शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
3
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
5
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
6
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
7
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
8
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
9
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
10
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
11
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
12
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
13
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
14
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
15
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
16
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
17
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
18
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
19
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
20
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदांमध्ये ८३ कोटी रुपयांची अफरातफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 00:45 IST

राज्यभरातील विविध जिल्हा परिषदांमध्ये ८३ कोटी १७ लाख रूपयांची अफरातफर झाल्याची बाब पंचायतीराज संस्थांच्या लेख्यांवरील लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालातून समोर आली आहे.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : राज्यभरातील विविध जिल्हा परिषदांमध्ये ८३ कोटी १७ लाख रूपयांची अफरातफर झाल्याची बाब पंचायतीराज संस्थांच्या लेख्यांवरील लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालातून समोर आली आहे. स्थानिक निधी लेखा विभागामार्फत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे लेखापरीक्षण केले जाते. पण या लेखापरीक्षणाला देखील अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लेखे, कागदपत्रे, अभिलेखे उपलब्ध करून दिले जात नाहीत. २०१५-१६ या वर्षाच्या लेखापरीक्षणासाठी निवडक ८६ जिल्हा परिषद विभागांचे व ११६ पंचायत समित्यांचे अभिलेखे उपलब्ध करण्यात आले नाहीत.

पुरेशी संधी देऊनही अभिलेखे सादर करण्यास प्रतिसाद दिला जात नाही, हा प्रकार गंभीर असल्याने ही बाब पंचायतराज समितीच्या निदर्शनास आणण्यात येत असल्याचे लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालात म्हटले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये थेट १९६२-६३ पासूनची अफरातफरीची प्रकरणे निकाली न निघाल्याने प्रलंबित आहेत. या अहवालानुसार लबाडी, अपहार, अफरातफरीची ३१ मार्च २०१६ अखेर १७२८ प्रकरणे प्रलंबित होती. त्यात ८३ कोटी १७ लाख ८ हजार रूपये एवढी रक्कम गुंतलेली आहे. यात १९६२-६३ ते २०१०-११ पर्यंतची १६२८ प्रकरणे आहेत. त्यात १३ कोटी ९१ लाख रूपये अडकले होते.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी