शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

वडगाव आनंद येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे आदित्य ठाकरेंनी केले सांत्वन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 19:16 IST

वडगाव आनंद येथील दशरथ लक्ष्मण केदारी या शेतक-याने 17 सप्टेंबर रोजी कर्जबाजारी पणाला कंटाळून चिठ्ठी लिहित शेततळ्यात आत्महत्या केली होती.

आळेफाटा - वडगाव आनंद ता जुन्नर येथील कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या दशरथ केदारी यांचे कुटुंबीयांची गुरूवार (दि 27) रोजी शिवसेना युवा सेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट घेत सांत्वन केले. यावेळी आपल्या व्यथा मांडताना कुटुंबीयांचे अश्रू आनावर झाले होते. तर शिवसेना या कुटुंबीयांचे पाठिशी उभी राहणार असून त्यांचे मुलांचे शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

वडगाव आनंद येथील दशरथ लक्ष्मण केदारी या शेतक-याने 17 सप्टेंबर रोजी कर्जबाजारी पणाला कंटाळून चिठ्ठी लिहित शेततळ्यात आत्महत्या केली होती. आज गुरूवारी नाशिक येथील दौ-यानंतर दुपारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जुन्नर तालुक्यात येत वडगाव आनंद रेथील आत्महत्या केलेल्या या शेतक-याच्यी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी यावेळेस विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गो-हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहेर 

माजी आमदार बाळासाहेब दांगट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी संपर्कप्रमुख संभाजी तांबे तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे उपसभापती दिलीप डुंबरे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके नारायणगाव सरपंच बाबु पाटे पंचायत समितीचे सदस्य जीवन शिंदे, गणेश कवडे, गणेश वाघमारे, कैलास वाळुंज, सचिन वाळुंज उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. तसेच त्यांच्या पत्नी शांता यांनी यावेळी भाऊबीज ओवाळणी केली तर आदित्य ठाकरे यांनीही साडी देत आर्थिक मदत केली.

यावेळेस पत्रकारांनी संवाद साधताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले की वडगाव आनंद येथील घटना ही दुर्दैवी असून एक भाऊ म्हणून मी या कुटुंबीयांचे पाठिशी उभा राहणार आहे. गेल्या दोन तीन महिन्यांपासून  अशा घटना घडत आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांशी परिस्थिती अतिशय बिकट असून आतापर्यंत बांधावर कोणीही गेलेले नाही. कृषी मंत्री कोण व कुठे आहेत ते दिसणे गरजचे असल्याची टिका केली. नुकसानीचे संपुर्ण पंचनामे करून कोणतेही राजकारण न करता शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची व महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.  उपसभापती गो-हे म्हणाले की कांद्याचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून शेतक-यांना भेडसावत आहे. अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असुन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी यापुढेही राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दौरा करणार आहे. तसेच केदारी कुटुंबीला घरकुल तसेचवअधिकची आर्थिक मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनीत्यांनी यावेळेस दिले. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेFarmerशेतकरी