शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बाजार समिती आवारातील टपऱ्यांवर कारवाईच  : बी.जे.देशमुख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 20:49 IST

मार्केटयार्ड परिसरातील अनधिकृत टप-यांचा विषय गेल्या काही महिन्यांपासून ऐरणीवर आला आहे. त्यामुळे खुद्द पालकमंत्री आणि सहकार मंत्र्यांनी टप-यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

ठळक मुद्देबाजार बंदची भूमिका शेतकरी विरोधीडॉ.बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु असून टपरी धारकांवर कारवाई केल्यास बाजार बंद करु असा इशारा

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा असलेल्या मार्केटयार्डमधील सर्व अनधिकृत टप-या काढून टाकण्याचा निर्णय अखेर बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. या सर्व टपरी धारकांना दिलेल्या नोटिशीची मुदत रविवारी (दि. १९ जून) संपत असून बाजाराला अडथळा निर्माण करणा-या या सर्व टप-या काढून टाकण्यात येणार असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. दरम्यान प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु असून कारवाई केल्यास बाजार बंद करु असा इशारा दिला आहे. बाजार बंदची आढाव यांची भूमिका शेतकरी विरोधी असल्याचे त्यांनी येथे सांगितले. मार्केटयार्ड परिसरातील अनधिकृत टप-यांचा विषय गेल्या काही महिन्यांपासून ऐरणीवर आला आहे. त्यामुळे खुद्द पालकमंत्री आणि सहकार मंत्र्यांनी टप-यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासंदर्भात समितीही गठीत करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष पहाणी केल्यानंतर अनधिकृत टप-यांचा वाहतूक आणि व्यवहारास अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व टप-या काढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही देशमुख यांनी नमुद केले. याबाबत देशमुख यांनी सांगितले की बाजारातील फळे, तरकारी, फुले, कांदा-बटाटा आणि भुसार विभागात सुमारे सुमारे १५० टप-या आहेत.यातील १०९ टप-या १९८० पासून अनेक वेळा टप-या काढून घेण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या आहेत. यातील काही टपरी धारकांकडून बाजार समिती भाडयासाठी शुल्क आकारत आहे. तर नव्याने झालेल्या ४१ टप-यांची कोणतीच नोंद नाही. या सर्व टप-यामुळे बाजाराच्या आवारात वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच अनेक वेळा वाद देखील निर्माण होत आहेत. त्यामुळे सर्व टप-या हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.---------------बाजार आवारातील सर्व टप-या अधिकृत करण्याची मागणी टपरी चालक करत आहेत. प्रशासनाने दिलेल्या नोटीसा व कारवाईच्या विरोधात आंदोलन देखील सुरु केले आहे. तसेच टप-या काढल्यास बाजार बंद पाडण्याची भूमिका घेतली आहे. अनधिकृत टप-यांना संरक्षण देण्यासाठी बाजार बंद करणे म्हणजे शेतक-यांच्या विरोधात भूमिका घेण्यासारखी आहे. त्यामुळे अनधिकृत टप-या वाचविण्यासाठी टपरी चालकांनी शेतक-यांना वेठीस धरू नये, असेही देशमुख यांनी सांगितले.------------------

टॅग्स :PuneपुणेBaba Adhavबाबा आढावMarket Yardमार्केट यार्ड