शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राजगुरुनगर येथे वकिलाची भीमानदीत उडी मारून आत्महत्या; कारण उद्याप अस्पष्ट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 13:10 IST

राजगुरूनगर येथील जिल्हा न्यायालयात चंद्रशेखर हे वकील म्हणून कार्यरत होते..

राजगुरुनगर: राजगुरुनगर (ता. खेड ) येथे भिमा नदीच्या पुलावरून उडी आत्महत्या केली असल्याची घटना (दि. १६ रोजी ) घडली आहे.चंद्रशेखर कोंडीबा टाकळकर (वय ४६ )रा. तिन्हेवाडी रोड राजगुरुनगर असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे.मात्र, अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. याप्रकरणी मृत चंद्रशेखर टाकळकर यांचा भाऊ अमित कोंडिबा टाकळकर याने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजगुरूनगर येथील जिल्हा न्यायालयात चंद्रशेखर हे वकील म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  मंगळवारी (दि. १६ ) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खेड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर टाकळकर यांनी भीमानदीच्या केदारेश्वर जुन्या पुलावरून पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या एका वकिलाने हा प्रकार पाहिल्यानंतर ही घटना समोर आली. या घटनेनंतर राजगुरुनगर शहरातील वकील व ग्रामस्थ, पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रथम काही तरुणांनी नदीच्या पाण्यात बुडी मारून तसेच काठीच्या सह्याने पाण्यात शोध घेतला. मात्र, तो अयशस्वी ठरला. बंधारा पाण्याने तुडुंब भरला असल्याने तसेच पाण्यात जलपर्णी असल्याने शोध कार्यात मोठा अडथळा निर्माण होत होता. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.त्यानंतर लोंखडी गळ टाकून शोध घेण्यात आला अखेर दोन तासाने नगर परिषद कर्मचारी, पोलिस व नागरिकांच्या मदतीने टाकळकर यांचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून मृत चंद्रशेखर टाकळकर यांचा भाऊ अमित कोंडिबा टाकळकर यांने खेड पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. चंद्रशेखर टाकळकर हे राजगुरूनगर येथील जिल्हा न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मुत्यूने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे...

टॅग्स :KhedखेडadvocateवकिलDeathमृत्यूPoliceपोलिस