शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भाटघर धरणात ९९.७१ टक्के, ‘नीरा देवघर’मध्ये १०० टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 14:56 IST

भात उताऱ्याला बसणार फटका...

भोर (पुणे) : तालुक्यातील भाटघर धरणात ९९.७१ टक्के पाणीसाठा, तर नीरा देवघर धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत ०.२९ पाणीपुरवठा कमी आहे. ब्रिटिशकालीन भाटघर धरण ९९.७१ टक्के, नीरा देवघर धरणात १०० टक्के, तर वीर धरणात ६१.७३ टक्के, गुंजवणी ९७.६९ टक्के पाणीपुरवठा शिल्लक आहे. वीरवगळता सर्व धरणे १०० टक्के भरलेली आहेत. मागील वर्षीसुद्धा धरणे १०० टक्के भरलेली होती. भाटघर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या बारामती, इंदापूर, दौड, पुरंदर तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.

यातील बारामती, इंदापूर, पुरंदर तालुक्याला भाटघर, नीरादेवघर आणि गुंजवणी धरणाचे पाणी वीर धरणातून डाव्या, उजव्या कालव्यातून जाते. शेतीसाठी आणि पिण्यासाठी सोडले जाते. तालुक्यात सध्या दुष्काळ जाहीर झाला आहे. दरम्यान, भोर आणि वेल्हे तालुक्यात भाटघर, नीरादेवघर आणि गुंजवणी या धरणात जवळपास ३९ टक्के पाणीपुरवठा आहे. मात्र दोन्ही तालुक्यात पावसाळ्यात धरणे १०० टक्के भरतात आणि उन्हाळ्यात रिकामी होतात. भोर, वेल्हे तालुक्यात सदर धरणातील पाण्याचा फारसा उपयोग होत नाही. मात्र पुरंदर तालुक्यात ५८१.३८ हेक्टर क्षेत्र, बारामती २६,९१७ हेक्टर, इंदापूर ४१,२६७.६२ हेक्टर असे एकूण ६८,७८७ लागवडीखालील क्षेत्र तर सिंचन क्षेत्र ३७,०७० हेक्टर असे एकूण ७८,३३७.६२ हेक्टर क्षेत्र आहे. तरीही तीनही तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला आहे.

भात उताऱ्याला बसणार फटका -

भोर व वेल्हे तालुक्यात शेवटचा पाऊस पडला नाही. त्यामुळे इंद्रायणी भात पळंजावर गेले असून, शेतकऱ्यांचा भाताचा उतारा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. याबाबत शासनाकडे मागणी करूनही भोरला दुष्काळ जाहीर केलेला नाही. त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्ती करीत असून, फक्त धरणे भरली म्हणून पाऊस झाला असा निकस काढला जात आहे की काय अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :DamधरणPuneपुणे