शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती आवारातील टपऱ्यांवर कारवाईच  : बी.जे.देशमुख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 20:49 IST

मार्केटयार्ड परिसरातील अनधिकृत टप-यांचा विषय गेल्या काही महिन्यांपासून ऐरणीवर आला आहे. त्यामुळे खुद्द पालकमंत्री आणि सहकार मंत्र्यांनी टप-यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

ठळक मुद्देबाजार बंदची भूमिका शेतकरी विरोधीडॉ.बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु असून टपरी धारकांवर कारवाई केल्यास बाजार बंद करु असा इशारा

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा असलेल्या मार्केटयार्डमधील सर्व अनधिकृत टप-या काढून टाकण्याचा निर्णय अखेर बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. या सर्व टपरी धारकांना दिलेल्या नोटिशीची मुदत रविवारी (दि. १९ जून) संपत असून बाजाराला अडथळा निर्माण करणा-या या सर्व टप-या काढून टाकण्यात येणार असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. दरम्यान प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु असून कारवाई केल्यास बाजार बंद करु असा इशारा दिला आहे. बाजार बंदची आढाव यांची भूमिका शेतकरी विरोधी असल्याचे त्यांनी येथे सांगितले. मार्केटयार्ड परिसरातील अनधिकृत टप-यांचा विषय गेल्या काही महिन्यांपासून ऐरणीवर आला आहे. त्यामुळे खुद्द पालकमंत्री आणि सहकार मंत्र्यांनी टप-यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासंदर्भात समितीही गठीत करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष पहाणी केल्यानंतर अनधिकृत टप-यांचा वाहतूक आणि व्यवहारास अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व टप-या काढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही देशमुख यांनी नमुद केले. याबाबत देशमुख यांनी सांगितले की बाजारातील फळे, तरकारी, फुले, कांदा-बटाटा आणि भुसार विभागात सुमारे सुमारे १५० टप-या आहेत.यातील १०९ टप-या १९८० पासून अनेक वेळा टप-या काढून घेण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या आहेत. यातील काही टपरी धारकांकडून बाजार समिती भाडयासाठी शुल्क आकारत आहे. तर नव्याने झालेल्या ४१ टप-यांची कोणतीच नोंद नाही. या सर्व टप-यामुळे बाजाराच्या आवारात वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच अनेक वेळा वाद देखील निर्माण होत आहेत. त्यामुळे सर्व टप-या हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.---------------बाजार आवारातील सर्व टप-या अधिकृत करण्याची मागणी टपरी चालक करत आहेत. प्रशासनाने दिलेल्या नोटीसा व कारवाईच्या विरोधात आंदोलन देखील सुरु केले आहे. तसेच टप-या काढल्यास बाजार बंद पाडण्याची भूमिका घेतली आहे. अनधिकृत टप-यांना संरक्षण देण्यासाठी बाजार बंद करणे म्हणजे शेतक-यांच्या विरोधात भूमिका घेण्यासारखी आहे. त्यामुळे अनधिकृत टप-या वाचविण्यासाठी टपरी चालकांनी शेतक-यांना वेठीस धरू नये, असेही देशमुख यांनी सांगितले.------------------

टॅग्स :PuneपुणेBaba Adhavबाबा आढावMarket Yardमार्केट यार्ड