शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

पुणे महापालिकेतील २३ समाविष्ट गावांच्या रस्तारुंदीकरणासाठी लागणार ७ हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 11:20 IST

सन १९९९ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील रस्तारुंदीचा प्रश्न सुटणे आता कठीण झाले आहे. ..

ठळक मुद्देस्थायी समितीचा गुरूवारी झालेल्या सभेत हा प्रस्ताव १५ दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय महापालिकेच्या भोवतालच्या ५ किलोमीटर परिघातील २३ गावे सन १९९९ मध्ये महापालिकेत समाविष्ट पदाधिकारी तसेच प्रशासनाचाही पळकुटेपणा असल्याची टीका

पुणे : महापालिका हद्दीत सन १९९९ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील रस्तारुंदीचा प्रश्न सुटणे आता कठीण झाले आहे. स्थायी समितीसमोर गेली अनेक वर्षे असलेला यासंबधीचा प्रस्ताव आता बहुधा कायमचा दप्तरी जाण्याची शक्यता आहे. समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनीच तसे सुचित केले. गुरूवारी झालेल्या सभेत हा प्रस्ताव १५ दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.महापालिकेच्या भोवतालच्या ५ किलोमीटर परिघातील २३ गावे सन १९९९ मध्ये महापालिकेत समाविष्ट करून घेण्यात आली. या गावांचा विकास आराखडा महापालिकेने तयार केला. त्यात गावांच्या एकूण क्षेत्रफळाच्या १५ टक्के रस्ते ठेवणे गरजेचे असताना ९ टक्केच ठेवण्यात आले. त्यामुळे सरकारने त्याला हरकत घेतली. रस्ते १५ टक्के करण्यास सांगण्यात आले. त्यामध्ये प्रत्येक रस्ता दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ३ मीटर रुंद करायचा होता. मात्र त्यात अनेक बांधकाम व्यावसायिकांचे, जमीन मालकांचे नुकसान होत असल्याने महापालिकेने या प्रस्तावावर काहीच विचार केला नाही. सन २००५ पासून हा प्रस्ताव स्थायी समिती, सर्वसाधारण सभा, पुन्हा स्थायी समिती असा फिरत आहे. नगरसेवक आबा बागूल यांनी काही वर्षांपुर्वी तो फेरविचार देत पुन्हा स्थायी समितीत घ्यायला लावला. २३ गावांपैकी औंध, बाणेर, बालेवाडी अशा मोजक्याच गावांचा महापालिकेकडून बऱ्यापैकी विकास झाला असला तरी कात्रज, कोंढवा, पाषाण अशी काही गावे मात्र अद्याप दुर्लक्षितच राहिली आहेत. अरूंद रस्त्यांमुळे याठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत असते व अपघातही होत असतात. या प्रस्तावाची अधिक माहिती घेतली असता एकूण ५३५ किलोमीटर अंतराचे रस्ते रुंद करायचे असल्याचे समजले. तसेच बहुतेक रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना बांधकामे झाली आहेत.स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक याबाबत माहिती देताना म्हणाले, ‘‘हा प्रस्ताव काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सत्ताकाळातील आहे. त्यांनी तो मंजूर केला नाही. आता प्रशासनाचा अभिप्राय घेतला असता त्यांनी रस्ता रूंद करायची तर त्यासाठी साडेसात हजार कोटी रूपये लागतील असे नमुद केले आहे. तसेच अनेक इमारती यात पाडाव्या लागतील, त्यात राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान आहे असेही म्हटले आहे. त्यामुळेच सदस्यांच्या मागणीनुसार हा प्रस्ताव १५ दिवस पुढे नेण्यात आला आहे, मात्र तो बहुधा दप्तरी दाखल करण्यात येईल.’’बागूल यांनी मात्र हा पदाधिकारी तसेच प्रशासनाचाही पळकुटेपणा असल्याची टीका केली. ते म्हणाले, ‘‘ज्या रस्त्यांवर बांधकामे झाली आहेत ते रस्ते करायचे नाहीत व ज्या रस्त्यांवर नाही झाली ते करायचे इतका हा साधा प्रकार आहे. ज्यांच्या जागा रस्तारुंदीत जाणार आहेत, त्यांना रोख पैसे दिले जातच नाहीत तर टीडीआर किंवा एफएसआय च्या स्वरूपात नुकसान भरपाई दिली जाते. त्यामुळे प्रशासन सांगत असलेले कारण तकलादू आहे, या रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे रस्ते रुंद होणे गरजेचे आहे.’’..............नगररचना तसेच नगरविकास खाते यांनीही रस्ते रुंद झाले पाहिजेत असे मत व्यक्त केले आहे. तसे पत्रही त्यांनी वारंवार महापालिका प्रशासनाला पाठवले आहे. त्यामुळेच आयुक्तांनीही याबाबत सकारात्मक भुमिका घेत रस्ता रुंदीची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले होते. मात्र प्रशासन व पदाधिकाऱ्यांपैकीच काहींना रस्त्यांचे रुंदीकरण नको आहे. त्यामुळे निर्णय घेणे टाळले जात आहे असे याबाबत बोलले जात आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा