शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

डिंभे धरणात ९७.०६ टक्के पाणीसाठा, पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाचा लागणार कस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 13:56 IST

मागील वर्षी याचवेळी धरण १०० टक्के भरले होते....

- विलास शेटे

मंचर (पुणे) : पावसाळ्यात आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण १०० टक्के भरले होते. सध्या पावसाने दिलेली ओढ तसेच उष्णतेमुळे होणारे बाष्पीभवन यामुळे डिंभे धरणात सध्या ९७.०६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याचवेळी धरण १०० टक्के भरले होते.

आंबेगाव तालुक्यासह जुन्नर, शिरुर, नगर, पारनेर भागासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) यावर्षी १०० टक्के भरले होते. जून, जुलै महिन्यात फारसा पाऊस पडला नाही. ऑगस्टमध्ये सरासरी पाऊस पडला. तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात पडलेल्या पावसामुळे डिंभे धरण कसेबसे भरले; मात्र इतर वर्षापेक्षा पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. मागील वर्षी १४९० मिलिमीटर पाऊस पडला होता. तर यावर्षी धरणक्षेत्रात केवळ ७५१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. यावरून पावसाचे कमी प्रमाण लक्षात येते. परतीच्या पावसाने यावेळी फारशी हजेरी लावली नाही. नवरात्रोत्सवाच्या काळात चांगला पाऊस पडेल अशी आशा होती; मात्र त्यावेळी पाऊस पडला नाही.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात तसेच शिरुर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही धरणातून कालव्यांद्वारे पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता. हे सोडण्यात आलेले पाणी तसेच ऑक्टोबर महिन्यात असलेला उन्हाचा कडाका यामुळे धरणातील पाण्याच्या झालेल्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा होत आहे. आतापर्यंत धरणातील तीन टक्के पाणी कमी झाले आहे. यावर्षी धरण भरल्यानंतर घोडनदीत पाणी सोडण्यात आले; मात्र ते खूपच कमी दिवस सोडले गेले. पावसाचा रंगारंग पाहून धरणातील पाणी सोडणे लवकरच बंद केले गेले. मागील वर्षापेक्षा खूपच कमी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे घोड नदीपात्रात अपेक्षित पाणी सध्या नाही. परिणामी धरणातून लवकरच घोड नदीला पाणी सोडावे लागणार आहे. मागील वर्षीची तुलना करता गेल्यावर्षी या वेळेला धरणात १०० टक्के पाणीसाठा शिल्लक होता; मात्र आजमितीला ९७ टक्के पाणीसाठा धरणात शिल्लक असून तीन टक्के पाणीसाठा कमी झाल्याने चिंता वाढू लागली आहे.

मागील वर्षी १४९० मिलिमीटर पाऊस पडला होता तर यावर्षी केवळ ७५१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. दुष्काळाच्या झळा आताच जाणवू लागल्या असून डिंभे धरणातून वर्षभर वेळोवेळी पाणी सोडण्याची मागणी सर्वच भागातून होणार आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाचा कस लागणार आहे. धरणातून तसेच कालव्यामधून होणारी पाण्याची गळती हा एक कळीचा मुद्दा असून त्यामुळेही पाणी वाया जाते. दुष्काळी परिस्थिती, यावेळी पडलेला कमी पाऊस, वाढलेल्या उष्णतेने धरणातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन पाहता वर्षभर पाणीसाठा टिकून राहण्यासाठी योग्य नियोजन करावे लागणार आहे.

टॅग्स :DamधरणPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड