शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
3
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
4
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
5
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
6
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
7
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
8
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
9
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
10
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
11
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
12
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
13
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
14
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
15
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
16
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
17
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
18
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!
19
Beauty Tips: नैसर्गिकरित्या भुवया दाट करणं आता सहज शक्य; फॉलो करा 'या' तीन टिप्स!
20
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती

‘शिवशाही’ला दररोज होतोय अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 10:40 AM

‘शिवशाही’वर प्रश्नचिन्ह

ठळक मुद्देअपघातांचे सत्र थांबेना

पुणे : प्रवाशांना अधिक आरामदायी सेवा मिळावी यासाठी एसटी महामंडळाने अडीच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या शिवशाही बस अपघातांची मालिका थांबता थांबत नाही. सोमवारी (दि. २५) कात्रज घाटाजवळ झालेल्या अपघातानंतर मागील सव्वा दोन वर्षांतील राज्यातील अपघातांचा आकडा ५५० वर गेला आहे. याचा अर्थ बसचे दररोज एक ते दोन अपघात होत असल्याने ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेशी तर तडजोड केली जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. खासगी लक्झरी बससेवेला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाने दि. १ जून २०१७ रोजी वातानुकूलित बससेवा सुरू केली. तिकीटदरही माफक असल्याने या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसटीच्या ताफ्यात सध्या स्वत:च्या मालकीसह भाडेतत्त्वावरील १ हजार बसचा समावेश आहे. पण ही सेवा सुरू झाल्यापासून अपघातांचे सत्र कमी होताना दिसत नाही. सोमवारी (दि. २५) कात्रज घाटाजवळ शिंदेवाडी येथे शिवशाही बस दरीत कोसळून दोन प्रवाशांच्या मृत्यू झाला, तर २५ प्रवासी जखमी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिक-औरंगाबाद मार्गावर झालेल्या अपघातात काही प्रवासी जखमी झाले होते. हे अपघातांचे सत्र सुरूच राहिल्याने शिवशाहीच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.उपलब्ध आकडेवारीनुसार १ जून २०१७ ते २५ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत शिवशाहीचे राज्यभरात ५५० लहान-मोठे अपघात झाले आहेत. यामध्ये प्राणांतिक अपघातांची संख्या ५१ वर पोहचली असून, ३७१ गंभीर तर ११५ किरकोळ स्वरूपाचे अपघात आहेत. एप्रिल २०१८ ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान एकूण ४४२ अपघात झाले असून ४४ प्राणांतिक व ३०० गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत. अपघातांच्या एकूण संख्येचा विचार केल्यास ही सेवा सुरू झाल्यापासून दररोज सरासरी एक ते दोन अपघात झाले आहेत. शिवशाहीच्या अपघातांचा मुद्दा विधानसभेतही गाजला होता. त्यानंतर एसटी महामंडळाकडून विविध उपाययोजना केल्या. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा एसटी महामंडळाकडून केला होता. पण हा दावा फोल ठरला आहे...........मागील काही दिवसांतील अपघात४२५ नोव्हेंबर-शिंदेवाडी-२ मृत्यू, २५ जखमी४१७ नोव्हेंबर-नाशिक-औरंगाबाद महामार्ग-काही प्रवासी जखमी४७ नोव्हेंबर-पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवणजवळ -  ५ ते ७ प्रवासी गंभीर जखमी४३१ ऑक्टोबर-नाशिक-पुणे महामार्गावर-महिलेचा मृत्यू४३० ऑगस्ट-पुणे-सोलापूर महामार्गावर शेटफळजवळ-१ मृत्यू, १४ जखमी........अपघात टाळण्यासाठी सातत्याने प्रयत्न एसटीतील वरिष्ठ अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार, शिवशाही ताफ्यात येण्यापूर्वीचे बसचे अपघात व शिवशाहीचे अपघात यामध्ये मोठी तफावत आहे. शिवशाहीच्या अपघातांमुळे तिच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित राहिले आहेत. पण या बस आरामदायी असल्याने प्रवाशांची पसंती मिळत आहे. अपघात टाळण्यासाठी महामंडळाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

टॅग्स :PuneपुणेShivshahiशिवशाहीAccidentअपघात