शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भामाआसखेड धरणात ६५.९८ टक्के पाणीसाठा, धरण प्रशानाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 15:08 IST

यंदा वळवाच्या पावसाने हुलकावणी दिल्याने आणि अद्यापही पावसाचा अपेक्षित जोर नसल्याने धरण गतवर्षीपेक्षा सुमारे २७ टक्के कमी भरले आहे...

चाकण (पुणे) : खेड तालुक्यातील भामा आसखेड वगळता सर्व धरणे ओसंडून वाहत आहेत. संततधार पाऊस असतानाही भामाआसखेड धरणात फक्त ६५.९८ टक्के पाणीसाठा आहे; तर गतवर्षी तो ९२.३७ टक्के इतका होता, अशी अधिकृत माहिती धरण प्रशासनाचे नीलेश घारे यांनी दिली.

यंदा वळवाच्या पावसाने हुलकावणी दिल्याने आणि अद्यापही पावसाचा अपेक्षित जोर नसल्याने धरण गतवर्षीपेक्षा सुमारे २७ टक्के कमी भरले आहे. धरणक्षेत्रात आजअखेर फक्त ४०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खेड, शिरूर, दौंड या तालुक्यांसह पिंपरी-चिंचवड व पुणे शहराच्या काही भागांना वरदान ठरणारे भामाआसखेड हे आठ टीएमसीचे धरण आहे. सध्या एकूण साठा ५.५४ टीएमसी (१५६.७८८ दशलक्ष घनमीटर) असून ५.०६ टीएमसी (१४३.७८८ दशलक्ष घनमीटर) उपयुक्त साठा आहे.

खेड, शिरूर, दौंड या तीन तालुक्यांतील शेतकरी आणि सर्वसामान्य लोक, अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि पुणे, आळंदी, पिंपरी-चिंचवड या शहरांना पाणीपुरवठा होत आहे; परंतु परिसरातील गावे आणि चाकण शहर यांची ‘धरण उशाला - कोरड घशाला’ अशी अवस्था झाली होती. परिसरातील गावे आणि चाकण शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. आणि पुणे, आळंदी, पिंपरी या शहरांना पाणी पुरवठा असल्याने स्थानिकच अडचणीत आले होते. त्यामुळे स्थानिकांसाठीं पाणी राखीव ठेवून इतरांना पाणी द्यावे का ! जमीन देऊन आम्ही चूक केली अशा संतप्त प्रतिक्रिया बाधित शेतकरी व नागरिकांनी व्यक्त केल्या. भामाआसखेड धरणात पावसाळा सुरू होण्यापूर्वी ३० टक्के साठाही शिल्लक राहिला नव्हता. त्यामुळे आणि धरण परिसरात पावसाचा जोर कमी असल्याने फक्त भामाआसखेड भरणे बाकी राहिले आहे .

टॅग्स :DamधरणPuneपुणे