शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

डिंभे धरणात ९७.०६ टक्के पाणीसाठा, पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाचा लागणार कस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 13:56 IST

मागील वर्षी याचवेळी धरण १०० टक्के भरले होते....

- विलास शेटे

मंचर (पुणे) : पावसाळ्यात आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण १०० टक्के भरले होते. सध्या पावसाने दिलेली ओढ तसेच उष्णतेमुळे होणारे बाष्पीभवन यामुळे डिंभे धरणात सध्या ९७.०६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याचवेळी धरण १०० टक्के भरले होते.

आंबेगाव तालुक्यासह जुन्नर, शिरुर, नगर, पारनेर भागासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) यावर्षी १०० टक्के भरले होते. जून, जुलै महिन्यात फारसा पाऊस पडला नाही. ऑगस्टमध्ये सरासरी पाऊस पडला. तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात पडलेल्या पावसामुळे डिंभे धरण कसेबसे भरले; मात्र इतर वर्षापेक्षा पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. मागील वर्षी १४९० मिलिमीटर पाऊस पडला होता. तर यावर्षी धरणक्षेत्रात केवळ ७५१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. यावरून पावसाचे कमी प्रमाण लक्षात येते. परतीच्या पावसाने यावेळी फारशी हजेरी लावली नाही. नवरात्रोत्सवाच्या काळात चांगला पाऊस पडेल अशी आशा होती; मात्र त्यावेळी पाऊस पडला नाही.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात तसेच शिरुर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही धरणातून कालव्यांद्वारे पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता. हे सोडण्यात आलेले पाणी तसेच ऑक्टोबर महिन्यात असलेला उन्हाचा कडाका यामुळे धरणातील पाण्याच्या झालेल्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा होत आहे. आतापर्यंत धरणातील तीन टक्के पाणी कमी झाले आहे. यावर्षी धरण भरल्यानंतर घोडनदीत पाणी सोडण्यात आले; मात्र ते खूपच कमी दिवस सोडले गेले. पावसाचा रंगारंग पाहून धरणातील पाणी सोडणे लवकरच बंद केले गेले. मागील वर्षापेक्षा खूपच कमी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे घोड नदीपात्रात अपेक्षित पाणी सध्या नाही. परिणामी धरणातून लवकरच घोड नदीला पाणी सोडावे लागणार आहे. मागील वर्षीची तुलना करता गेल्यावर्षी या वेळेला धरणात १०० टक्के पाणीसाठा शिल्लक होता; मात्र आजमितीला ९७ टक्के पाणीसाठा धरणात शिल्लक असून तीन टक्के पाणीसाठा कमी झाल्याने चिंता वाढू लागली आहे.

मागील वर्षी १४९० मिलिमीटर पाऊस पडला होता तर यावर्षी केवळ ७५१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. दुष्काळाच्या झळा आताच जाणवू लागल्या असून डिंभे धरणातून वर्षभर वेळोवेळी पाणी सोडण्याची मागणी सर्वच भागातून होणार आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाचा कस लागणार आहे. धरणातून तसेच कालव्यामधून होणारी पाण्याची गळती हा एक कळीचा मुद्दा असून त्यामुळेही पाणी वाया जाते. दुष्काळी परिस्थिती, यावेळी पडलेला कमी पाऊस, वाढलेल्या उष्णतेने धरणातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन पाहता वर्षभर पाणीसाठा टिकून राहण्यासाठी योग्य नियोजन करावे लागणार आहे.

टॅग्स :DamधरणPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड