शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भाटघर धरणात ९९.७१ टक्के, ‘नीरा देवघर’मध्ये १०० टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 14:56 IST

भात उताऱ्याला बसणार फटका...

भोर (पुणे) : तालुक्यातील भाटघर धरणात ९९.७१ टक्के पाणीसाठा, तर नीरा देवघर धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत ०.२९ पाणीपुरवठा कमी आहे. ब्रिटिशकालीन भाटघर धरण ९९.७१ टक्के, नीरा देवघर धरणात १०० टक्के, तर वीर धरणात ६१.७३ टक्के, गुंजवणी ९७.६९ टक्के पाणीपुरवठा शिल्लक आहे. वीरवगळता सर्व धरणे १०० टक्के भरलेली आहेत. मागील वर्षीसुद्धा धरणे १०० टक्के भरलेली होती. भाटघर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या बारामती, इंदापूर, दौड, पुरंदर तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.

यातील बारामती, इंदापूर, पुरंदर तालुक्याला भाटघर, नीरादेवघर आणि गुंजवणी धरणाचे पाणी वीर धरणातून डाव्या, उजव्या कालव्यातून जाते. शेतीसाठी आणि पिण्यासाठी सोडले जाते. तालुक्यात सध्या दुष्काळ जाहीर झाला आहे. दरम्यान, भोर आणि वेल्हे तालुक्यात भाटघर, नीरादेवघर आणि गुंजवणी या धरणात जवळपास ३९ टक्के पाणीपुरवठा आहे. मात्र दोन्ही तालुक्यात पावसाळ्यात धरणे १०० टक्के भरतात आणि उन्हाळ्यात रिकामी होतात. भोर, वेल्हे तालुक्यात सदर धरणातील पाण्याचा फारसा उपयोग होत नाही. मात्र पुरंदर तालुक्यात ५८१.३८ हेक्टर क्षेत्र, बारामती २६,९१७ हेक्टर, इंदापूर ४१,२६७.६२ हेक्टर असे एकूण ६८,७८७ लागवडीखालील क्षेत्र तर सिंचन क्षेत्र ३७,०७० हेक्टर असे एकूण ७८,३३७.६२ हेक्टर क्षेत्र आहे. तरीही तीनही तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला आहे.

भात उताऱ्याला बसणार फटका -

भोर व वेल्हे तालुक्यात शेवटचा पाऊस पडला नाही. त्यामुळे इंद्रायणी भात पळंजावर गेले असून, शेतकऱ्यांचा भाताचा उतारा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. याबाबत शासनाकडे मागणी करूनही भोरला दुष्काळ जाहीर केलेला नाही. त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्ती करीत असून, फक्त धरणे भरली म्हणून पाऊस झाला असा निकस काढला जात आहे की काय अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :DamधरणPuneपुणे