शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

शहरांमध्ये वाहनचालक सुसाट! जवळपास ६० टक्के वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 11:07 IST

पुणे शहरातील परिसर संस्थेचे पुणे नाशिक औरंगााद आणि नागपूर मध्ये सर्वेक्षण ३४ रस्त्याचा समावेश पोलिस महासंचालकांना पत्र

जवळपास ६०% वाहनचालक ही रस्त्यावरची वेग मर्यादा पाळत नाहीत ही बाब आता एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. पुण्यातल्या परिसर या संस्थेने ४ मोठ्या शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झालं आहे. वेग मर्यादेच्या नियम पाळला जावा यासाठी सरकार ने ठोस पावले उचलावीत अशी मागणी आता परिसर चा प्रतिनिधींनी पोलिस महासंचालकांना केली आहे.

 

 युनायटेड नेशन च्या वतीने १७ ते २३ मे दरम्यान जागतिक रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला गेला. याच पार्श्वभूमीवर परिसरने रोड सेफ्टी नेटवर्क चा मदतीने राज्यातल्या ४ शहरांमध्ये सर्वेक्षण केलं. पुणे नाशिक औरंगाबाद आणि नागपूर मधल्या ३४ प्रमुख रस्त्यांवर हे सर्वेक्षण करण्यात आलं.या सर्वेक्षणानुसार २६ रस्त्यांवर जवळपास ६०% वाहनं ही वेगमर्यादा पाळत नव्हती. यापैकी ५ रस्त्यांवर जवळपास ९०% पेक्षा जास्त वाहनं वेगमर्यादा ओलांडत होती.

शहरांना लागू असलेल्या नियमानुसार महापालिका हद्दीतील रस्त्यांवर कार साठी ताशी ७० किमी तर दुचाकी साठी ताशी ६० किमीची वेगमर्यादा आहे.त्यातच ज्या भागांमध्ये शाळा,दवाखाने किंवा बांधकाम सुरू असेल तिथे ताशी २५ किमी चा वेगाने वाहन चालवता येते. औरंगाबाद मध्ये ही मर्यादा ताशी ४० किमी ची आहे. मात्र या सर्व शहरांमधल्या प्रमुख रस्त्यांवर ही वेगमर्यादा पाळली जात नसल्याचं या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

याविषयी बोलताना परिसर संस्थेचे रणजित गाडगीळ म्हणाले," आमचा सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे की वाहनचालक कोणत्याही कारवाईचा भीती शिवाय वाहने चालवतात. नियमानुसार वेगमर्यादा ओलांडली तर १००० रुपयांचा दंड होत असतो. इतकंच नाही तर त्या वाहनचालकांचे लायसन्स ३ महिन्यांसाठी रद्द करण्याची देखील तरतूद आहे. मात्र नियमांची अंमलबजावणी आणि कारवाई होत नसल्याने सर्रास उल्लंघन होत आहे असे दिसत आहे." 

परिसरचा वतीने आता या बाबत कठोर पावले उचलावीत अशी मागणी करणारे पत्र पोलिस महासंचालकांना लिहिण्यात आले आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसroad safetyरस्ते सुरक्षा