शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पुणे जिल्ह्यातील नारायण गावात ८ बांग्लादेशी दहशतवाद विरोधी पथकाच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 21:18 IST

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये केले होते मतदान

पुणे: दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुणे जिल्ह्यातील नारायणगावात ८ बांग्लादेशी नागरिकांना पकडले. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी या बांगला देशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारायणगावात बांगला देशी नागरिक बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार एटीएसचे पथक गुरुवारी सकाळीच नारायणगावात धडकले. या पथकाने ८ बांगला देशी नागरिकांना ताब्यात घेले आहे. हे सर्व जण बेकायदेशीरपणे भारतात रहात असल्याचे आढळून आले आहे.

इसीसचे पुणे मॉड्युल समोर आल्यानंतर नुकतेच राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) यांनी एकत्रित कारवाई करुन इसीसच्या १५ जणांना पकडले होते. पुण्यातही दोघांची चौकशी केली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने देखील यापुर्वी बुधवार पेठेत कारवाई करत तेथे वास्तव्या करणार्या बांग्लादेशी महिला आणि पुरुषांवर कारवाई करत त्यांना पकडले होते.

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये केले होते मतदान

नारायणगावात मोठ्या संख्येने बांग्लादेशी रहात असल्याचा तेथील गावकर्यांकडून संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या बांग्लादेशींनी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानही केल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाच्या योजनेनुसार या बांग्लादेशींची मजूर म्हणून नोंदणी केली गेली. त्यावरुन त्यांना ग्रामपंचायतीने रहिवासी दाखला दिला गेला. त्याच्या सहाय्याने त्यांची नावे मतदार यादीत घुसडण्यात आली. त्याबरोबर त्यांना पॅन कार्डही काढून देण्यात आले. त्याच्या सहाय्याने त्यांनी आधार कार्ड काढली आहे. ते मुळचे बांगला देशाचे असले तरी ते प. बंगालमधील असल्याचे सांगतात. भारत बांगला सीमेवरील गावातून एजंटमार्फत बनावट दाखले मिळवितात. त्याआधारे त्यांनी नारायणगावात बस्थान बसविले आहे.

टॅग्स :PuneपुणेAnti Terrorist Squadएटीएस