शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

काळानुरुप बदल स्वीकारुन युध्दपध्दतीसाठी स्वत:ला सज्ज ठेवावे : लेफ्टनंट जनरल अशोक आम्ब्रे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 16:37 IST

काळानुरूप होणारे बदल स्वीकारून, आपणही स्वत:ला विकसित केले पाहिजे, असा सल्ला लेफ्टनंट जनरल अशोक आम्ब्रे यांनी दिला. 

ठळक मुद्देजंगी पलटणला २५० वर्षे पूर्ण 

पुणे : तंत्रज्ञानाच्या युगात बदलत्या युद्धपद्धतीमुळे पूर्वसूचनेचा अवधी कमी झाला आहे. त्यामुळे युद्धाच्या तयारीसाठी फारसा अवधी सैन्याकडे उपलब्ध नसतो. अशा प्रकारच्या युद्धपद्धतीला सामोरे जाण्यासाठी आपणदेखील स्वत:ला सज्ज ठेवले पाहिजे. काळानुरूप होणारे बदल स्वीकारून, आपणही स्वत:ला विकसित केले पाहिजे, असा सल्ला लेफ्टनंट जनरल अशोक आम्ब्रे यांनी दिला. लष्कराच्या मराठा लाइट इन्फन्ट्री रेजिमेंट म्हणजेच जंगी पलटनच्या स्थापनेला यंदा २५० वर्षे पूर्ण होताहेत. यानिमित्त लष्करातर्फे आयोजित कार्यक्रमात या सैन्य तुकडीचे माजी सैनिक आणि वीरनारी यांना सन्मानित करण्यात आले. या रेजिमेंटचे सर्वोच्च पदावर कार्यरत असणारे लेफ्टनंट जनरल आम्ब्रे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आम्ब्रे म्हणाले, देशाच्या लष्करी इतिहासात जंगी पलटनची कामगिरी महत्त्वपूर्ण आहे. पहिले महायुद्ध, सियाचीन येथील लढाई अशा महत्त्वपूर्ण लढायांमध्ये पलटनने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या तुकडीच्या पूर्वजांनी आपल्या शौर्य, साहस व कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक मोहिमा यशस्वी करत, पलटनचा स्तर उंचावला आहे. त्यामुळेच या पलटनमध्ये सैनिक म्हणून निवड होणे ही अतिशय अभिमानाची आणि तितकीच जबाबदारीची बाब आहे.आम्ब्रे यांनी पूर्वजांच्या इतिहासाचे स्मरण ठेवत तो कायम ठेवण्याची जबाबदारी आताच्या जवानांवर आहे. हा इतिहात सदैव स्मरणात ठेवून त्याला आणखी दैदीप्यमान कराल, अशी अपेक्षा व्यक्त केली.  मुलामुळे युनिटचा सन्मान वाढला...माझ्या निवृत्तीनंतर माझा मुलगा माझ्याच जागी फर्स्ट मराठांच्या जंगी पलटणमध्ये सहभागी झाला. त्याच्या लष्करातील सेवेला दोन वर्षे पूर्ण झाले होते. भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी श्रीलंका येथे एलटीटीईच्या विरोधात लढण्यासाठी शांतीसेना पाठवण्याचा निर्णय घेतला. यात माझा मुलगा बाजीराव तरटे याचीही निवड झाली. माज्याच युनिटमध्ये असल्याने माझे वरिष्ठ भेटल्यास माझा नमस्कार सांग असे त्याला सांगितले. मात्र, शांतीसेनेत असताना त्याला वीरमरण आले. त्याने केलेल्या कामगिरीबद्दल त्याला गौरवण्यात आले. माज्या मुलामुळे माज्या युनिटचा सन्मान वाढला याचा मला गौरव आहे, असे गौरवोद्गार निवृत्त सैनिक दत्तात्रेय तरते यांनी काढले. ........................वीरमाता, वीरनारी, वीर पित्यांचा सत्कारफर्स्ट मराठा लाईट इन्फ न्ट्रीला २५० वर्षे पूर्ण झाली. या दैदीप्यमान काळात या बटालियनने अनेक युद्धात सहभाग घेत नेत्रदीपक कामगिरी केली. १९४७, १९६२ तसेच १९७१, आॅपरेशन पवन या सारख्या युध्दांमधे देशासाठी वीरगती प्राप्त कुटुंबियांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्तीत वीरमाता, वीरनारी आणि वीर पित्यांना आपल्या स्वकीयांच्या आठवणीने आणि त्यांच्या पराक्रमाने उर भरून आला...................11 डिसेंबर 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धात आमच्या जमालपूर आणि कामालपूर ताब्यात घेण्यासाठी  चढाई केली. यावेळी आमचा सामना तेथे तैनात असलेल्या 31 बलुच या पाकिस्तानी तुकडीशी झाला. आम्ही जांबलपूरला चारही बाजूने घेरले. यावेळी 31 बलुच रेजिमेंटचे कामांडन्ट कर्नल सुलतान अहमद यांना शरण येणासाठी पत्र पाठविले. मात्र अहमद यांनी त्या पाकिटात बंदुकीची होळी पाठवून उद्धभूमीत भेटु असे सूतोवाच केले. यावेळी आम्ही हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराजच जय घोष करत शत्रूच्या रेजिमेंट वर तुटून पडलो.

.................... जंगी पलटणने अतुलनीय शौर्य दाखवत जमालपूर ताब्यात घेतले,ह्णअशी आठवण या युद्धात सहभागी झालेले लातूरच्या मंगलगिरी यांनी  सांगितली. आता मला निवृत्त होऊन ३१ वर्ष झाली, पण ह्यजंगी पलटणने माझी आठवण ठेवली आणि मला इथे बोलावले याचे समाधान आहे, असेही मंगलगिरी यांनी सांगितले.

    

टॅग्स :Puneपुणे