शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

काळानुरुप बदल स्वीकारुन युध्दपध्दतीसाठी स्वत:ला सज्ज ठेवावे : लेफ्टनंट जनरल अशोक आम्ब्रे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 16:37 IST

काळानुरूप होणारे बदल स्वीकारून, आपणही स्वत:ला विकसित केले पाहिजे, असा सल्ला लेफ्टनंट जनरल अशोक आम्ब्रे यांनी दिला. 

ठळक मुद्देजंगी पलटणला २५० वर्षे पूर्ण 

पुणे : तंत्रज्ञानाच्या युगात बदलत्या युद्धपद्धतीमुळे पूर्वसूचनेचा अवधी कमी झाला आहे. त्यामुळे युद्धाच्या तयारीसाठी फारसा अवधी सैन्याकडे उपलब्ध नसतो. अशा प्रकारच्या युद्धपद्धतीला सामोरे जाण्यासाठी आपणदेखील स्वत:ला सज्ज ठेवले पाहिजे. काळानुरूप होणारे बदल स्वीकारून, आपणही स्वत:ला विकसित केले पाहिजे, असा सल्ला लेफ्टनंट जनरल अशोक आम्ब्रे यांनी दिला. लष्कराच्या मराठा लाइट इन्फन्ट्री रेजिमेंट म्हणजेच जंगी पलटनच्या स्थापनेला यंदा २५० वर्षे पूर्ण होताहेत. यानिमित्त लष्करातर्फे आयोजित कार्यक्रमात या सैन्य तुकडीचे माजी सैनिक आणि वीरनारी यांना सन्मानित करण्यात आले. या रेजिमेंटचे सर्वोच्च पदावर कार्यरत असणारे लेफ्टनंट जनरल आम्ब्रे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आम्ब्रे म्हणाले, देशाच्या लष्करी इतिहासात जंगी पलटनची कामगिरी महत्त्वपूर्ण आहे. पहिले महायुद्ध, सियाचीन येथील लढाई अशा महत्त्वपूर्ण लढायांमध्ये पलटनने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या तुकडीच्या पूर्वजांनी आपल्या शौर्य, साहस व कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक मोहिमा यशस्वी करत, पलटनचा स्तर उंचावला आहे. त्यामुळेच या पलटनमध्ये सैनिक म्हणून निवड होणे ही अतिशय अभिमानाची आणि तितकीच जबाबदारीची बाब आहे.आम्ब्रे यांनी पूर्वजांच्या इतिहासाचे स्मरण ठेवत तो कायम ठेवण्याची जबाबदारी आताच्या जवानांवर आहे. हा इतिहात सदैव स्मरणात ठेवून त्याला आणखी दैदीप्यमान कराल, अशी अपेक्षा व्यक्त केली.  मुलामुळे युनिटचा सन्मान वाढला...माझ्या निवृत्तीनंतर माझा मुलगा माझ्याच जागी फर्स्ट मराठांच्या जंगी पलटणमध्ये सहभागी झाला. त्याच्या लष्करातील सेवेला दोन वर्षे पूर्ण झाले होते. भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी श्रीलंका येथे एलटीटीईच्या विरोधात लढण्यासाठी शांतीसेना पाठवण्याचा निर्णय घेतला. यात माझा मुलगा बाजीराव तरटे याचीही निवड झाली. माज्याच युनिटमध्ये असल्याने माझे वरिष्ठ भेटल्यास माझा नमस्कार सांग असे त्याला सांगितले. मात्र, शांतीसेनेत असताना त्याला वीरमरण आले. त्याने केलेल्या कामगिरीबद्दल त्याला गौरवण्यात आले. माज्या मुलामुळे माज्या युनिटचा सन्मान वाढला याचा मला गौरव आहे, असे गौरवोद्गार निवृत्त सैनिक दत्तात्रेय तरते यांनी काढले. ........................वीरमाता, वीरनारी, वीर पित्यांचा सत्कारफर्स्ट मराठा लाईट इन्फ न्ट्रीला २५० वर्षे पूर्ण झाली. या दैदीप्यमान काळात या बटालियनने अनेक युद्धात सहभाग घेत नेत्रदीपक कामगिरी केली. १९४७, १९६२ तसेच १९७१, आॅपरेशन पवन या सारख्या युध्दांमधे देशासाठी वीरगती प्राप्त कुटुंबियांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्तीत वीरमाता, वीरनारी आणि वीर पित्यांना आपल्या स्वकीयांच्या आठवणीने आणि त्यांच्या पराक्रमाने उर भरून आला...................11 डिसेंबर 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धात आमच्या जमालपूर आणि कामालपूर ताब्यात घेण्यासाठी  चढाई केली. यावेळी आमचा सामना तेथे तैनात असलेल्या 31 बलुच या पाकिस्तानी तुकडीशी झाला. आम्ही जांबलपूरला चारही बाजूने घेरले. यावेळी 31 बलुच रेजिमेंटचे कामांडन्ट कर्नल सुलतान अहमद यांना शरण येणासाठी पत्र पाठविले. मात्र अहमद यांनी त्या पाकिटात बंदुकीची होळी पाठवून उद्धभूमीत भेटु असे सूतोवाच केले. यावेळी आम्ही हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराजच जय घोष करत शत्रूच्या रेजिमेंट वर तुटून पडलो.

.................... जंगी पलटणने अतुलनीय शौर्य दाखवत जमालपूर ताब्यात घेतले,ह्णअशी आठवण या युद्धात सहभागी झालेले लातूरच्या मंगलगिरी यांनी  सांगितली. आता मला निवृत्त होऊन ३१ वर्ष झाली, पण ह्यजंगी पलटणने माझी आठवण ठेवली आणि मला इथे बोलावले याचे समाधान आहे, असेही मंगलगिरी यांनी सांगितले.

    

टॅग्स :Puneपुणे