शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

कोरेगाव भीमासाठी प्रशासन सज्ज; विजयस्तंभ मानवंदनेसाठी तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 04:10 IST

गेल्या वर्षी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे मोठी दक्षता घेतली जात असून येत्या १ जानेवारी रोजी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या जनसमुदायाची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे.

पुणे : गेल्या वर्षी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे मोठी दक्षता घेतली जात असून येत्या १ जानेवारी रोजी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या जनसमुदायाची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. तसेच स्थानिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वयाने काम सुरू आहे. या काळात कायदा-सुव्यवस्थेच्या आड येणाºयांची कोणतीही गय केली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.कोरेगाव भीमा दंगलीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राम यांनी दोन महिन्यांत या परिसरातील नागरिकांच्या चार ते पाच बैठका घेतल्या. तसेच कोरेगाव भीमा, वढू, सणसवाडी, पेरणे फाटा, शिक्रापूर या ठिकाणांची पाहणी करून स्थानिकांशी चर्चा केली आहे. नागरिकांच्या तक्रारी, समस्या जाणून घेतल्या आहेत. कोरेगाव भीमा परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी चर्चा करून पोलिसांचा फौजफाटा वाढविण्यास सांगितले, तसेच पुण्याबाहेरून येणाºयांच्या वाहनांसाठी विशेष वाहनतळ उपलब्ध करून दिला जाईल. अन्नाची परवड होऊ नये म्हणून स्थानिक हॉटेलचालकांना सूचना दिल्या आहेत.येत्या १ जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी विविध ठिकाणांहून नागरिक येतील. त्यानिमित्ताने पुणे शहर व परिसरात फलक लावले जातात; परंतु फलक लावण्यापूर्वी तसेच स्वतंत्र कार्यक्रम किंवा रॅली काढायाची असल्यास जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार