शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Pune: नाना पेठेतील टोळी युद्धात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

By नितीश गोवंडे | Updated: October 5, 2023 17:04 IST

याप्रकरणी समर्थ पोलिसांनी गुंड बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या ६ साथीदारांना अटक केली असून, ३ अल्पवयीन साथीदारांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे...

पुणे : वर्चस्वाच्या वादातून भरदिवसा नाना पेठेत दोन जणांवर आंदेकर टोळीच्या टोळक्याने हातोडा आणि कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना सोमवारी (२ ऑक्टोबर) दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या निखिल आखाडे (२९, रा. धनकवडी) याच्यावर २५ ते २६ वार झाले होते. उपचारादरम्यान निखिलचा मृत्यू झाला असून, त्याचा मित्र अनिकेत दुधभाते (२७) याच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी समर्थ पोलिसांनी गुंड बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या ६ साथीदारांना अटक केली असून, ३ अल्पवयीन साथीदारांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंड सोमनाथ गायकवाड सध्या येरवडा करागृहात आहे. त्याच्या टोळीतील सदस्यांचा आंदेकर टोळीसोबत वर्चस्वाचा जूना वाद आहे. सोमवारी संध्याकाळी निखिल आणि अनिकेत दोघे गणेश पेठेतील शितळादेवी मंदिर चौकातून अशोक चौकाकडे जात असताना, आंदेकर टोळीतील सदस्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर भररस्त्यात हल्ला केला.

या हल्ल्यात निखिल आणि अनिकेत गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर आरोपींनी शस्त्रे फिरवत बंडु आंदेकर पुण्याचा भाई आहे, असे म्हणत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान निखीलचा गुरूवारी पहाटे मृत्यु झाला. न्यायालयाने आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, पुढील तपास समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी