शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

व्यक्तीचे आई-वडिल, मित्र, नातेवाईक अशा सर्वांचे नातेसंबंध असणारी बायोग्राफी उत्तम ठरते - डॉ. रामचंद्र गुहा

By श्रीकिशन काळे | Updated: May 26, 2023 16:21 IST

'लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर यांना ‘मसाप’चा ग्रंथकार पुरस्कार

पुणे : बायोग्राफी चांगली तयार करायची असेल, तर त्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. केवळ एका व्यक्तीमुळे चांगली बायोग्राफी तयार करता येत नाही, तर त्याच्या आयुष्यातील आजुबाजूच्या व्यक्तीरेखांमुळे ती माहितीपूर्ण बनते. त्यासाठी बायोग्राफीत त्या व्यक्तीचे आई-वडिल, मित्र, नातेवाईक अशा सर्वांचे नातेसंबंध यायला हवेत. तरच बायोग्राफी चांगली कलाकृती ठरते, असा मोलाचा सल्ला ज्येष्ठ इतिहासकार, विचारवंत डॉ. रामचंद्र गुहा यांनी दिला. 

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे च्या ११८ व्या वर्धापनदिनानिमित्त वार्षिक ग्रंथ व ग्रंथकार पारितोषिक प्रदान सोहळा शुक्रवारी एस. एम. जोशी सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंच डॉ.रावसाहबे कसबे, ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मसापच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. डी. पी. पाटील, कार्यवाह उध्दव कानडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे भोसले व्यासपीठावर उपस्थित होते. सभागृहात ज्येष्ठ लेखक डॉ. राजा दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ, खासदार श्रीनिवास पाटील, ‘रंगतसंगत’चे संस्थापक प्रमोद आडकर, दीपक करंदीकर आदी उपस्थित होते.

विशेष ग्रंथकार पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम, ‘पुढारी’चे निवासी संपादक सुनील माळी, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, पत्रकार श्रीकांत बोजेवार, लेखिका-पत्रकार स्वाती राजे, सूत्रसंचालक अरूण नूलकर, लेखक-वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. शिरीष भावे, चित्रकार राजू बाविस्कर, संगीतकार प्रा. चैतन्य कुंटे, माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड, डॉ. एस. एन. पठाण, डॉ. मंदा खांडगे, डॉ. वर्षा तोडमल आदींचा समावेश आहे.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले,‘‘मसापतर्फे विविध उपक्रम घेतले जातात. त्यामध्ये मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आम्ही १ लाख पत्रे सरकारला पाठविली. संमेलनाध्यक्ष पदासाठी निवडणूकीत वाद होतात म्हणून आम्ही घटनेत बदल करून अध्यक्षपद सन्मानाने देण्याची परंपरा सुरू केली. मराठी भाषा सक्तीची व्हावी म्हणून पाठपुरावा केला.’’

''दक्षिणेतील काही व्यक्तींनी महात्मा गांधीविषयीचे चरित्रलेखन केले आहे. त्याचे शंभर खंड तयार झाले. गांधींनी केलेले पत्रव्यवहार, त्यांच्याविषयी वृत्तपत्रात आलेले लेखन व इतर सर्व साहित्य एकत्र करून हे शंभर खंड बनले. याचाच अर्थ तुमच्या आजुबाजूच्या लोकांमुळे तुमचे चरित्र चांगल्याप्रकारे लिहिता येते. - डॉ. रामचंद्र गुहा, ज्येष्ठ इतिहासकार-विचारवंत'' 

टॅग्स :PuneपुणेLokmatलोकमतhistoryइतिहासSocialसामाजिकMaharashtraमहाराष्ट्र