० वर्षांपासून बंद असलेली बगाडाची परंपरा या वर्षापासून पुन्हा सुरु झाली आहे. त्याची नवलाई पाहण्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गावचे ज्ञानेश्वर जगताप तथा माऊली यांना या बगाडावर बसण्याचा पहिला मान मिळाला.

जेजुरी - सासवड येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ, श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांच्या चैत्री उत्सवाला रविवार पासून सुरवात झाली. गेल्या २०० वर्षांपासून बंद असलेली बगाडाची परंपरा या वर्षापासून पुन्हा सुरु झाली आहे. त्याची नवलाई पाहण्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गावचे ज्ञानेश्वर जगताप तथा माऊली यांना या बगाडावर बसण्याचा पहिला मान मिळाला.चैत्र वद्य प्रतिपदा यात्रेचा पहिला दिवस असल्याने पहाटे उत्सव मूर्तींना पंचामृत स्नान व महापूजा करण्यात आली. सकाळी ११ वाजता बगाडाचे वाद्यांच्या गजरात पूजन झाले. त्यानंतर माउली जगताप यांना बगाडावर बसवण्यात आल्यावर गावक-यांनी आणि यात्रा कमिटीच्या प्रमुखांनी दोर हातात धरून हलगी, ताशा, तुतारीच्या निनादात गुलालाची मुक्त उधळण केली. भैरवनाथांचा जयघोष करत बगाडाच्या पाच फे-या पूर्ण केल्या. त्यानंतर मानाचा ध्वज कळस ते बगाड असा बांधण्यात आला. महाआरती होऊन हा सोहळा पार पडल्यावर महिला भाविकांनी बगाडस्थळाची पूजा आणि दर्शनाला गर्दी केली. उत्सव मूर्तींना त्रिकाळ स्नान व पूजा करण्यात आली. सायंकाळी पालखीतून ग्राम प्रदक्षणा व मध्यरात्रपर्यंत छबिन्याचा कार्यक्रम मंदिरासमोर संपन्न झाला.

टॅग्स :Fairजत्राPuneपुणे