शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शांततेतील युद्ध सरकारला पेलवणारं, झेपणारं नाही: मनोज जरांगे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 16:44 IST

दरम्यान, २१ तारखेपर्यंत आरक्षण न मिळाल्यास २२ तारखेपासून आंदोलनाची दिशा जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.....

नारायणगाव (पुणे) : मराठ्यांच्या पोरांच्या अस्तित्व व शिक्षणासाठी आरक्षण लागतंय, ज्याला काढायचं काढा आणि ज्याला काढायचं नाही त्यांनी काढू नका. तुला काय राह्यचं राहा, गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं शिक्षणात, नोकरीत कल्याण होत असेल तर आडवं कोणी पडायचे नाही. कोणी आमच्या अन्नात माती कालवायचा प्रयत्न करू नका, असा टोला मराठा कुणबी आरक्षणास विरोध दर्शविणाऱ्या नारायण राणेंसह विरोधकांना लगावत शांततेतील युद्ध सरकारला पेलवणारं नाही आणि झेपणारं नाही, असे सांगत आरक्षण घेतल्याशिवाय हटणार पण नाही, असा इशारा मनोज जरांगे - पाटील यांनी नारायणगाव येथे दिला आहे. दरम्यान, २१ तारखेपर्यंत आरक्षण न मिळाल्यास २२ तारखेपासून आंदोलनाची दिशा जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

किल्ले शिवनेरी येथे नतमस्तक होऊन खेड येथील सभेकडे रवाना होताना मराठा समाज बांधवांच्या वतीने मनोज जरांगे - पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आ. शरद सोनवणे, संतोषनाना खैरे, माजी सरपंच योगेश पाटे, संतोष वाजगे, अक्षय वाव्हळ, अजित वाजगे, बंटी वाजगे, राकेश खैरेंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मराठा समाजातील व्यक्तीने आत्महत्या केल्याने सत्कार न घेता मनोज जरांगे - पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मनोज जरांगे - पाटील म्हणाले की, कुणबी हा जुना शब्द आहे. आता शेती हा शब्द आहे. पूर्वी हॉटेल म्हणत होते. आता रेस्टॉरंट म्हणतात. त्यावेळी पायतान म्हणायचे आता चप्पल म्हणतात, त्याचप्रमाणे कुणबी हा शब्द शेती आहे,

आता कुणी आत्महत्या करायची नाही आणि करूही द्यायची नाही. आंदोलन उग्र करू नका. शांततेच्या मार्गानेच निर्णयाच्या प्रक्रियेत आरक्षण आणणारच, असे म्हणत आपल्याला परिवारातील भावाने आत्महत्या केली. दुःखाचा डोंगर कोसळला, हे बलिदान वाया जाऊ देणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय सुटी नाही. कुणबी म्हणजे भयानक शब्द नाही. आजोबा, पणजोबा पूर्वी म्हणत माझा मुलगा कुणबी करतो. आता सुधारित शब्द शेती आहे. शांततेच्या मार्गानेच निर्णयाच्या प्रक्रियेद्वारे आरक्षण आणणार. येत्या २२ तारखेला आंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल, अशी माहिती जरांगे - पाटील यांनी दिली.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाnarayangaonनारायणगाव