शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी करणार वणव्यांचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 19:28 IST

वणवे किंवा आगी लागायचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक म्हणजे नैसर्गिक व दुसरे मानवनिर्मित असते.

ठळक मुद्देउन्हाळ्यामुळे आगीच्या घटना वाढणार वन विभागाकडून उपाययोजना
पुणे : उन्हाळा सुरू झाल्याने टेकडी, वन विभागाच्या परिसरात आगी लागण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तळजाई टेकडीवर आणि सोमवारी म्हातोबा टेकडीवर आग लागली. त्यात टेकडीचे नुकसान तर झालेच पण जैवविविधतेसाठी आवश्यक घटक कीटक, किडे, छोटे प्राणी, पक्ष्यांचे घरटे यांचाही त्यामध्ये बळी गेला. दरम्यान असे वणवे विझविण्यासाठी वन विभागातर्फे विविध यंत्रांचा उपयोग करण्यात येत आहे. वणव्यांचा सामना करण्यासाठी संपूर्णपणे वन विभाग सज्ज झाले आहे. त्यासाठी अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे. वणवे किंवा आगी लागायचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक म्हणजे नैसर्गिक व दुसरे मानवनिर्मित असते. नैसर्गिक वणव्यांचे अथवा आगी लागण्याचे प्रमाण केवळ १२ ते १५ टक्के एवढेच आहे, तर मानवनिर्मित बाबींचे सर्वसाधारण प्रमाण ८० ते ८५ टक्के असते. नैसर्गिक आगी ही झाडे किंवा बांबू यांच्या घर्षणाने लागू शकतात अथवा वीज पडून, शॉर्टसर्किट होऊन आदी गोष्टींमुळे आग लागू शकतात. परंतु मानव निर्मित आग किंवा वणवे हे अनेक वेळा समाजकंटक, विकृत लोकांकडून लावले जातात. यामध्ये सिगरेट, बीडी, काडेपेटीचे थोटके जंगलात, डोंगरात फेकून दिले जातात. त्यामुळे आग लागते. वणवे हे अनेक वेळा गैरसमजुती मधून लावले जातात. वणवे, आगीच्या भक्ष्यस्थानी पडून दरवर्षी अनेक हेक्टर जागेतील देशी झाडे, औषधी झाडे, अनेक जातीचे पशु, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक, फुलपाखरे, बेडूक, साप यांचा मोठा अधिवास असतो. तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक होतो. साधारणत जानेवारी ते मे अखेरपर्यंत आगीचे प्रमाण किंवा वनव्याचे सत्र मोठे असते, अशी माहिती टेल्स ऑर्गनायझेशनचे लोकेश बापट यांनी लोकमत ला दिली. शहरात आणि जिल्ह्यात ज्या ठिकाणी वणवे लागण्याची शक्यता आहे, अशी ठिकाणे आम्ही शोधली आहेत. त्या ठिकाणी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांसाठी एक मजूर नेमण्यात आला आहे. तो वणव्यावर लक्ष ठेवेल. जिथे आग लागली असेल, त्याची माहिती तो वन विभागाला देईल. तसेच वणवे ज्या ठिकाणी लागतात, त्या ठिकाणी जाळपट्टी टाकली आहे. शक्य त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवल्या आहेत. जेणेकरून त्वरित आगीवर पाणी टाकून विझवता येईल. अनेक नागरिक दुपारी टेकडीवर फिरायला येतात. त्यातील बरेचजण बिअर पितात, पत्ते खेळतात, सिगारेट ओढतात. त्यातून आग लागल्याच्या घटना घडतात. त्यावरही आमचे लक्ष आहे, असे सहाय्यक वनसंरक्षक महेश भावसार यांनी सांगितले. आग विझविण्यासाठी अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी फायर ब्लोअर हे अ‍ॅडव्हान्स यंत्रही आम्ही वापरत आहोत. ते मजूराकडे दिले असून, हे यंत्र पाठीवर ठेवून आग विझवता येते. त्यातून हवेचा मोठा झोत बाहेर येतो आणि आग विझते. छोटे छोटे फायर बिटरही उपलब्ध करून दिले आहेत. पूर्वी झाडाच्या फांद्या किंवा माती टाकून आग विझविली जात असे. परंतु, नागरिकांना त्यासाठी आगीच्या जवळ जावे लागे आणि त्यात अनेकदा ते भाजले जात असत. त्यामुळे आम्ही आता हाताने वापरता येतील, असे यंत्र उपलब्ध केली आहेत. ग्राक कटर हे यंत्र, कर्मचाºयांना फायर प्रुफ ड्रेस देत आहोत, असे सहाय्यक वनसंरक्षक महेश भावसार यांनी ह्यलोकमतह्णला सांगितले. वणवा लावल्याने पुढील वर्षी गवत चांगलं येते, जमीन सुपीक राहते, झाडे चांगली येतात. प्रथम हा गैरसमज दूर केला पाहिजे. निसर्गामधील वृक्ष, वेली, झाड, कीटक प्राणी हे निसर्गचक्र व्यवस्थित ठेवण्याचे काम माणसापेक्षा कितीतरी जास्त चांगलं करीत असतात. आपण मात्र उगीचच मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करत राहतो. वनवे लावल्याने जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. पहिल्याच पावसात गवत जळून गेल्याने त्याच्या आजूबाजूची सर्व माती मोकळी होते व हीच माती डोंगरदºयात वाहून धरणामध्ये जाते. तिथे गाळ मोठ्या प्रमाणात साठत राहतो. - लोकेश बापट, टेल्स आॅर्गनायझेशन ..............वणवा लागला तर १९२६ वर कॉल करा राज्यात कुठेही वन क्षेत्राला वनवा लागला, कुठे अतिक्रमण होत असेल, वन्यजीव जखमी असेल किंवा वन विभागाशी संबंधित काही समस्या असेल तर त्वरित कारवाई होण्यासाठी वन विभागाने १९२६ हा २४ तास कॉल सेंटर नंबर सुरू केला. नागरिकांनी वणवा लागला किंवा वन विभागाच्या इतर समस्येबाबत यावर माहिती द्यावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले. ...........................म्हातोबा टेकडीवर सोमवारी खूप मोठा वणवा लागला. हा वणवा चांगलाच वाढला होता. त्याबाबत वनविभागाला कॉल केला होता. परंतु, त्यांचे कोणीही घटनास्थळी आले नाही. स्थानिक नागरिकांनीच इकडून-तिकडून पाणी आणले आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला. - अ‍ॅड. विंदा, स्थानिक नागरिक .....................