शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावर वळणांमुळे अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 1:47 AM

रस्त्याच्या मागणी : दुचाकी, चारचाकी व अवजड कंटेनरचे अपघात झाले नित्याचे

शेलपिंपळगाव : चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावर असलेल्या दोन्ही धोकादायक वळणांमुळे दिवसेंदिवस या मार्गावरील अपघातांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी (दि.१२) पहाटे तीनच्या सुमारास वळणावर शिक्रापूरहून - चाकणकडे जाणारा अवजड कंटेनर वाहतुकीदरम्यान पलटी झाला. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. वारंवार होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस उपाय योजना करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

चाकण-शिक्रापूर राज्यमार्ग पुणे जिल्ह्यातील तीन ते चार महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतींना जोडणारा रस्ता आहे. परिणामी, या मार्गावर कायम वर्दळ असते. परराज्यातून औद्योगिक वसाहतींना कच्चा माल पुरविणारे असंख्य अवजड कंटेनर याच मार्गाचा वाहतुकीसाठी वापर करत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील अपघातातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यमार्गावर खेड तालुक्याच्या हद्दीत साबळेवाडीच्या तसेच शेलपिंपळगावच्या पश्चिमेला ‘एस’ आकाराची धोकादायक वळणे आहेत. ही दोन्ही वळणे धोकादायक आहेत. या वळणावर रोज अपघात होत आहेत.

भीमा - भामा नदीलगत असलेल्या शेलपिंपळगावच्या वळणावर गॅसचे टँकर, ट्रक, मालवाहू गाड्या, दुधाचे ट्रक वळण घेत असताना सातत्याने पलटी होत आहेत. शेलपिंपळगावच्या वळणालगत भीमा-भामा नदीचा प्रवाह असल्याने सकाळपासून अनेक वाहतूकदार अंघोळीसाठी वाहने रस्त्यालगत उभी करून वाहतुकीत अडचण निर्माण करतात. यामुळे इतर वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघातसदृश परिस्थीती निर्माण होते. तर, साबळेवाडीचे वळण चाकणकडून शिक्रापूरकडे जाताना चढ वाहतुकीचे आहे. त्यामुळे मुंबई, नाशिककडून औद्योगिक वसाहतींचा कच्चा माल घेऊन येणारी अवजड वाहने येथील वळणावर वाहतुकीदरम्यान अडकली जातात. मात्र, शिक्रापूरकडून चाकणबाजूकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना रस्त्याचा उतार धोकादायक ठरत असल्याने बहुतांशी वाहने जागीच पलटी होत आहेत. रस्त्यावरील दोन्ही ठिकाणच्या वळणांवर वाढते अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस उपाय योजना कार्यान्वित करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ व वाहतूकदारांकडून केली जात आहे.साबळेवाडी येथील वळणावर सातत्याने अवजड वाहने पलटी होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. विशेष म्हणजे, वळणाला कठडे उपलब्ध नसणे ही खेदाची बाब आहे. सूचना फलक व कठडे तातडीने बसविणे गरजेचे आहे.- सुनील बेंडभर, स्थानिक नागरिक.शेलपिंपळगाव वळणालगत असलेली झाडे वाढली आहेत. त्यामुळे शिक्रापूरकडून चाकणकडे जाणाºया वाहनांना समोरच्या वाहनाचा अंदाज येत नसल्याने अपघात घडून येत आहेत. वळणाच्या दुतर्फा उभ्या केलेल्या वाहनांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली तर त्याठिकाणचे अवैध पार्किंग बंद होईल. - विद्या मोहिते, सरपंच शेलपिंपळगाव.४महामार्गावरील दोन्ही धोकादायक वळणांवर सातत्याने मोठ-मोठे अपघात होत आहेत. परिणामी जीवितहानीचा आकडा वाढत चालला आहे. शेलपिंपळगावच्या वळणावर गेल्या वर्षभरात दहा ते बारा, तर साबळेवाडीच्या वळणावर पंधरा ते वीस वाहने वाहतुकीदरम्यान पलटीझाली आहेत.४वळणावर दुचाकींच्या अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. वळणावरील सूचना फलक जमीनदोस्त झाले असून जे सूचना फलक उभे आहेत ते अनेक व्यावसायिकांच्या स्वत:च्या जाहिरातीला बळी पडत आहेत. तर, साबळेवाडीच्या वळणाचे संपूर्ण कठडे तुटलेले आहे. परिणामी अपघातग्रस्त वाहने थेट खोल दरीत कोसळलीजात आहेत. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड