शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी परिसरात लावली पाच फुटांची डबल जाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 16:12 IST

खेड तालुक्याततील रेटवडी, जऊळके भागात एका बिबट्याने तीन जणांवर हल्ला केला होता

श्रीकिशन काळे 

पुणे : खेड तालुक्याततील रेटवडी, जऊळके भागात एका बिबट्याने तीन जणांवर हल्ला केला होता. त्यामुळे त्याचा शोध वन विभाग घेत होता. त्यासाठी अगोदर बिबट्याचा शोध ड्रोनद्वारे घेण्यात आला. त्याचा सुगावा लागल्यानंतर संबंधित जागेच्या भोवती जाळी लावून तो परिसर बंद केला. या जाळीच्या आत पिंजरे लावले होते, त्यामध्ये तो बिबट्या अलगदपणे जेरबंद झाला. एखाद्या बिबट्याला सर्वांची सुरक्षा लक्षात घेऊन सुरक्षितपणे कसे पकडावे, याचा हा उत्तम नमुनाच पहायला मिळाला आहे.  

ही कामगिरी उपवनसंरक्षक अधिकारी, जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली खेड, चाकण, घोडेगाव येथील वन कर्मचारी, अधिकाऱ्यांनी पार पाडली. तसेच माणिकडोह येथील एसओएस संस्थेची टीम देखील मदतीला होती. गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याने तिघांवर हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भिती पसरली होती. त्यामुळे वन विभागाने १२ मे रोजी बिबट्याचा शोध सुरू केला. त्यासाठी ड्रोनचाही वापर केला. तेव्हा जऊळके गावाच्या एका शेतात तो हत्ती गवतात असल्याचे दिसले. त्यानंतर त्याला कसे पकडायचे ? याचा प्लान तयार करण्यात आला. कारण आजुबाजूला खूप ग्रामस्थ जमा झालेले होते. त्यांची सुरक्षा व वन कर्मचाऱ्यांची सुरक्षा पाहणे गरजेचे होते. हत्ती गवतात तो लपल्यामुळे त्याला शोधणं अवघड जात होते. पण त्याचे नेमके ठिकाण ड्रोनमुळे समजले होते. त्यानंतर तो संपूर्ण परिसरात पाच फुटांची जाळी लावली. ही जाळी डबल करून  लावली आणि जाळी खालून तो पळून जाऊ नये म्हणून तिथे बांबूने बांधले. तसेच आतमध्ये तीन पिंजरे ठेवले. ते पिंजरे जाळीच्या बाजुलाच होते. त्या पिंजऱ्यावर येऊन तिथून जाळीवर उडी मारू नये, याची देखील काळजी घेतली गेली. त्यासाठी पिंजऱ्यावर बाभळीच्या काटेरी फांद्या टाकल्या होत्या. जेणेकरून पिंजऱ्यावर तो जाऊ नये.

भूक लागली अन् तो आला...

बिबट्याने तिसरा हल्ला एका महिलेवर केला होता. त्यानंतर एका शेळीलाही मारले होते. ती शेळी त्या पिंजऱ्यात ठेवण्यात आली. कारण त्याला भूक लागली की, तो त्या शेळीच्या वासाने पिंजऱ्यात अलगद सापडू शकतो. त्या प्रमाणे तो त्या पिंजऱ्यामध्ये गेला आणि सर्वांनी निश्वास सोडला असल्याचे प्रदीप रौधळ (वनपरीक्षेत्र अधिकारी, खेड) म्हणाले आहेत.  

बिबट्या ज्या ठिकाणी होता, त्याला बेशुध्द करणं अवघड होतं. डार्ट मारला तरी लगेच त्याचा परिणाम होत नाही. काही मिनिटे जावे लागतात. म्हणून सुरक्षितपणे जाळी लावून बिबट्याला पकडण्याला पर्याय दिला.  त्यानूसार त्या बिबट्याला जेरबंद करण्यात आले असे डॉ. निखिल बनगर (वन्यजीव पशूवैद्यकीय अधिकारी, माणिकडोह) यांनी सांगितले. 

जऊळके गावात एकावर हल्ला केल्यानंतर बिबट्या पसार झाला होता. त्याचा शोध वन विभाग घेत होता. त्यासाठी त्याचे पायाचे ठसे पाहिले गेले आणि ड्रोनचा वापर केला गेला.  बिबट्या ज्या ठिकाणी लपला होता, तिथे हत्ती गवत होते. आजुबाजूला वन कर्मचारी, लोकं होती. त्यांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने त्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी जाळीचा पर्याय निवडला.  - संदेश पाटील, सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी

टॅग्स :Khedखेडleopardबिबट्याforest departmentवनविभागPoliceपोलिस