शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

व्यक्तीचे आई-वडिल, मित्र, नातेवाईक अशा सर्वांचे नातेसंबंध असणारी बायोग्राफी उत्तम ठरते - डॉ. रामचंद्र गुहा

By श्रीकिशन काळे | Updated: May 26, 2023 16:21 IST

'लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर यांना ‘मसाप’चा ग्रंथकार पुरस्कार

पुणे : बायोग्राफी चांगली तयार करायची असेल, तर त्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. केवळ एका व्यक्तीमुळे चांगली बायोग्राफी तयार करता येत नाही, तर त्याच्या आयुष्यातील आजुबाजूच्या व्यक्तीरेखांमुळे ती माहितीपूर्ण बनते. त्यासाठी बायोग्राफीत त्या व्यक्तीचे आई-वडिल, मित्र, नातेवाईक अशा सर्वांचे नातेसंबंध यायला हवेत. तरच बायोग्राफी चांगली कलाकृती ठरते, असा मोलाचा सल्ला ज्येष्ठ इतिहासकार, विचारवंत डॉ. रामचंद्र गुहा यांनी दिला. 

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे च्या ११८ व्या वर्धापनदिनानिमित्त वार्षिक ग्रंथ व ग्रंथकार पारितोषिक प्रदान सोहळा शुक्रवारी एस. एम. जोशी सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंच डॉ.रावसाहबे कसबे, ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मसापच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. डी. पी. पाटील, कार्यवाह उध्दव कानडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे भोसले व्यासपीठावर उपस्थित होते. सभागृहात ज्येष्ठ लेखक डॉ. राजा दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ, खासदार श्रीनिवास पाटील, ‘रंगतसंगत’चे संस्थापक प्रमोद आडकर, दीपक करंदीकर आदी उपस्थित होते.

विशेष ग्रंथकार पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम, ‘पुढारी’चे निवासी संपादक सुनील माळी, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, पत्रकार श्रीकांत बोजेवार, लेखिका-पत्रकार स्वाती राजे, सूत्रसंचालक अरूण नूलकर, लेखक-वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. शिरीष भावे, चित्रकार राजू बाविस्कर, संगीतकार प्रा. चैतन्य कुंटे, माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड, डॉ. एस. एन. पठाण, डॉ. मंदा खांडगे, डॉ. वर्षा तोडमल आदींचा समावेश आहे.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले,‘‘मसापतर्फे विविध उपक्रम घेतले जातात. त्यामध्ये मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आम्ही १ लाख पत्रे सरकारला पाठविली. संमेलनाध्यक्ष पदासाठी निवडणूकीत वाद होतात म्हणून आम्ही घटनेत बदल करून अध्यक्षपद सन्मानाने देण्याची परंपरा सुरू केली. मराठी भाषा सक्तीची व्हावी म्हणून पाठपुरावा केला.’’

''दक्षिणेतील काही व्यक्तींनी महात्मा गांधीविषयीचे चरित्रलेखन केले आहे. त्याचे शंभर खंड तयार झाले. गांधींनी केलेले पत्रव्यवहार, त्यांच्याविषयी वृत्तपत्रात आलेले लेखन व इतर सर्व साहित्य एकत्र करून हे शंभर खंड बनले. याचाच अर्थ तुमच्या आजुबाजूच्या लोकांमुळे तुमचे चरित्र चांगल्याप्रकारे लिहिता येते. - डॉ. रामचंद्र गुहा, ज्येष्ठ इतिहासकार-विचारवंत'' 

टॅग्स :PuneपुणेLokmatलोकमतhistoryइतिहासSocialसामाजिकMaharashtraमहाराष्ट्र