शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

पर्यटन स्थळांवर जीवघेणे अपघात; आता फिरायला जायचं कुठं? 'या' ठिकाणांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

By श्रीकिशन काळे | Updated: July 4, 2024 14:34 IST

पर्यटन स्थळांवर बंदी हा अपघात रोखण्यासाठीचा उपाय होऊ शकत नाही, जबाबदारी झटकून टाकण्याची ही पळवाट, निसर्गप्रेमींचे मत

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पर्यटन स्थळांवर अपघात होऊन अनेकांचा जीव गेला आहे. त्या दृष्टीने वन विभागाच्या वतीने किल्ले सिंहगड, ताम्हिणी घाट, भीमाशंकर अभयारण्य आदी ठिकाणांवर पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यामुळे पावसाळा असूनही पर्यटकांना फिरण्याचा आनंद लुटता येणार नाही. पण गर्दीवरील नियंत्रण ठेवून पर्यटन सुरू ठेवायला हवे, अशी मागणी देखील होत आहे.

सध्या पाऊस चांगलाच सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक जण पर्यटनासाठी घराबाहेर पडत आहेत. परंतु, योग्य काळजी न घेता व्हिडिओ काढण्याच्या नादात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. परिणामी प्रशासनाला सर्व ठिकाणांवर बंदी घालावी लागली आहे. गेल्या महिनाभरात कळसुबाई शिखरावर दोन वेळा पर्यटकांची प्रचंड गर्दी पहायला मिळाली. मागील रविवारी तर एका पर्यटकाचा ह्रदयविकाराने मृत्यू देखील झाला आहे. तोरणा किल्ल्यावरही एका पर्यटकाचा जीव गेला. तसेच ताम्हिणी अभयारण्यातील दोन धबधब्यांमध्ये तीन पर्यटक वाहून गेले. भुशी धरणाच्या धबधब्यावर पाच जण वाहून गेल्याचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला. या घटनांवरून पर्यटन स्थळांवरील गर्दी नियंत्रिण करणे आवश्यक बनले आहे. तसेच पर्यटकांनी देखील पर्यटन करताना योग्य भान ठेवणे गरजेचे आहे.

विधानसभेतही प्रश्न !

पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी सुरक्षा आणि सुव्यवस्था दिसून येत नाही. त्या ठिकाणच्या व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारने ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे, अशी मागणी आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी विधानसभेत केली आहे.

सरसकट बंदी नको !

दरवर्षी हरिश्चंद्र गडावर, किल्ले सिंहगड, राजगड, सांदण व्हॅली, हरिहर गड, तोरणा येथे गर्दी होते. त्या ठिकाणचे अपघात टाळायचे असतील तर गर्दीवर नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यातल्या मुळशी, लोणावळा, ताम्हिणी भागातले धबधबे पाहण्यासाठी गर्दी होते. पण तिथे वन विभागाने बंदी घातली आहे. त्यामुळे या सरसकट बंदीवर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. ज्यांचा पर्यटनावर व्यवसाय आहे, त्यांची याविषयी मागणी आहे.

पर्यटन स्थळांवर गर्दी होत आहे. अनेक अपघात झाले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच पर्यटन स्थळांवर निर्बंध आणले आहेत. किल्ले सिंहगडावर १४४ कलम लागू असून, जमावाने जाण्यावर बंदी आहे. - प्रदीप संकपाळ, वनपरीक्षेत्र अधिकारी

वन विभागाच्या अंतर्गत अनेक किल्ले व पर्यटन स्थळे आहेत. पर्यटन येताना स्वत:च्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य द्यावे. वन्यजीव क्षेत्रात रात्री जाऊ नये, प्राण्यांना त्रास देऊ नये. धोकादायक ठिकाणी जाऊ नये. अन्यथा आम्ही कठोर कारवाई करू. - महादेव मोहिते, उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग

पर्यटन स्थळांवर बंदी हा अपघात रोखण्यासाठीचा उपाय होऊ शकत नाही. जबाबदारी झटकून टाकण्याची ही पळवाट आहे. जंगलातले कायदे मोडून वाघ दाखवणाऱ्यांना, शिक्षा न करता, सफारीच बंद करण्यासारखे आहे. होमगार्डसची मदत घेऊन, प्रवेशाच्या वेळी सक्त ताकीद देऊन, मोठ्या दंडाची/शिक्षेची भिती घालावी, पर्यटकांना सुरवातीलाच शिस्त लावावी. जे खरेच निसर्गप्रेमी आहेत, त्यांना या बंदीमुळे वंचित राहावे लागणार नाही. - सीमा देवधर, निसर्गप्रेमी

घरातून बाहेर पडताना ज्या स्थळी जायचे आहे, त्या स्थळापासून आपल्याला काय हवे आहे ह्याचा विचार करावा. सिंहगडला हजारो लोकं जातात, ते तिथे केवळ भाकरी पिठलं, भजी खायला अन् पाऊस, वारा अनुभवायला जातात. तसेच सेल्फी, रील्स काढतात. तिथला इतिहास किती जण जाणून घेतात. काजवा महोत्सवात काजवे मारायचे, कास पठारावर फुले मारायची, किल्ल्यांवर दारू पार्ट्या करायच्या, रिल काढायला वाटेल तिथे, वाटेल तसे जायचे, आणि मग पोलीस, वनविभाग ह्यांना कामाला लावायचे. हे कसले पर्यटन ? खरंतर जबाबदारीने पर्यटन करण्यासाठी एक व्यवस्था तयार व्हावी. पर्यटकांनी योग्य भान ठेवून फिरावे. - केदार पाटणकर, संस्थापक, ट्रास टॉक ग्रुप (किल्ले स्वच्छता मोहिम) 

टॅग्स :Puneपुणेtourismपर्यटनsinhagad fortसिंहगड किल्लाcollectorजिल्हाधिकारीenvironmentपर्यावरणFortगडNatureनिसर्गRainपाऊस